शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Ram Navami 2023: जनतेच्या मनाविरुद्ध सत्तेत न राहता राजपदाचा त्याग करणं हेच खरं लोकराज्य आणि तेच रामराज्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 07:00 IST

Ram Navami 2023: योग्य वेळी सत्तेचं पद सोडण्याचं अन् बुद्धिभेद करणाऱ्यांपासून दूर राहण्याचं महत्त्व पटवणारं रामायण...

>>डॉ. भूषण फडके

भरत आणि शत्रृघ्नचे केकय देशात म्हणजे भरताच्या आजोळी उत्तम स्वागत झाले. भरत-शतृघ्न केकयदेशात आनंदात होते पण त्यांना अयोध्येची, आपल्या माता-पित्यांची आणि बंधू श्रीराम-लक्ष्मणांची सदोदित आठवण होत असे. 

दशरथ राजा आता वृद्धापकाळाकडे झुकत होते. सर्वगुणसंपन्न श्रीरामाला राज्याभिषेक करावा असे दशरथाला वाटले. त्यांनी हा विचार वशिष्ठ, मंत्रिगण आणि प्रजेला सांगितला. सर्वांना अतिशय आनंद झाला. 

आपण वृद्ध झालो आहोत, आता राज्यपद त्यागून योग्य पुत्राला राज्याभिषेक करण्याचा राजा दशरथाचा निर्णय प्रजेला फार आवडतो. खरे तर सत्तेचा मोह अनेकांना सोडवत नाही. पण, राजा दशरथ त्यातले नव्हते. योग्य वेळ येताच योग्य उत्तराधिकारी निवडून आपण निवृत्त होणे अशी त्यागी वृत्ती प्रजाजनांचा आवडली होती आणि त्याचेच गुणगान प्रजा गात होती.

रामाला युवराजपदाचा अभिषेक होणार ही बातमी मंथरा या  कैकयीच्या दासीला कळते. रामाला होणारा युवराजपदाचा अभिषेक कैकयीसाठी घातक आहे, असे मंथरा सांगण्याचा प्रयत्न करते. पण कैकयीचे रामावर पुत्रवत प्रेम असते. म्हणून ती मंथरेचे म्हणने नाकारते. मंथरा ही अतिशय कपटी आणि बुद्धीभेद करण्यात वाकबगार असते. ती कैकयीस म्हणते, “राम राजा झाल्यावर कौसल्या राजमाता होईल आणि तुला तिचे दास्यत्व पत्करावे लागेल.” पुढे ती म्हणते, “तू दशरथ महाराजांची आवडती राणी असूनदेखील तुला ही बातमी न सांगण्यात त्यांच्या मनात कपट आहे.” ही मात्रा बरोबर लागू पडते. कैकयी मंथरेच्या कह्यात जाते. 

राजा दशरथ कैकयीला रामाच्या युवराजपदाच्या अभिषेकपदाची बातमी देण्यास येतात तेव्हा ती क्रोधागारात असते आणि राजाला वचनात अडकवून दोन वर मागते. एका वराने भरतास राज्य आणि दुसऱ्या वराने रामास चौदा वर्ष वनवास! आपल्या आजूबाजूला मंथरेसारखे बुद्धीभेद करणारे असतात, पण त्यांच्या कह्यात जाणे आपण टाळावयास हवे.  श्रीरामांना ही हकीकत कळताच पितृवचन पूर्ण करण्यासाठी ते वनात जाण्याचा निश्चय करतात. ही बातमी माता कौसल्येस कळताच ती दु:खी होते. माझ्या दैवात वनवास आहे, असे राम म्हणतात. हे ऐकताच लक्ष्मण संतापतो आणि दैवापेक्षा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे असे विचार मांडतो. श्रीराम लक्ष्मणाची समजूत घालतात पण  लक्ष्मणासह सीताही रामांसोबत वनवासात जाण्याचा निश्चय करते. 

वनवासात जाण्यासाठी श्रीराम आणि  लक्ष्मण वल्कले धारण करतात, हे पाहिल्यावर राजा दशरथाला मूर्च्छा येते. सुमित्रा लक्ष्मणाला राम सीतेची काळजी घेण्याचा उपदेश करते. मंत्री सुमंत रथ सिद्ध करतो आणि  हे पाहताच दशरथ राजा जमिनीवर कोसळतो.  श्रीरामांची आणि निषादराजगुहांची श्रुंगवेरपूर येथे भेट होते. निषादराजाच्या नावेतून गंगा पार करून श्रीराम भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येतात. भारद्वाज ऋषींच्या सल्ल्यानुसार श्रीराम चित्रकूट पर्वतावर आहेत ही बातमी निषादराज कडून सुमंतास कळल्यावर सुमंत जड अंत:करणाने अयोध्येत परत जायला निघतात.

|| बोला सियावर रामचंद्र की जय ||

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण