शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

सदगुरू श्री वामनराव पै - जीवनविद्येचे महापर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 10:24 IST

विसाव्या शतकात जीवनविद्येच्या रूपाने, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात क्रांती घडविणारे सदगुरू श्री वामनराव पै हे एक परखड विचारवंत होते.

- डॉ. शारदा पालकर-निवाते

बलिप्रतिपदेच्या शुभदिनी २१ ऑक्टोबर इ. स. १९२२ रोजी मुंबईच्या गिरगावातील आंग्रेवाडीतील एका सर्वसामान्य एकत्र कुटुंबात, गजाननराव व राधाबाई यांच्या पोटी वामनरावांचा जन्म झाला. मॅट्रिकची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाल्यानंतर वामनरावांनी माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. १९४४ साली ते बी. ए. (ऑनर्स) उत्तीर्ण झाले. १९४५ साली वयाच्या २३व्या वर्षी मुंबईतील सचिवालयात म्हणजे आताच्या मंत्रालयात वामनराव सरकारी नोकरीत लागले.

१८ मे १९४८ या दिवशी श्री वामनराव पै यांचा विवाह गोव्यात स्थायिक विश्वनाथ नेवरेकर यांची कन्या नलिनी यांच्याशी झाला. विवाहानंतर नलिनी झाल्या शारदामाई ! १९४८ या वर्षातच त्यांनी श्री नानामहाराज श्रीगोंदेकर यांचा अनुग्रह घेतला. प्रपंचासोबत त्यांची आध्यात्मिक साधनाही सुरू झाली. त्यांना नामस्मरणाचा छंद लागला. खरे तर ईश्वरभक्तिचा हा वारसा त्यांच्या आई राधाबाई यांच्याकडून त्यांना मिळाला होता. प्रपंच करून परमार्थ सिद्ध करता येतो, अशी शिकवण देणारे सदगुरू श्री नानामहाराज यांचे मार्गदर्शन वामनरावांना मिळाले.

सन १९५२पासून मुंबईत सद्गुरू श्री वामनराव पै यांचे नियमित समाजप्रबोधनाचे कार्य सुरू झाले. सुरुवातीला दादरमधील विवेकानंद स्पिरीच्युअल सेंटर येथे त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूज्य दादासाहेब सबनीस यांची प्रवचने ऐकायला ते जात. त्यानंतर त्यांच्यासोबत वामनरावांचीही तेथे प्रवचने सुरू झाली. सदगुरू श्री वामनराव पै यांची प्रवचने - कीर्तने कामगारांच्या आग्रहास्तव चिंचपोकळी, काळाचौकी, लालबाग कामगार विभागात सुरू झाली. सचिवालयातील नोकरी सांभाळून सायंकाळी ते प्रवचने करीत. कार्यालयातून संध्याकाळी घरी आल्यानंतर क्षणभर विश्रांती घेऊन झाल्यावर लगेचच ते प्रवचनाच्या ठिकाणी जायला निघत. तेथे ते ट्रेन किंवा बसने स्वखर्चाने जायचे.

प्रवचनाला येणाऱ्या साधकांच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रंथलेखनास आरंभ केला. सध्या जीवनविद्या मिशन अमृतबोलच्या माध्यमातून सदगुरूंची रेकॉर्डेड प्रवचने - कीर्तने प्रसारीत होत असतात. तसेच प्रल्हाददादांचे ऑनलाईन मार्गदर्शन प्रसारीत होत असते. हजारो लोक त्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. २९ मे २०१२ रोजी सदगुरू श्री वामनराव पै देहरूपाने पंचत्त्वात विलीन झाले. पण आजही जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानावर आधारीत त्यांचे ग्रंथ, त्यांची डिजिटल स्वरूपात उपलब्ध असलेली कीर्तने, प्रवचने, जीवनविद्या फाऊंडेशन, जीवनविद्या ज्ञानपीठाच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू असलेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम या सर्वांच्या रूपाने ते अजरामर आहेत.त्यांच्या तत्त्वज्ञानाचा वारसा त्यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद पै अत्यंत विनम्रपणे पुढे नेत आहेत.

समाजोपयोगी असे अनेक अभियान ते राबवित आहेत. ग्रामसमृद्धी अभियान, स्वच्छता अभियान, संस्कार शिक्षण अभियान, विद्यार्थी मार्गदर्शन, अवयव दान, व्यसनमुक्ती, स्त्रीसन्मान इत्यादी अभियानांच्या माध्यमातून अनेक अभ्यासू मंडळी एकत्र येऊन दादांच्या मार्गदर्शन व नेतृत्त्वाखाली समाजबांधणीचे कार्य करीत आहेत. परदेशात स्थायिक भारतीय व परदेशातील जीवनविद्येच्या इतर अभ्यासकांसाठी वेबिनार्सद्वारे प्रल्हाददादा सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. सदगुरूंच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने ठिकठिकाणी अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न होत आहेत. सुविचारसंपन्न नवसमाजाची ही नांदीच आहे.