शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

Rituals: साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालावा, पण स्त्रियांनी नाही; असे का? जाणून घ्या शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:07 IST

Rituals: नमस्कार करणे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्ध रित्या हे आपले कर्तव्य आहे, जाणून घ्या योग्य पद्धती!

नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात, असे म्हणतात. नमस्कार करण्यात नम्र भाव असतो. जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठायी अहंकार असतो, ती ताठ राहते. परंतु, ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकांपुढे, माता-पित्यांपुढे, वडिलधाऱ्या मंडळींपुढे, अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते. परंतु आजच्या काळात नमस्कार करणे, हे कमीपणाचे वाटते. नमस्कार कर, असे मुलांना सांगावे लागते. कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाहीत. मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार, गुडघ्यावर बसून डोके टेवकवून नमस्कार किंवा येता जाता राम राम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती. 

पूजेत जे षोडशोपचार आहेत, त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे. दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार. देव देवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते. नमन, प्रणाम, प्रणती, नती, दंडवत असेही शब्द नमस्काराला आहेत. 

या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसकि हे ते तीन प्रकार आहेत. कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय. तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण, हा नमस्कार करते वेळी हृदय, माथा, पाय, गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात, म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही म्हणतात. या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामबरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो. सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो. हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे.

मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये, कारण... 

स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे. कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते, तेच स्त्रीदेखील करते. गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते. म्हणून तिने अष्ट अंगांमधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा, असे शास्त्र सांगते. 

याशिवाय, हरि ऊँ, रामराम, हरहर महादेव, जयजय रघुवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो, हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे.विशेषत: आंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी `हरगंगे भागीरथी' असे म्हणतात. गंगेला तर हिंदुमात्रांच्या जीवनात अनन्यसाधारण भक्तिभावनेचे स्थान आहे. जीवनात एकदा कधी तरी काशीला हरद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे, हा झाला मानसिक नमस्कार. तेथे जाणे शक्य झाले नसेल, तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो. 

म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक, वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार घाला.