शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

विष्णूभक्त नाकापासून कपाळापर्यंत उभे गंध का लावतात, त्यामागे आहे 'हे' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:06 IST

शिवभक्त भस्मलेपन करतात आणि गंधाची आडवी बोटे कपाळावर उमटवतात, तर विष्णूभक्त गंधाची उभी बोटे उमटवतात. 

विष्णूभक्तांच्या कपाळावर आपण नेहमी उभे गंध पाहतो. हे गंध सामान्य गंधासारखे उभ्या रेषेत नसून इंग्रजीतील व्ही अक्षरासारखे असते. केवळ कपाळावर नाही, तर ते लोक आपल्या भुजांवर, छातीवर आणि पाठीवरदेखील असे गंध लावतात. पण का? त्याची ही सविस्तर माहिती...

हिंदू परंपरेनुसार कपाळ मोकळे ठेवणे अशुभ मानले जाते. कोणत्याही प्रकारचे असो, पण कपाळावर गंध लावणे हे संस्कृतीचे चिन्ह मानले जाते. तसेच कपाळावरील, दोन भुवयांच्या मध्य भागाचे ते पूजन असेही मानले जाते. शिवभक्त भस्मलेपन करतात आणि गंधाची आडवी बोटे कपाळावर उमटवतात, तर विष्णूभक्त गंधाची उभी बोटे उमटवतात. 

वैष्णव भक्तीत गंधलेपनासाठी गोपीचंदनच वापरले जाते.

गोपीचंदनाची उत्पत्ती कृष्णकथेत सापडते. कृष्णाच्या देहाला झालेला दाह गोपिकांच्या पायदळी तुडवल्या गेलेल्या मातीच्या लेपाने शांत झाला. तो लेप गोपीचंदन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक फायदे पाहता आजही त्या विशिष्ट प्रकारच्या मातीपासून गोपीचंदनाची निर्मिती केली जाते. ही माती द्वारकेजवळच आढळते. भगवान गोपालकृष्णांनी कृष्णावतार समाप्त केला, तेव्हा गोपिकांनीदेखील यमुनेत आपला देह ठेवला. त्या नदीतटावरची माती गोपीचंदन बनवण्यासाठी वापरली जाते. कृष्णभक्तीचा अंश त्या मातीत मिसळलेला असल्यामुळे ती माती भाळी लावली जाते आणि आजही विष्णू भक्ती गोपीचंदनाचा तिलक आपल्या कपाळावर शोभेने मिरवतात. 

गोपीचंदन लावण्याची विष्णू भक्तांची वेगवळीच परंपरा आहे. ती म्हणजे दोन भुवयांच्या मध्यापासून कपाळाच्या शेवटापर्यंत ऊर्ध्वदिशेने चंदनलेपन केले जाते. ही त्यांची ओळख आहे. या खुणेवरून विष्णुभक्त ओळखता यावे, एवढीच त्यामागील सद्भावना. त्याचबरोबर दोन भुवयांमधील गंधलेपन आपल्याला सातत्याने विष्णुभक्तीचा आठव करून देते आणि आपला भालप्रदेश शीतल व शांत ठेवते. 

  • अनेक शास्त्रात वर्णन केल्यानुसार गोपीचंदन लावणाऱ्या व्यक्तीला मरणोत्तर वैकुंठधाम प्राप्त होते.
  • गोपीचंदन लावणारी व्यक्ती वाममार्गाकडे जात नाही. कारण कपाळावर लावलेले गंध वाईट विचारांपासून मनाला परावृत्त करते.
  • गोपीचंदन लावून कृष्णभक्ती किंवा विष्णूभक्ती करणाऱ्या भक्ताला राजसूय यज्ञाचे किंवा अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. 
  • गोपीचंदन लावणारी व्यक्ती सांसारिक सुखापासून अलिप्त होत पारमार्थिक सुखाची अनुभुती घेते. 
  • वैष्णव सांप्रदायाने परदेशातील लोकांनाही विष्णू भक्तीची गोडी लावल्याचे दिसते. हरे राम हरे कृष्णा या संस्थेअंतर्गत कृष्ण भक्तीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार होत असल्याचे दिसून येते.