शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

राम ही एक वृत्ती; जिथे वासना तिथे राम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:11 IST

परद्रव्य आणि परनारी या पापातून जो अलिप्त आहे किंवा या दोन पापांच्या विटाळाचा ज्याला स्पर्श झाला नाही तोच माणूस या संज्ञेला प्राप्त होतो..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र, ८७ ९३ ०३ ०३ ०३)

परद्रव्य आणि परनारी या पापातून जो अलिप्त आहे किंवा या दोन पापांच्या विटाळाचा ज्याला स्पर्श झाला नाही तोच माणूस या संज्ञेला प्राप्त होतो, असे संत म्हणतात. तुकोबाराय एका अभंगात आग्रहपूर्वक सांगतात -

साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील ।परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ ॥

आज बहुतांशी माणसं या दोन पापांपासूनच मुक्त असत नाहीत. इतिहास तर सांगतो की, या दोन पापात अडकतात त्यांचे संपूर्ण जीवनच रसातळाला जाते. रावण, दूर्योधन, कीचक, जयंत या राजांची या उदाहरणे पुराण प्रसिद्ध आहेत. 

आज अर्थ आणि काम या दोन मार्गांचा अनीतीने अवलंब करणारे रावण, दूर्योधन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असंख्य नाहीत का..? काम पिशाच्चाने झडपलेल्या रावणाने सीतेला पळवले हे सत्य पण तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला नाही, करु शकला नाही पण आजचे दुर्योधन मात्र कामवासनेच्या तृप्तीसाठी रक्ताची पवित्र नातीदेखील कलंकित करीत आहेत. बहिणीवर व मातेवर देखील बलात्कार केल्याच्या घटना वर्तमानपत्रांतून हरघडी वाचावयास मिळतात.

अर्थापेक्षाही काम वाईट..! म्हणून तर शास्त्रकारांनी पुरुषार्थाच्या चतुःसूत्रीत कामाला आणि अर्थाला मधे टाकले. पुरुषार्थाची चतुःसूत्री धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशीच आहे. माणूस मात्र हा शास्त्राधार संपूर्णपणे विसरला.

ज्याचे डोळे कामांधतेने भरले आहेत तोच खरा रावण समजावयास हवा. जो सातत्याने स्त्री सौंदर्याचेच चिंतन करतो, त्याला रावण म्हणू नये तर काय..? रावण हा अर्थ आणि काम या दोन विकारांमुळे राक्षस ठरला.

ज्या नेत्रांनी परमेश्वराच्या अप्रतिम लावण्याचा आनंद उपभोगावयाचा तेच डोळे जर कामवासनेने पीडित झाले तर रामदर्शन कसे होणार..?

डोळे निष्काम झाले तरच भक्तिमार्गाला सुरुवात करता येईल. डोळे बिघडले तर मन बिघडते. रावणाचे आधी डोळे बिघडले, मग मन बिघडले, नंतर संपूर्ण जीवनच बिघडले व राक्षसवर्गात त्याची वर्णी लागली. रावणाने जर रामकथेचे चिंतन, गायन, मनन केले असते तर ही दुर्दशा त्याच्या वाट्याला आलीच नसती. या दोन अनर्थांपासून वाचण्याचा एकच उपाय म्हणजे सत्संग..! श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात -

मुखी राम त्या काम बाधूं शकेना ।कदा अल्प धारिष्ट्य त्याचे चुकेना ॥

जिथे काम आहे तिथे राम वास करीतच नाही. राम ही एक वृत्ती आहे आणि माणसाने याच वृत्तीचा अंगीकार करावयास हवा..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक