शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Ram Navami 2023: श्रीराम हे जसे वात्सल्यमूर्ती होते, तसे दुष्टांचे निर्दाळण करण्याचे सामर्थ्यही बाळगत होते, जसे की... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 07:00 IST

Ram Navami 2023: उपद्रवी व्यक्तींना आधी समजावून बघा, अन्यथा शासन करा; रामायणाचा धडा 

>> डॉ. भूषण फडके

पंचवटीत लक्ष्मण सुंदर पर्णकुटी बांधतो. एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखा त्याठिकाणी येते आणि श्रीरामांना विवाह करण्याची गळ घालते. पण, आपण विवाहित आणि एकपत्नीव्रतधारी असल्याचे श्रीराम  सांगतात, तेव्हा ती सीतेवर धावून जाते. श्रीरामांच्या इशाऱ्यासरशी लक्ष्मण शूर्पणखेचे नाक, कान कापून टाकतो. अपमानित शूर्पणखा रावणाने सीमा रक्षणासाठी नेमलेल्या खर दुषणकडे जाते आणि आपली दुर्दशा सांगते. खर दूषण चौदा हजार राक्षसांसहित श्रीरामावर आक्रमण करतात, पण पराक्रमी राम संपूर्ण राक्षस सैन्याचा नि:पात करतात आणि खराला ठार मारतात. 

शूर्पणखा स्त्री असूनही उपद्रव देणारी होती म्हणून श्रीरामांनी लक्ष्मणाकरवी तिला शासन केले. आयुष्यात असे उपद्रवी कार्यात विघ्न आणतात, त्यांना आधी समजावून सांगावे, न ऐकल्यास त्यांना ते कोणीही असल्यास  शासन करावेच अशी शिकवण श्रीराम या प्रसंगातून आपल्याला देतात.

शूर्पणखा रडत ओरडत रावणाकडे जाते. ती म्हणते, “रावणा, मी तुझी बहीण आहे हे माहीत असूनदेखील त्या मानवाने माझी विटंबना केली. त्याची पत्नी अतिशय सुंदर आहे. ती तुझीच राणी शोभेल. ती तुझी पत्नी व्हावी म्हणून मी  त्याठिकाणी गेले तर लक्ष्मणाने माझे नाक, कान कापून मला कुरूप केले.” शूर्पणखेच्या शब्दांनी रावणाचा स्वाभिमान आणि अहंकार डिवचला गेला. तो सीतेच्या अपहरणाची योजना आखून मारीचाला या कामात सहाय्य करण्याची आज्ञा करतो. 

एक दिवस राम सीता पर्णकुटीबाहेर असतांना एक सोनेरी मृग सीतेच्या दृष्टीस पडतो. तो मृग आणून द्या असे सीता श्रीरामांकडे हट्ट धरते. सोनेरी मृग असणे शक्य नाही, हे श्रीराम जाणून होते. पण हरिणाच्या रुपात राक्षस असल्यास त्याला ठार करून आपले धर्मरक्षणाचे कार्यात हातभार लागेल असे वाटून, जानकीच्या रक्षणार्थ पर्णकुटीत थांबण्याची लक्ष्मणास आज्ञा देऊन  श्रीराम त्या हरिणाला आणण्यासाठी निघतात. 

तो सुवर्णमृग म्हणजे मारीच श्रीरामांना पर्णकुटीपासून बराच दूर नेतो. आता हा आपल्या हातात लागत नाही म्हणून श्रीराम त्याच्यावर बाण सोडतात तेव्हा तो मायावी मारीच , “हे सीते धाव! हे लक्ष्मणा धाव! अशी किंकाळी फोडतो. ती ऐकताच सीता लक्ष्मणास रामाच्या रक्षणार्थ जाण्याची आज्ञा देते”. श्रीरामांवर कोणतेही संकट येऊ शकत नाही, हे लक्ष्मण सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सीता म्हणते, “हे लक्ष्मणा, तुझ्या मनात माझ्याबद्दल लालसा उत्पन्न झाली आहे म्हणून तू श्रीरामांच्या सहायार्थ जाण्याचे टाळतो आहेस.”

ज्या भावासाठी सर्वस्वाचा त्याग केला त्याच्या भार्येकडून असे कटू वचन ऐकल्यानंतर लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी येते. तो आश्रमाच्या बाहेर एक रेषा ओढतो आणि या रेषेबाहेर न जाण्याचे बजावतो. लक्ष्मण लांब जाताच साधू वेशात दबा धरून बसलेला रावण पर्णकुटीच्या दरवाज्याजवळ येतो आणि भिक्षा मागतो. आपण भुकेले असून जमिनीवर गडबडा लोळण घेतो. सीतेला त्याची दया येते आणि सीता रेखा ओलांडून पर्णकुटीबाहेर येते. तोच रावण आपले मूळ रूप घेतो आणि सीतेला उचलून आकाशमार्गे लंकेकडे जायला निघतो. मारीचाला ठार करून प्रभू राम परत येत असतात तो त्यांना वाटेत लक्ष्मण भेटतो. जानकीची काळजी करत श्रीराम लक्ष्मणासह  पर्णकुटीकडे त्वरेने परत यायला निघतात.  

|| बोला सियावर रामचंद्र की जय ||

भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८Email-bmphadke@gmail.com

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण