शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:25 IST

Ram Navami 2025: शाळिग्रामाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे आणि त्याच्या पूजेच्या अनेक अटी व नियम आहेत, तरी मूर्तीसाठी शाळिग्राम निवडण्याचे कारण जाणून घेऊ.

>> योगेश काटे, नांदेड 

रामललाची मूर्ति शालिग्रामातून साकारण्यात आली. शालिग्राम हे श्रीविष्णुंचे प्रतिकात्मक रूप मानले जाते. अशा पवित्र शाळिग्रामची माहीती जाणून घेऊया. 

शाळिग्राम : 

शाळिग्रामात  लक्ष्मीसमेत श्री विष्णूचे नित्य सानिध्य असते. शाळिग्रामाची नित्यपुजन व तुलसीअर्चन आणि नैवद्य करणे हा शास्त्राचा दंडक. तुळशी शिवाय शालिग्रामची पुजाच करू नये एकवेळस फुल नसले तरी चालेल मात्र तुळस आवश्यक आहे. तुळशिवाय शाळिग्रामची पुजा केल्याने दारिद्रय येते असा  गुरुचरित्रात उल्लेख मिळतो.  श्री नरसिंह सरस्वती  यांच्या नित्य पुजनात शाळिग्राम होते.

शाळिग्राम  पुजाचा आचार सोवळ्यातच आहे. पद्मपुराणात शालिग्रामची कथा आहे. तसेच वृंदा जालंदर व विष्णुची कथा आहे. भविष्योत्तरपुराणात शाळिग्राम नामक एक स्तोत्र आहे  धर्मराज युधिष्ठिर व भगवान श्रीकृष्णाचा हा संवाद यात विविध शाळिग्रामाची वर्णनने आहेत तसेच दशावताराचे वर्णन मिळेल. खुप सुंदर असे स्तोत्र आहे. 

Ram Navami 2025: राम आणि रावणात मुख्य फरक काय होता? सांगताहेत कुमार विश्वास!

पंचायतन पुजा विशेषतः मध्व संप्रदायात  शाळिग्रामाचे महत्तव अधिक. शाळिग्रामावरील मुखे व चक्रे यांवरून त्याची परीक्षा करतात. शाळिग्रामाचे  एकुण ८९ प्रकार असून रंगावरून  पुढील नावे दिली आहेत : 

शुभ्र पांढरा –वासुदेव, निळा–हिरण्यगर्भ, काळा –विष्णू, गडद हिरवा–श्रीनारायण,तांबडा –प्रद्युम्न गडद निळा – नरसिंह किंवा वामन. 

शाळीग्राम एक प्रकारचा जीवाश्म दगड आहे, जो देवाचा प्रतिनिधी म्हणून देवाला आवाहन करण्यासाठी वापरला जातो.शालिग्राम सहसा पवित्र नदीच्या काठावरुन किंवा काठावरुन गोळा केला जातो. शिवभक्त पूजा करण्यासाठी शिवलिंगाच्या रूपात जवळजवळ गोलाकार किंवा अंडाकृती शालिग्राम वापरतात. वैष्णव (हिंदू) विष्णूचा प्रतिनिधी म्हणून पवित्र गंडकी नदीत सापडलेल्या गोलाकार शिळेला शाळीग्राम म्हणतात. शालिग्राम हे विष्णूचे एक नाव आहे.

पद्मपुराणानुसार - गंडकी अर्थात नारायणी नदीच्या प्रदेशात शालिग्राम स्थळ नावाचे एक महत्त्वाचे स्थान आहे; तिथून बाहेर पडणाऱ्या दगडाला शाळीग्राम म्हणतात. शालिग्राम शिळेच्या नुसत्या स्पर्शाने करोडो जन्मांची पापे नष्ट होतात, असे म्हणतात. 

बारा चक्रे असलेल्या शाळिग्रामाला अनंत म्हणतात. शाळिग्रामाच्यातीर्थाचे फार महत्व आहे. शाळिग्राम स्तोत्रातील हा श्लोक फार प्रसिद्ध . 

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् ।विष्णोः पादोदकं पीत्वा शिरसा धारयाम्यहम् ।। 

नित्य श्रीहरीचे सानिध्य शाळिग्राम शिलेत वास करतो अशी आपल्या धर्मशास्त्राची व सश्रद्ध व धार्मिक हिंदुंची धारणा आहे. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर