शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ram Navami 2023 : वाल्मीकींच्या रामायणावरून प्रेरणा घेत आणखी अठरा रामायणांची रचना केली गेली, कोणती ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 10:25 IST

Ram Navami 2023: वाल्मिकींचे रामायण खुद्द रामरायासमोर लव-कुश यांनी गायले; त्या रामायणाची मोहिनी पडून आणखी ज्या रामकथांची निर्मिती झाली, त्याबद्दल माहिती... 

महर्षी वाल्मीकी यांनी रामायण लिहिले. ते वाचन करून रामकथेचे व्यापकत्त्व अनेकांना उलगडले. त्यामुळे निरनिराळी रामायणे अस्तित्त्वात आली. ती पाहिली म्हणजे वाल्मिकीरामायण किती बहुविध पैलूंनी नटले आहे, हे लक्षात येईल. अष्टादश रामायणं त्या त्या ग्रंथकृत्यांच्या रामायण आविष्काराची वैशिष्ट्ये म्हणून वाचण्यासारखी आहेत. ती पुढीलप्रमाणे-

  • संवृत रामायण : हे सप्तसोपान रामायण नारदांनी सांगितले आहे. 
  • अगस्त्य रामायण : रामजन्महेतू या रामायणातील घटनावर्णन अगस्त्य ऋषींनी केले आहे.
  • लोमश रामायण : लोमश यांनी लिहिलेल्या रामायणात जलंधराचे कारण रामावतार आहे असे म्हटले जाते. सीता म्हणजे मिथीलाधिपतीला दिसलेली योगमाया असे त्यात म्हटले आहे. 
  • मंजुळ रामायण : यात सुतीक्ष्ण ऋषींनी भक्तिवर्णनात्मक रामायण लिहीले आहे. 
  • सौपद्य रामायण : यात अत्री ऋषींनी भक्तिरसातून रामायण लिहीले आहे. 
  • महामाली रामायण : शिवपार्वती संवादातून याची निर्मिती झाली आहे. 
  • सौहाद्र् रामायण : हे बरेचसे वाल्मिकी रामायणासारखेच आहे. शरभंग ऋषी याचे रचेते आहेत.
  • मणिरत्न रामायण : वसिष्ठ-अरुंधती संवादात्मक रामायण आहे.
  • सौय्य रामायण : हनुमान आणि सूर्यात झालेला संवाद या रामायणात आहे आणि तेच याचे रचेते आहेत. 
  • चांद्र रामायण : हनुमान आणि चंद्र यांच्यातील संवाद रामायण निर्मितीस कारणीभूत ठरला आहे.
  • मैन्द्र रामायण : या रामायणात मैन्द्र कौरव संवाद आहेत. 
  • स्वायंभुव रामायण : सीता मंदोदरीची कन्या, असे सांगणारे ब्रह्मदेव-नारद यांच्या संवादाचे हे रामायण आहे.
  • सुब्रह्म रामायण : यात अनेक विषयांचा समावेश आहे. तसेच प्रयाग सारख्या तीर्थक्षेत्राचे महत्त्वदेखील अधोरेखित केले आहे. याचे कर्ते कोण याचा उल्लेख नाही.
  • सुवर्चस रामायण : वाली-रामसंवाद, धोबी-धोबीपत्नी संवाद, लवकुश- राम युद्ध, महारावण युद्ध व वध, इ. विषयांचे वर्णन सुग्रीव आणि तारा यांच्या संवादातून निर्माण झाले. 
  • देव रामायण :रामपरीक्षा, कोप, रामशरणागती, रामविजय इ. सांगणारे रामायण हा इंद्र-जयंत यांच्यातील संवाद आहे.
  • श्रवण रामायण : चित्रकूटावर राम-भरत संवाद, मंथरानिर्मिती इ. वर्णन इंद्र आणि राजा जनक यांच्या संवादाचे रूप आहे. 
  • दुरन्त रामायण : राम परत आल्यावर भरताने रामाला राज्य देणे, कैकयी क्षोभ,किष्किंधावर्णन, श्रीरामाची वालीवध प्रतिज्ञा, रामप्रसादाचा प्रभाव, इ. विषय असणारे दीर्घ रामायण. वसिष्ठ मुनी आणि राजा जनक यांच्यातील संवाद आहे.
  • चंपू रामायण : रामभक्ती प्रकार, रामध्यान इ. विषय सांगणारे रामायण संवाद, शिव नारद संवादकर्ते असून तेच या रामायणाचे निर्माते आहेत. 

या सर्वाचे मूळ अर्थात वाल्मीकी रामायणच आहे. फक्त वेगवेगळ्या लेखकांनी पुनर्निवेदन करताना त्यात कल्पनेनुरूप योग्य अशी रामायण कालदर्शक अशी, भर घातली आणि फुलवायचा प्रयत्न केला आहे. निरनिराळ्या भारतीय भाषातली वीस प्रातिनिधिक रामायणे आहेत त्या सर्वांचा उगमही वाल्मीकी रामायणात सापडतो. यावरून कळते की रामायण केवळ महाकाव्य नाही तर प्रत्येकाचे आदर्श जीवनाचे स्वप्नं आहे. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण