शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
4
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
5
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
6
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
7
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
8
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
9
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
10
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
11
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
12
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
13
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
14
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
15
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
16
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
17
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
18
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
19
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
20
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

त्याग वासनेचा, देई ठेवा आनंदाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 16:00 IST

माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात.

माणसाच्या आयुष्यातले दु:ख नाहीसे होण्यासाठी नवी व निर्दोष समाजरचना हवी, त्यासाठी नवा माणूस तयार केला पाहिजे. असे साम्यवादाप्रमाणे संतही मानतात. पण नवीन माणूस तयार होण्यासाठी त्याच्यात आतून बदल घडायला पाहिजे. त्यासाठी आधी माणसाची वासना बदलायला हवी. असे संत सागतात. 

हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट

माणूसपण, मोठेपण आणि चांगुलपणा माणसाच्या वासनेवर अवलंबून असते. माणासाची जशी वासना, तसे त्याचे संकल्प आणि जसे संकल्प, तसे त्याचे आचारविचार असतात. देहसुखाभोवती घोटाळणारी वासना माणसाला स्वार्थी बनवते व आसुरी आचारविचार शिकवते. तीच वासना जर ज्ञान, भक्ती, प्रेम, क्षमा, परोपकार अशा गुणांभोवती घोटाळू लागली, तर ती माणसाला नि:स्वार्थी बनवते व दैवी आचारविचार शिकवते. अर्थात जुन्या माणसातून नवा चांगला माणूस करायचा असेल, तर त्याच्या अंतरात वावरणारी स्वार्थी वासना अध्यात्मसाधनेच्या भट्टीत घालून नि:स्वार्थी बनवली पाहिजे.

आता हे कसे साधावे? त्यासाठी मार्ग आहे. देहबुद्धी दूर करावी आणि आत्मबुद्धी जवळ करावी. देहबुद्धी म्हणजे शरीराच्या तंत्राने वागण्याची सवय, आत्मबुद्धी म्हणजे अंत:रणाचा कौल मानून भगवंतावर भरवसा ठेवण्याची वृत्ती. 

आपण अनेकदा देहबुद्धीचे दास बनतो. ती बुद्धी सुचवील तसे वागत गेल्यावर विफलता व असमाधान तेवढे पदरी येते. या बुद्धीचा `मी' सर्व बाजूंनी अपंग असतो, कसा ते पहा. देहबुद्धीचा `मी' धड भोक्ता नाही. नको असलेले दु:ख मला टाळता येत नाही. हवे असलेले सुख मला मिळवता येत नाही. दु:ख भोगावे लागते. सुखाची खात्री नसते.

देहबुद्धीचा `मी' धड कर्ता नाही. मी अमुक करीन व तमुक करणार नाही, हे निश्चय पार पाडण्याची खात्री नसते. हवे असलेले कर्म माझ्या हातून घडतेच असे नाही. नको असलेले कर्म टळतेच असे नाही. माझे कर्तेपण मुळात लंगडे आहे.

देहबुद्धीचा `मी' ज्ञाताही नाही. मी कुठून आलो, का आलो, कुठे जाणार, केव्हा जाणार हे मला माहित नाही. उद्या काय होणार, हे कळत नाही. कुणीतरी मला जगवतो, म्हणून मी जगतो. कुणीतरी माझ्याकडून कर्म करवतो, म्हणून मी कर्म करतो. कुणीतरी मला कर्माचे फळ देतो, ते मी माझे म्हणून भोगतो. कुणी तरी समजावून देतो म्हणून मी जाणतो. असा मला जगवणारा व जाणणारा जो करा कर्ता आहे, तोच संतांचा भगवंत होय. प्रत्येकाच्या हृदयात तो आनंदरूपाने राहता. 

हेही वाचा : वीस हजाराच्या मोबदल्यात शेठजींनी कमावले, पुण्य, आनंद आणि समाधान!