शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Ram Navami 2023: दुःखातही सुख दडलेले असते, हे राजा दशरथाला कळले 'तो' क्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 07:00 IST

Ram Navami 2023: राजा दशरथाला मिळालेला 'तो' मृत्यूचा शाप अन् वशिष्ठ ऋषींचा 'पॉझिटिव्ह ॲटिट्युड'

>> डॉ. भूषण फडके

ब्रह्मदेवांच्या आणि देवर्षी नारदांच्या आज्ञेप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी रामचरित्र लेखनास सुरुवात केली. सत्यप्रिय रामांनी केलेले सर्व कार्य वाल्मिकींना दिसू लागले. अयोध्येत रावण वधानंतर प्रभू रामांनी सीतेचा त्याग केला. ती महर्षी वाल्मिकींच्याच आश्रमात आली. तीला जुळी मुलं झाली तीच लव-कुश. महर्षींनी दोन्ही राजकुमारांना अस्त्र-शस्त्र विद्या, राजविद्या, गायनकलेत प्रवीण केले.

अयोध्येत प्रभू रामांनी अश्वमेध यज्ञ आरंभिला. महर्षी वाल्मिकीही  लव-कुश समवेत यज्ञमंडपात आले आणि  त्यांनी रामचरित्र गायनास सुरुवात केली. कानात प्राण आणून मंत्रमुग्ध होऊन सभा लव-कुशाच्या तोंडून श्रीरामचरित्र ऐकण्यात गुंग होती. आता लव-कुशांनी अयोध्यानगरीच्या वर्णनाला सुरुवात केली.

पवित्र शरयू नदीच्या तिरावरचा कोशल देश आणि याच देशातील समृद्ध सुखी असे अयोध्यानगर. या नगरीचा प्रजाहितदक्ष, वेदवत्ता आणि धर्मवत्ता राजा ''दशरथ''.  दशरथाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी या तीन राण्या होत्या.. दशरथाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते पण राजाला पुत्रसुख नव्हते याचे राजा आणि प्रजाजनांना दु:ख होते.

दशरथ राजा उत्तम धनुर्धर होते. शब्दवेधी बाण मारण्यात त्यांच्याइतका तरबेज त्याकाळी दुसरा कोणीही नव्हता. पुत्र नसल्याचे दु:ख हलके करण्यासाठी राजा मृगया करण्यासाठी जंगलात जात असे. एकदा दिवसभर प्रयत्न करूनही राजाला शिकार गवसली नाही. संध्याकाळ संपली , रात्र झाली राजा झाडावर बसला. एखादं श्वापद येईल आणि शब्दवेधी बाणांनी मी त्याला मारीन रात्री पाणवठ्यावर आवाज झाला. आवाजाच्या दिशेनी राजाने शब्दवेधी बाण मारला पण, ''मेलो, मेलो'' अशा आरोळीने राजा खाली उतरून पाहतो तो मुनीकुमार रक्ताच्या थारोळ्यात!

राजा दशरथ सत्यनिष्ठ आहे म्हणून बाण लागल्यावर तो उतरून चौकशी करतो नंतर श्रावणाच्या छातीतील बाण काढतो. मुनिकुमाराचा मृत्यू होतो.राजा  पाणी घेऊन त्याच्या वृद्ध माता-पित्यांकडे जातो. त्याचे माता-पिता दशरथाला शाप देतात. ''पुत्रवियोगाने तुलाही मृत्यू येईल.'' वृद्ध माता-पिता श्रावण-श्रावण करत प्राण सोडतात.

राजा तिघांचेही अंत्यसंस्कार करून राजप्रासादात येतो. पोटी पुत्र नाही त्यात एक शाप. राजाच्या चेहऱ्यावरील ताण वशिष्ठ ओळखतात आणि दु:खाचे कारण विचारतात. राजाकडून हकीगत कळताच वशिष्ठ ऋषी म्हणतात, ''राजा, हा शाप नसून तुझ्यासाठी वरदान आहे. अरे, मृत्युसमयी तुझ्याजवळ पुत्र राहणार नाही म्हणजेच तुला पुत्रसुख आहे हे निश्चितच''. श्रावण कुमारच्या आई वडिलांच्या शापातून वेगळा अर्थ घेणाऱ्या वशिष्ठ ऋषींचा दृष्टीकोन योग्य आहे. !” वाईटातून चांगल घेण्याची वशिष्ठांची योग्यता यातून दिसून येते. आपण आजकाल +ve attitude म्हणतो ते हेच. हेच आपल्याला रामायणातून शिकायचे आहे. रामायणातील प्रसंग जीवनोपयोगी शिकवण देतात, म्हणूनच रामायणाचा डोळसपणे अभ्यास होणे आवश्यक आहे.

ऋषश्रुंग ऋषींना पुत्रकामेष्टी यज्ञासाठी सन्मानाने बोलविण्यात येते. यज्ञ सफल होतो  आणि चैत्र महिन्यात शुद्ध नवमीला माध्यान्ह समयी कौसल्येला राम, सुमित्रेस लक्ष्मण-शत्रुघ्न तर कैकयीला भरत असे चार पुत्र होतात. रामाचा जन्म दुपारी का झाला? कारण लोकांच्या जीवनातील उन्हाळा (दाह) संपविण्यासाठी.  अयोध्येची जनता राम जन्माने आनंदित झाली.

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८

Email-bmphadke@gmail.com

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण