शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

Ram Navami 2024: अहल्येच्या कथेवरून श्रीरामांनी कोणता बोध देण्याचा प्रयत्न केला ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:30 IST

Ram Navami 2024: श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहल्या पापमुक्त झाली, ही केवळ कथा नाही तर त्यात दडलाय मुख्य संदेश; कोणता ते पाहू!

>> डॉ. भूषण फडके

मिथीलेच्या मार्गात विश्वामित्र श्रीरामांना काही कथा सांगतात. पराक्रमी पूर्वजांचे रामाला स्मरण देऊन विरश्री निर्माण करणे हा विश्वामित्रांचा हेतू होता, म्हणून प्रथम ते श्रीरामास राजा भगीरथाची कथा सांगतात. दुसरी कथा समुद्रमंथनाची सांगितली. समुद्रमंथनातून अमृत मिळविणे हे लक्ष्य! हे ध्येय ! ध्येयप्राप्ती झाल्यानंतर ते टिकविणे महत्वाचे आहे हा विचार विश्वामित्रांनी रामास सांगितला. अमृत मिळाले पण त्यानंतर कलह झाला आणि त्यात राक्षसांचा नाश झाला म्हणजेच ध्येय  साध्य झाल्यावर ते टिकविण्यास हवे. 

राजकुमारांसमवेत विश्वामित्र गौतम ऋषींच्या उजाड आश्रमाजवळ पोहचतात. विश्वामित्र सांगतात, “देवराज इंद्र हा गौतम ऋषींची पत्नी अहिल्यादेवीच्या सौंदर्यावर लुब्ध होता. एक दिवस गौतम ऋषी आश्रमात नसताना संधी साधून देवराज इंद्र गौतम ऋषींच्या रुपात अहिल्येजवळ रतीसुखाच्या इच्छेने आला. देवांच्या राजाला आपल्याविषयी प्रेम वाटते याचा तिला अभिमान वाटला आणि ती त्याच्यासमवेत रममाण झाली. अतिशय क्रोधित गौतमांनी  होऊन इंद्रास शाप दिला आणि अहिल्येस शाप देतांना ते म्हणाले, "तू कोणालाही दिसणार नाहीस, अनेक वर्षे तू येथेच पडून राहशिल. तुझ्या कुकर्मामुळे तू समाजापासून दुर राहशिल." अहिल्येच्या क्षमायाचनेनंतर गौतम ऋषी सांगतात, “दशरथपुत्र राम या घोर वनात येतील आणि तुझा उध्दार करतील”.  विश्वामित्र ऋषी श्रीरामांना आश्रमात जाऊन अहिल्येचा उध्दार करण्याची आज्ञा देतात. गौतमांच्या शापामुळे रामाशिवाय इतर कोणीही तिला पाहू शकत नव्हते. श्रीरामांचे दर्शन होताच ती इतरांना दिसू लागते. अनेक रामायणात अहिल्या शिळा झाली होती आणि श्रीरामांच्या चरणस्पर्शाने ती पुन्हा स्त्रीरुपात आली असा उल्लेख आहे परंतु गौतमांच्या शापामुळे तिचा बाह्य जगाशी संपर्क नव्हता म्हणजे ती शिलेसमान होती. प्रभु रामांच्या स्पर्शानं तिला शुध्दत्व आले. समाजाने बहिष्कृत केलेल्यांना पुन्हा सन्मानाने प्रवाहात आणण्याची गरज प्रभु रामांनी दाखवुन दिली.

गौतमांच्या आश्रमातून राम-लक्ष्मण विश्वामित्रांसमवेत जनकराजाच्या मिथिलानगरीत दाखल होतात. जनक राजाकडील अतिविशाल शिव  धनुष्यास जो प्रत्यंचा चढवेल त्यासोबत सीतेचे स्वयंवर करण्याचा राजा जनकाचा पण असतो. प्रभू रामचंद्र हा पण जिंकतात.विवाह हा व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा संस्कार आहे. विवाहाने दोन कुटूंबाचे मिलन होते. रामाने स्वयंवराचा पण जिंकला, तरीही अयोध्येस जाऊन वराच्या पित्यास आदरपूर्वक बोलवण्याचा जनक राजा आपला मनोदय सांगतो यावरुन संस्कार हे अनादी कालापासून भारतदेशात रुजलेले आहेत हे दिसून येते.

राम-सीतेच्या विवाहानंतर राजा दशरथ तीनही राण्या आणि चारी राजपुत्र आणि त्यांच्या नववधुंसह अयोध्या नगरात प्रवेश करतात. राम-सिता विष्णु लक्ष्मीसारखे भासतात. अयोध्यावासी आनंदात असतात. केकयराज अश्वपती (कैकयीचे वडील) आपला पुत्र युधाजित यास अयोध्येत पाठवितात. त्यांच्यासोबत भरत-शतृघ्न आपल्या नववधूंसमवेत केकय देशात जातात. राम-सीता, लक्ष्मण-ऊर्मिला अयोध्येत आनंदात असतात.

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण