शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

उद्या विवाह पंचमीला वाचा सीता स्वयंवराची कथा, दूर होतील तुमच्या वैवाहिक जीवनाच्या व्यथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:28 IST

बुधवार, ०८ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पंचमीचा दिवस विवाह पंचमी या नावे साजरा केला जातो. कारण या दिवशी प्रभू श्रीराम आणि सीतामाईचा विवाह झाला होता. या दिवशी सीता स्वयंवराच्या कथेचे पठण केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. चला करूया सीता स्वयंवराच्या प्रसंगाची उजळणी!

श्रीरामाचे चरित्र वारंवार वाचावे एवढी त्या रामकथेत गोडी आहे. त्यात सर्व नात्यांमध्ये असलेल्या उत्कट प्रेमाचे दर्शन घडते. विशेषतः राम सीतेच्या सहजीवनाचे. लोकांच्या त्यांच्या चरित्रात उणिवा दिसतात, परंतु राम सीतेचे परस्पर प्रेम आणि एकमेकांवरील दृढ विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची क्षमता आणि पती पत्नी असूनही जपलेलं प्रेमाचं, मैत्रीचं नातं. आजच्या काळात त्यांच्या नात्याचा आदर्श सर्वांनी ठेवायला हवा. म्हणूनच विवाह पंचमीच्या औचित्याने राम सीतेच्या विवाहाच्या प्रसंगाची उजळणी करू. कारण, या कथेच्या केवळ श्रवणाने किंवा पठणाने आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपणही भक्तिभावे या कथेचा एक दुवा होऊया. 

सीता स्वयंवराची गोष्ट :

रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी झाला होता. माता सीतेचा जन्म मिथिलाचा राजा जनक याच्या पोटी झाला. म्हणूनच तिला जानकी असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, नांगरणी करताना माता सीता राजा जनकाला शेतात सापडली. तिला जनकाने पोटच्या मुलीसारखी वाढवली. तिचे पालन पोषण केले. 

एकदा सीतेने खेळता खेळता शिवधनुष्य उचलले होते. ते धनुष्य जनकाला परशुरामाने दिले होते. ते दृश्य पाहून राजा जनकाला धक्का बसला कारण हे धनुष्य उचलण्याची क्षमता फक्त परशुरामांकडेच होती. माता सीतेचे हे गुण पाहून राजा जनकाने तिच्या स्वयंवराच्या वेळी अट घातली की जो कोणी हे धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडेल त्याच्याशीच सीतेचा विवाह लावून दिला जाईल. 

ही घोषणा ऐकून विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणासह सीता स्वयंवरात पोहोचले. तिथे आलेले सर्व राजपुत्र आणि राजे ते धनुष्य उचलू शकले नाहीत. राजा जनक हताश होऊ लागला की 'माझ्या मुलीच्या पात्रतेचा कोणी नाही का?

त्यानंतर प्रभू श्रीराम यांना संधी देण्यात आली. त्यांनी उठून गुरूंना, उपस्थितांना आणि धनुष्याला नमस्कार केला आणि नंतर ते धनुष्य एका झटक्यात उचलले आणि त्याची प्रत्यंचा लावली.धनुष्य ताणले गेले आणि तुटले. तेव्हा खूप मोठा आवाज झाला. ही वार्ता कळताच परशुराम संतप्त झाले. परंतु श्रीरामांच्या ठायी साक्षात विष्णू आणि माता सीतेमध्ये लक्ष्मीला पाहिले आणि त्यांना विवाहासाठी आशीर्वाद दिला. विवाह निर्विघ्नपणे आणि आनंदाने पार पडला. 

त्यानंतर या दोहोंच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आल्या परंतु त्यांचे परस्परावरील प्रेम आणि विश्वास तसूभरही ढळला नाही. एक राजा या भूमिकेतून श्रीरामांनी घेतलेल्या निर्णयाचा सीतामातेने सदैव आदर केला आणि पती भूमिकेतून श्रीरामांनी सीतेवर अनेक आरोप होऊनही आयुष्यभर एकपत्नी व्रत अंगिकारले. यावरून त्यांचे अतूट नाते लक्षात येते. म्हणून विवाह पंचमीला त्यांचा आदर्श ठेवून विश्वासाने आणि एकमेकांना आदर देऊन संसार करावा हा संस्कार आपल्या संस्कृतीने घालून दिला आहे. 

टॅग्स :ramayanरामायण