शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राम ही एक वृत्ती; जिथे वासना तिथे राम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:11 IST

परद्रव्य आणि परनारी या पापातून जो अलिप्त आहे किंवा या दोन पापांच्या विटाळाचा ज्याला स्पर्श झाला नाही तोच माणूस या संज्ञेला प्राप्त होतो..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र, ८७ ९३ ०३ ०३ ०३)

परद्रव्य आणि परनारी या पापातून जो अलिप्त आहे किंवा या दोन पापांच्या विटाळाचा ज्याला स्पर्श झाला नाही तोच माणूस या संज्ञेला प्राप्त होतो, असे संत म्हणतात. तुकोबाराय एका अभंगात आग्रहपूर्वक सांगतात -

साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील ।परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ ॥

आज बहुतांशी माणसं या दोन पापांपासूनच मुक्त असत नाहीत. इतिहास तर सांगतो की, या दोन पापात अडकतात त्यांचे संपूर्ण जीवनच रसातळाला जाते. रावण, दूर्योधन, कीचक, जयंत या राजांची या उदाहरणे पुराण प्रसिद्ध आहेत. 

आज अर्थ आणि काम या दोन मार्गांचा अनीतीने अवलंब करणारे रावण, दूर्योधन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असंख्य नाहीत का..? काम पिशाच्चाने झडपलेल्या रावणाने सीतेला पळवले हे सत्य पण तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला नाही, करु शकला नाही पण आजचे दुर्योधन मात्र कामवासनेच्या तृप्तीसाठी रक्ताची पवित्र नातीदेखील कलंकित करीत आहेत. बहिणीवर व मातेवर देखील बलात्कार केल्याच्या घटना वर्तमानपत्रांतून हरघडी वाचावयास मिळतात.

अर्थापेक्षाही काम वाईट..! म्हणून तर शास्त्रकारांनी पुरुषार्थाच्या चतुःसूत्रीत कामाला आणि अर्थाला मधे टाकले. पुरुषार्थाची चतुःसूत्री धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशीच आहे. माणूस मात्र हा शास्त्राधार संपूर्णपणे विसरला.

ज्याचे डोळे कामांधतेने भरले आहेत तोच खरा रावण समजावयास हवा. जो सातत्याने स्त्री सौंदर्याचेच चिंतन करतो, त्याला रावण म्हणू नये तर काय..? रावण हा अर्थ आणि काम या दोन विकारांमुळे राक्षस ठरला.

ज्या नेत्रांनी परमेश्वराच्या अप्रतिम लावण्याचा आनंद उपभोगावयाचा तेच डोळे जर कामवासनेने पीडित झाले तर रामदर्शन कसे होणार..?

डोळे निष्काम झाले तरच भक्तिमार्गाला सुरुवात करता येईल. डोळे बिघडले तर मन बिघडते. रावणाचे आधी डोळे बिघडले, मग मन बिघडले, नंतर संपूर्ण जीवनच बिघडले व राक्षसवर्गात त्याची वर्णी लागली. रावणाने जर रामकथेचे चिंतन, गायन, मनन केले असते तर ही दुर्दशा त्याच्या वाट्याला आलीच नसती. या दोन अनर्थांपासून वाचण्याचा एकच उपाय म्हणजे सत्संग..! श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात -

मुखी राम त्या काम बाधूं शकेना ।कदा अल्प धारिष्ट्य त्याचे चुकेना ॥

जिथे काम आहे तिथे राम वास करीतच नाही. राम ही एक वृत्ती आहे आणि माणसाने याच वृत्तीचा अंगीकार करावयास हवा..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक