शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

'या' चमत्कारी बाबाच्या नाचण्याने गावात पडायचा पाऊस; विश्वास नाही? वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 17:18 IST

त्या गावाला दुष्काळाचा शाप होता. लोकांना प्यायला पाणी नाही, तर गाई गुरांना, शेतीला पाणी कुठून आणणार? गावकरी हवालदिल झाले. त्यांनी मिळून चमत्कारी बाबाला साकडे घातले आणि पाऊस पाडण्याचा चमत्कार त्यांनी करावा, असे विनवले. 

चमत्काराला नमस्कार करणे ही आपल्या सर्वांची फार जुनी खोड आहे. जोपर्यंत काही चमत्कार घडत नाही, तोवर लोकांचा विश्वास बसत नाही. चमत्कार घडणे हा आभास आहे, की समजून उमजून केलेली कृती? चला, या गोष्टीवरून जाणून घेऊया.

एका गावात एक फकीर बाबा राहत होते. ते एका पायाने पंगू होते. मात्र एका पायाच्या जोरावर ते बेभान होऊन नाचत असत. त्यांचे वागणे, बोलणे, चालणे, नाचणे सगळेच चमत्कारिक असे. काही जण त्यांना भोंदू बाबा म्हणत, तर काही जण तपस्वी साधू. परंतु, त्या फकीराने कधीच मला मान द्या, माझी पूजा करा, असे गावकऱ्यांना सांगितले नाही. मात्र, हळू हळू त्यांची अनुभूती येऊ लागताच लोक त्यांना चमत्कारीक बाबा म्हणून ओळखू लागले. 

त्या गावाला दुष्काळाचा शाप होता. गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागे. लोकांना प्यायला पाणी नाही, तर गाई गुरांना, शेतीला पाणी कुठून आणणार? गावकरी हवालदिल झाले. त्यांनी मिळून चमत्कारी बाबाला साकडे घातले आणि पाऊस पाडण्याचा चमत्कार त्यांनी करावा, असे विनवले. 

चमत्कारी बाबांनी डोळे मिटून ध्यान लावले आणि सर्वांना निश्चिंत होऊन परत जायला सांगितले. आज रात्री पाऊस पडेल, याची त्यांनी शाश्वती दिली. सगळ्यांना पाऊस पडणार या विचाराने गार गार वाटू लागले. त्यांनी बाबांचे आभार मानले आणि गावकरी परतले. सगळे जण घरी गेले तरी प्रत्येकाचे कान आणि डोळे आभाळाकडे लागले होते. सायंकाळ होऊ लागली, तसतशी गावकऱ्यांची उत्कंठा वाढू लागली. रात्रीच्या चंद्रप्रकाशात कुठेही ढगांची दाटी नाही, की वातावरणात गारवा नाही. चमत्कारी बाबा आपल्याला निराश करणार असे वाटत असतानाच, एका एक चंद्र झाकोळला जाऊ लागला. ढग जमा झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि तापलेल्या जमिनीवर पाण्याचे एका मागोमाग एक टपोरे थेंब बरसू लागले. गावकऱ्यांनी नाचून, गाऊन, पावसात भिजून जल्लोष केला.

गावकरी त्या भर पावसात चमत्कारी बाबांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले. तिथे जाऊन पाहतो तर काय, चमत्कारी बाबा एका कुबडीच्या सहाय्याने एका पायावर उड्या मारत नाचण्यात रंगले होते. गावकरी त्यांचा आवेश बघतच राहिले. त्यांचे नाचणे थांबले, तसा पाऊसही कमी होत होत थांबला.

लोकांनी बाबांना डोक्यावर घेतले. तेव्हापासून गावात जेव्हा केव्हा पाण्याची कमतरता भासू लागेल, तेव्हा तेव्हा चमत्कारी बाबांना सांगून ते पावसाला बोलावून घेत. 

त्या गावाच्या मार्गे प्रवास करत असताना बाहेर गावची चार पाच तरुण मुले रात्रीच्या वेळी गावात थांबली. मुलांना गावकऱ्यांकडून चमत्कारी बाबांबद्दल कळले. मुलांनी हसून गावकऱ्यांची थट्टा केली. आणि ही सगळी अंधश्रद्धा आहे, असे म्हणत चमत्कारी बाबांचा चमत्कार नाकारला. गावकऱ्यांनी मुलांची आणि बाबांची भेट घालून दिली. मुले म्हणाली, एवढे असेल, तर आम्हीही नाचतो, मग तुम्ही नाचा. कोणाच्या नाचण्याने पाऊस पडतो, ते पाहूच! 

चमत्कारी बाबांनी आव्हान स्वीकारले. मुले एक एक करून हर तऱ्हेने नाचू लागली. त्यांचे नाचून झाल्यावर बाबांनी नाचायला सुरुवात केली आणि साधारण तासभर नाचून झाल्यावर धो धो पाऊस पडू लागला. मुलांनी बाबांचे पाय धरले आणि त्यांनी हा चमत्कार कसा घडवला, हे विचारले. यावर बाबांनी दिलेले उत्तर चमत्कारिक नसून आपल्या सर्वांच्याच आयुष्यात चमत्कार घडवेल असे आहे.

बाबा म्हणाले, 'माझ्या नाचण्याने पाऊस पडतो, कारण मी मनाशी ठरवून टाकतो, की मी नाचलो तर पाऊस पडेल आणि मी तोवर नाचतो, जोवर पाऊस पडत नाही.' याचाच अर्थ प्रत्येकाने आपल्या आयुष्यात चमत्कार घडवताना स्वत:ला दिलास दिला पाहिजे, की माझ्या प्रयत्नाला यश मिळेल आणि प्रयत्न तोवर करा, जोवर यश मिळत नाही. ही जिद्द ठेवली, तर कोणाच्याही आयुष्यात चमत्कार घडू शकेल.