शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

Ram Navmi 2021: बंधुप्रेम शिकवणारं रामायण... राज्य नाकारणारा भरत अन् वनवासात जाणाऱ्या लक्ष्मणाचा त्याग अतुलनीयच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 08:30 IST

आजच्या युगात राज्यासाठी कोणत्या थराला जातात हे पाहिल्यानंतर भरताप्रती आदर शतगुणित होतो. राज्य मिळून ते नाकारणारा भरत श्रेष्ठ की सर्वस्वाचा त्याग करून वडीलबंधू समवेत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण श्रेष्ठ ही तुलनाच करण अशक्य आहे.

>>डॉ. भूषण फडके

अयोध्येत दशरथ राजा रामाच्या विरहाने दु:खी असतात. त्यांना श्रावणकुमारच्या पित्याच्या शापाची आठवण होते. तेवढ्यात सुमंताकडून श्रीराम चित्रकुट पर्वतावर आहेत हे कळताच राम राम करत ते आपला प्राण सोडतात. अयोध्या शोकसागरात बुडते. भरत -शत्रुघ्नला आणण्यासाठी दूत पाठविण्यात येतो. भरत अयोध्येत येतो, तेव्हा त्याला अयोध्या अतिशय शांत भासते. त्याला नगरीतलं चैतन्य हरपले आहे असे वाटते. भरताला कैकयीकडून दशरथाच्या मृत्यूची आणि रामाच्या वनवासाची हकीकत कळते. आपल्याला राज्य प्राप्त होण्यासाठी आईने कुटील कारस्थान रचले हे कळताच तो कैकयीचा धिक्कार करतो आणि श्रीरामास पुन्हा अयोध्येस आणीन, अशी शपथ घेतो. भरत आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार करतो आणि रामांना अयोध्येत परत आणण्यासाठी चित्रकुटावर जाण्याचा निश्चय करतो.

Ram Navmi 2021: योग्य वेळी सत्तेचं पद सोडण्याचं अन् बुद्धिभेद करणाऱ्यांपासून दूर राहण्याचं महत्त्व पटवणारं रामायण

 कदाचित आपल्या सहवासात बुद्धिभेद करणारे असू शकतात पण त्यांच्या सांगण्यानुसार वागल्यास कैकयीसारखी अवस्था होते. ज्या पुत्रासाठी राज्य मागून घेतल्या जाते तो पुत्र राज्य नाकारतो आणि भाळी वैधव्य येते. 

भरत-शत्रुघ्न, तिन्ही माता, वसिष्ठ ऋषी आणि अयोध्येचे मंत्री चित्रकुटावर जाण्यास निघतात. वाटेत त्यांची निषादराजगुहाची भेट होते. अयोध्येच्या लवाजम्यासहित भरत चित्रकुटावर पोहोचतो तिथे राम-भरत भेट होते. पिताश्रींच्या स्वर्गवासाची बातमी श्रीरामांना कळते. भरत श्रीरामांना अयोध्येत परत येण्याचा आग्रह करतो. श्रीराम पित्याचे आज्ञापालन महत्त्वाचे असे सांगतात आणि भरताला जन्म-मृत्यू मानवाच्या हातात नाही असे सांगून शोक आवरण्याचा उपदेश करतात. श्रीराम अयोध्येस परत येणार नाही हे लक्षात आल्यानंतर भरत श्रीरामांच्या पादुका मागतो आणि  म्हणतो, “रामा, तुमच्या पादुका मी सिंहासनावर ठेवीन आणि मी नंदीग्राम येथे मुनिवेश धारण करून राज्याचा रक्षक म्हणून कारभार पाहीन.”

आजच्या युगात राज्यासाठी कोणत्या थराला जातात हे पाहिल्यानंतर भरताप्रती आदर शतगुणित होतो. राज्य मिळून ते नाकारणारा भरत श्रेष्ठ की सर्वस्वाचा त्याग करून वडीलबंधू समवेत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण श्रेष्ठ ही तुलनाच करण अशक्य आहे, आपण या त्यागापुढे फक्त नतमस्तक व्हावं, या त्यागानं दीपून जावं.

भरत श्रीरामांच्या पादुका घेवून नंदिग्रामास परत येतो. श्रीराम चित्रकुटाहून दंडकारण्याकडे जातांना मार्गात  अत्री ऋषींच्या आश्रमात पोहचतात. अत्री ऋषींची पत्नी अनुसूया सीतेस म्हणते, “वर माग!” भरताचे रामावर प्रेम असते. यावर सीता म्हणते, “माझ्या आयुष्यात राम आहे. त्यामुळे मला कशाचीच कमतरता नाही.”

श्रीराम, लक्ष्मण, सीता दंडकारण्यात प्रवेश करतात, वाटेत विराध राक्षसाचा वध करतात. शरभंग, सुतीक्षण ऋषींचा आशीर्वाद घेतात आणि इतर ऋषींच्या रक्षणाचे वचन देतात. श्रीराम जरी वनवासात असले तरी प्रजेचे रक्षण हे राजाचे कर्तव्य पार पाडतांना आपल्याला दिसतात. अगस्त्य ऋषी श्रीरामांना पंचवटी येथे आश्रम बांधण्यास सांगतात. वाटेत श्रीरामांची जटायूशी भेट होते, “मी सीतेचे रक्षण करीन” या जटायूच्या शब्दांनी श्रीराम निश्चिंत होतात. 

|| बोला सियावर रामचंद्र की जय ||    भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com

Ram Navmi 2021: समाजाने बहिष्कृत केलेल्यांना सन्मानाने प्रवाहात आणण्याची शिकवण देणारं रामायण

टॅग्स :ramayanरामायणRam Navamiराम नवमी