शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

त्याग वासनेचा, देई ठेवा आनंदाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:00 IST

माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात.

माणसाच्या आयुष्यातले दु:ख नाहीसे होण्यासाठी नवी व निर्दोष समाजरचना हवी, त्यासाठी नवा माणूस तयार केला पाहिजे. असे साम्यवादाप्रमाणे संतही मानतात. पण नवीन माणूस तयार होण्यासाठी त्याच्यात आतून बदल घडायला पाहिजे. त्यासाठी आधी माणसाची वासना बदलायला हवी. असे संत सागतात. 

हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट

माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात. देहसुखाभोवती घोटाळणारी वासना माणसाला स्वार्थी बनवते व आसुरी आचारविचार शिकवते. तीच वासना जर ज्ञान, भक्ती, प्रेम, क्षमा, परोपकार अशा गुणांभोवती घोटाळू लागली, तर ती माणसाला नि:स्वार्थी बनवते व दैवी आचारविचार शिकवते. अर्थात जुन्या माणसातून नवा चांगला माणूस करायचा असेल, तर त्याच्या अंतरात वावरणारी स्वार्थी वासना अध्यात्मसाधनेच्या भट्टीत घालून नि:स्वार्थी बनवली पाहिजे.

आता हे कसे साधावे? त्यासाठी मार्ग आहे. देहबुद्धी दूर करावी आणि आत्मबुद्धी जवळ करावी. देहबुद्धी म्हणजे शरीराच्या तंत्राने वागण्याची सवय, आत्मबुद्धी म्हणजे अंत:रणाचा कौल मानून भगवंतावर भरवसा ठेवण्याची वृत्ती. 

आपण अनेकदा देहबुद्धीचे दास बनतो. ती बुद्धी सुचवील तसे वागत गेल्यावर विफलता व असमाधान तेवढे पदरी येते. या बुद्धीचा `मी' सर्व बाजूंनी अपंग असतो, कसा ते पहा. देहबुद्धीचा `मी' धड भोक्ता नाही. नको असलेले दु:ख मला टाळता येत नाही. हवे असलेले सुख मला मिळवता येत नाही. दु:ख भोगावे लागते. सुखाची खात्री नसते.

देहबुद्धीचा `मी' धड कर्ता नाही. मी अमुक करीन व तमुक करणार नाही, हे निश्चय पार पाडण्याची खात्री नसते. हवे असलेले कर्म माझ्या हातून घडतेच असे नाही. नको असलेले कर्म टळतेच असे नाही. माझे कर्तेपण मुळात लंगडे आहे.

देहबुद्धीचा `मी' ज्ञाताही नाही. मी कुठून आलो, का आलो, कुठे जाणार, केव्हा जाणार हे मला माहित नाही. उद्या काय होणार, हे कळत नाही. कुणीतरी मला जगवतो, म्हणून मी जगतो. कुणीतरी माझ्याकडून कर्म करवतो, म्हणून मी कर्म करतो. कुणीतरी मला कर्माचे फळ देतो, ते मी माझे म्हणून भोगतो. कुणी तरी समजावून देतो म्हणून मी जाणतो. असा मला जगवणारा व जाणणारा जो करा कर्ता आहे, तोच संतांचा भगवंत होय. प्रत्येकाच्या हृदयात तो आनंदरूपाने राहता. 

हेही वाचा : वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!