शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

Rakshabandhan 2022 Bhadra Kaal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; जाणून घ्या, कशामुळे देते अशुभ फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 22:11 IST

भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते. 

हिंदू धर्मात रक्षाबंधन उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या उत्सवाच्या दिवशीच भद्रा काळ आला आहे. सामान्य मान्यतेनुसार, भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते. 

भद्रा ही सूर्य देव आणि त्यांची पत्‍नी छाया यांची मुलगी आहे. याच बोरोबर ती शिनीदेवाची सख्खी बहिनही आहे. ज्या प्रकारे शनिदेवांचा स्वभाव कडक मानला जातो. त्याच प्रकारे त्यांची बहीण भद्रा हिचा स्वभावही कडक मानला जातो. पौराणिक कथेनुसार भद्रा ही अतिशय कुरूप असून, ती लहानपणापासूनच ऋषी-मुनींचे यज्ञ आणि अनुष्ठानांत अडथळे आणत होती. 

यामुळे, अखेर सूर्य देवांनी चिंतित होऊन ब्रह्माजींकडे सल्ला मागीतला. तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या उद्धटपणावर नियंत्रणात आणण्यासाठी पंचांगाचे एक मुख्य अंग असलेल्या विष्‍टी करणमध्ये तिला स्थान दिले. याच बरोबर, आता जे कुणी तुझ्या काळात काही शुभ काम करेल, त्यात तू विध्‍न आण, असे सांगितले. तेव्हापासूनच भद्रा काळात कुठल्याही प्रकारचे शुभ काम केले जात नाही. 

भद्रा काळात राखीही बांधत नाहीत -  गृह प्रवेश, नव्या कामांना सुरुवात करणे, पूजा-अनुष्‍ठान आदींशिवाय भद्रा काळात राखीही बांधली जात नाही. पौराणिक कथेनुसार, रावणाच्या बहिणिने त्याला भद्रा काळातच राखी बांधली होती आणि यानंतर, एका वर्षाच्या आतच भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. यामुळे, भद्रा काळात राखीदेखील बांधली जात नाही, असे मानले जाते.(टीप : येथे देण्यात आलेली माहिती ही सर्व सामान्य मान्यतांवर आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी कत नाही.)

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन