शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

त्याग वासनेचा, देई ठेवा आनंदाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:00 IST

माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात.

माणसाच्या आयुष्यातले दु:ख नाहीसे होण्यासाठी नवी व निर्दोष समाजरचना हवी, त्यासाठी नवा माणूस तयार केला पाहिजे. असे साम्यवादाप्रमाणे संतही मानतात. पण नवीन माणूस तयार होण्यासाठी त्याच्यात आतून बदल घडायला पाहिजे. त्यासाठी आधी माणसाची वासना बदलायला हवी. असे संत सागतात. 

हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट

माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात. देहसुखाभोवती घोटाळणारी वासना माणसाला स्वार्थी बनवते व आसुरी आचारविचार शिकवते. तीच वासना जर ज्ञान, भक्ती, प्रेम, क्षमा, परोपकार अशा गुणांभोवती घोटाळू लागली, तर ती माणसाला नि:स्वार्थी बनवते व दैवी आचारविचार शिकवते. अर्थात जुन्या माणसातून नवा चांगला माणूस करायचा असेल, तर त्याच्या अंतरात वावरणारी स्वार्थी वासना अध्यात्मसाधनेच्या भट्टीत घालून नि:स्वार्थी बनवली पाहिजे.

आता हे कसे साधावे? त्यासाठी मार्ग आहे. देहबुद्धी दूर करावी आणि आत्मबुद्धी जवळ करावी. देहबुद्धी म्हणजे शरीराच्या तंत्राने वागण्याची सवय, आत्मबुद्धी म्हणजे अंत:रणाचा कौल मानून भगवंतावर भरवसा ठेवण्याची वृत्ती. 

आपण अनेकदा देहबुद्धीचे दास बनतो. ती बुद्धी सुचवील तसे वागत गेल्यावर विफलता व असमाधान तेवढे पदरी येते. या बुद्धीचा `मी' सर्व बाजूंनी अपंग असतो, कसा ते पहा. देहबुद्धीचा `मी' धड भोक्ता नाही. नको असलेले दु:ख मला टाळता येत नाही. हवे असलेले सुख मला मिळवता येत नाही. दु:ख भोगावे लागते. सुखाची खात्री नसते.

देहबुद्धीचा `मी' धड कर्ता नाही. मी अमुक करीन व तमुक करणार नाही, हे निश्चय पार पाडण्याची खात्री नसते. हवे असलेले कर्म माझ्या हातून घडतेच असे नाही. नको असलेले कर्म टळतेच असे नाही. माझे कर्तेपण मुळात लंगडे आहे.

देहबुद्धीचा `मी' ज्ञाताही नाही. मी कुठून आलो, का आलो, कुठे जाणार, केव्हा जाणार हे मला माहित नाही. उद्या काय होणार, हे कळत नाही. कुणीतरी मला जगवतो, म्हणून मी जगतो. कुणीतरी माझ्याकडून कर्म करवतो, म्हणून मी कर्म करतो. कुणीतरी मला कर्माचे फळ देतो, ते मी माझे म्हणून भोगतो. कुणी तरी समजावून देतो म्हणून मी जाणतो. असा मला जगवणारा व जाणणारा जो करा कर्ता आहे, तोच संतांचा भगवंत होय. प्रत्येकाच्या हृदयात तो आनंदरूपाने राहता. 

हेही वाचा : वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!