शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Ram Navami 2023: आपला देह हे सुद्धा चालते बोलते रामायण आहे; विश्वास बसत नाही? 'हे' वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:40 IST

Ram Navami 2023: जेव्हा आयुष्य निरस वाटू लागेल, तेव्हा 'या' रामायणाची पटकन उजळणी करा, मनाला उभारी मिळेल!

आयुष्य कंटाळवाणे वाटू लागले की आयुष्यात राम उरला नाही असे आपण म्हणतो. परंतु रामाशिवाय आपले आयुष्यच पूर्ण होणार नाही, याची प्रचिती आपल्याला फार उशिरा येते. जे रामायण रामकथेमुळे आपल्याला गोड वाटते, त्या रामायणाचे आपणही एक भाग असतो. नव्हे तर ते रामायण आपल्या आतच घडत असते. मग राम उरला नाही असे म्हणून कसे चालेल? या गोष्टीची जाणीव करून देणारी एक सुंदर कविता-

|| शरीरी वसे रामायण ||

जाणतो ना कांही आपणशरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||

आत्मा म्हणजे रामच केवळ,मन म्हणजे हो सीता निर्मळ !जागरुकता हा तर लक्ष्मण,शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||

श्वास, प्राण हा मारुतराया,फिरतो जगवित आपुली काया |या आत्म्याचे करीतो रक्षणशरीरी आपुल्या वसे रामायण ||२||

नील जाम्बुवंत रक्त नसा या,फिरती शोधत जनक तनयागर्वच म्हणजे असतो रावणशरीरी आपुल्या वसे रामायण ||३||

रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,भाव भावना त्यातील वावरमोहांधता करी आरोग्य भक्षणशरीरी आपुल्या वसे रामायण ||४||

नखें केंस त्वचा शरीरावरती,शरीर नगरीचे रक्षण करतीबंधु खरे हे करती राखणशरीरी आपुल्या वसे रामायण ||५||

क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,शांत असता घोरत पडतोडिवचताच त्या करी रणक्रंदनशरीरी आपुल्या वसे रामायण ||६||

गर्वे हरले सौख्य मनाचेकांसाविस हो जीवन आमुचेसंकटी येई शरीर एकवटूनशरीरी आपुल्या वसे रामायण ||७||

मनन करता भगवंताचे,रक्षण होईल आरोग्याचेराम जपाचे अखंड चिंतनशरीरी आपुल्या वसे रामायण ||८||

|| श्री रामार्पणमस्तु ||

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण