शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Ram Navami 2024: राजा दशरथाच्या बाबतीत असे काही घडले की रडता रडता त्याला आनंद झाला; त्या क्षणाबद्दल... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:03 IST

Ram Navami 2024: रामायणातील प्रत्येक पात्र आपल्याला काय बोध देते, हे राम नवमीनिमित्त सुरु केलेल्या मालिकेतून जाणून घेऊया. 

>> डॉ. भूषण फडके

ब्रह्मदेवांच्या आणि देवर्षी नारदांच्या आज्ञेप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी रामचरित्र लेखनास सुरुवात केली. सत्यप्रिय रामांनी केलेले सर्व कार्य वाल्मिकींना दिसू लागले. अयोध्येत रावण वधानंतर प्रभू रामांनी सीतेचा त्याग केला. ती महर्षी वाल्मिकींच्याच आश्रमात आली. तीला जुळी मुलं झाली तीच लव-कुश. महर्षींनी दोन्ही राजकुमारांना अस्त्र-शस्त्र विद्या, राजविद्या, गायनकलेत प्रवीण केले.

अयोध्येत प्रभू रामांनी अश्वमेध यज्ञ आरंभिला. महर्षी वाल्मिकीही  लव-कुश समवेत यज्ञमंडपात आले आणि  त्यांनी रामचरित्र गायनास सुरुवात केली. कानात प्राण आणून मंत्रमुग्ध होऊन सभा लव-कुशाच्या तोंडून श्रीरामचरित्र ऐकण्यात गुंग होती. आता लव-कुशांनी अयोध्यानगरीच्या वर्णनाला सुरुवात केली.

पवित्र शरयू नदीच्या तिरावरचा कोशल देश आणि याच देशातील समृद्ध सुखी असे अयोध्यानगर. या नगरीचा प्रजाहितदक्ष, वेदवत्ता आणि धर्मवत्ता राजा ''दशरथ''.  दशरथाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या होत्या.. दशरथाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते पण राजाला पुत्रसुख नव्हते याचे राजा आणि प्रजाजनांना दु:ख होते.

दशरथ राजा उत्तम धनुर्धर होते. शब्दवेधी बाण मारण्यात त्यांच्याइतका तरबेज त्याकाळी दुसरा कोणीही नव्हता. पुत्र नसल्याचे दु:ख हलके करण्यासाठी राजा मृगया करण्यासाठी जंगलात जात असे. एकदा दिवसभर प्रयत्न करूनही राजाला शिकार गवसली नाही. संध्याकाळ संपली , रात्र झाली राजा झाडावर बसला. एखादं श्वापद येईल आणि शब्दवेधी बाणांनी मी त्याला मारीन रात्री पाणवठ्यावर आवाज झाला. आवाजाच्या दिशेनी राजाने शब्दवेधी बाण मारला पण, ''मेलो, मेलो'' अशा आरोळीने राजा खाली उतरून पाहतो तो मुनीकुमार रक्ताच्या थारोळ्यात!

राजा दशरथ सत्यनिष्ठ आहे म्हणून बाण लागल्यावर तो उतरून चौकशी करतो नंतर श्रावणाच्या छातीतील बाण काढतो. मुनिकुमाराचा मृत्यू होतो.राजा  पाणी घेऊन त्याच्या वृद्ध माता-पित्यांकडे जातो. त्याचे माता-पिता दशरथाला शाप देतात. ''पुत्रवियोगाने तुलाही मृत्यू येईल.'' वृद्ध माता-पिता श्रावण-श्रावण करत प्राण सोडतात.

राजा तिघांचेही अंत्यसंस्कार करून राजप्रासादात येतो. पोटी पुत्र नाही त्यात एक शाप. राजाच्या चेहऱ्यावरील ताण वशिष्ठ ओळखतात आणि दु:खाचे कारण विचारतात. राजाकडून हकीगत कळताच वशिष्ठ ऋषी म्हणतात, ''राजा, हा शाप नसून तुझ्यासाठी वरदान आहे. अरे, मृत्युसमयी तुझ्याजवळ पुत्र राहणार नाही म्हणजेच तुला पुत्रसुख आहे हे निश्चितच''. श्रावण कुमारच्या आई वडिलांच्या शापातून वेगळा अर्थ घेणाऱ्या वशिष्ठ ऋषींचा दृष्टीकोन योग्य आहे. !” वाईटातून चांगल घेण्याची वशिष्ठांची योग्यता यातून दिसून येते. आपण आजकाल +ve attitude म्हणतो ते हेच. हेच आपल्याला रामायणातून शिकायचे आहे. रामायणातील प्रसंग जीवनोपयोगी शिकवण देतात, म्हणूनच रामायणाचा डोळसपणे अभ्यास होणे आवश्यक आहे.

ऋषश्रुंग ऋषींना पुत्रकामेष्टी यज्ञासाठी सन्मानाने बोलविण्यात येते. यज्ञ सफल होतो  आणि चैत्र महिन्यात शुद्ध नवमीला माध्यान्ह समयी कौसल्येला राम, सुमित्रेस लक्ष्मण-शत्रुघ्न तर कैकयीला भरत असे चार पुत्र होतात. रामाचा जन्म दुपारी का झाला? कारण लोकांच्या जीवनातील उन्हाळा (दाह) संपविण्यासाठी.  अयोध्येची जनता राम जन्माने आनंदित झाली.

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८

Email-bmphadke@gmail.com

Ramayan 2024: एवढी वर्षं लोटूनही अजून का टिकून आहे रामकथेची जोडी? वाचा ९ दिवसीय मालिका!

 

टॅग्स :ramayanरामायण