शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

भक्त प्रल्हाद यांचा अवतार समजले जाणारे राघवेंद्र स्वामी हे महान संत परंपरेतील एक मुख्य संत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:24 IST

राघवेंद्र स्वामी यांचे चरित्र अनेक चमत्कारिक प्रसंगांनी युक्त असले, तरीदेखील त्यांनी धर्म कार्यार्थ केलेले काम आणि त्यातून घडवलेले बदल अधिक चमत्कारिक आहेत.

जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेईन  माझा अंश पाठवून भक्तांवरील संकट दूर करेन, अशी ग्वाही साक्षात भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिली आहे. 

शान्तो,महान्तो,निर्वसंती संतो वसंत वल्लोक हितं चरन्त  |तीर्णाः स्वयं भीम भवार्णवं जना नहेतुनान्यानपी तारयन्ताः ||

सुजलाम सुफलाम अशा भारत भूमीवर अनेक आक्रमणे झाली. अनेक योध्यांनी, महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीरांनी ती थोपवून धरली आणि परतावूनही लावली. त्यात शूर वीरांच्या बरोबरीने महत्त्वपूर्ण योगदान दिले, संतांनी, महंतांनी, साधू, ऋषीमुनी आणि अनेक तपस्विनी! अशाच भारत भूमीचा उद्धार करण्यासाठी तसेच हिंदू धर्माचा गौरव करण्यासाठी, धर्माचे रक्षण करणाऱ्यांमध्ये एक नाव घेतले जाते, परमपूज्य राघवेंद्र स्वामी! धर्म कार्याची  धुरा स्वीकारून ते मठाधिपती झाले, तो आजचाच दिवस. त्यांचा शिष्य परिवार केवळ दक्षिण भारतात नाही, तर महाराष्ट्रात व परदेशातही पसरलेला आहे. तसेच त्यांच्या नावे सुरू असलेल्या मठामधून धार्मिक कार्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. 

श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्वज्ञानी होत. ते इ.स. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्रीमध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. आंध्र प्रदेशातील मंत्रालयम् येथील त्यांची समाधी भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. राघवेंद्रस्वामींच्या कीर्तीने भारावलेल्या भाविकांची आजही त्यांच्या समाधीकडे गर्दी असते.

श्री राघवेंद्र तीर्थरू यांचे जन्मनांव वेंकटनाथ असून, त्यांचा जन्म सध्याच्या तमिळनाडू राज्यातील भुवनगिरी गावात एका कानडी भाषिक मध्व ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मवर्षाविषयी पुरेसा आधार नसल्याने तो इ.स. १५९५ ते १६०१ दरम्यान झाला असावा असे अनुमान आहे. त्यांना प्राथमिक शिक्षण, त्यांचे मेहुणे लक्ष्मीनरसिंहाचार्य ह्यांनी दिले. पुढे ज्ञानार्जनासाठी त्यांना कुंभकोणम् येथे पाठवले गेले. त्याच गावी संन्यास घेऊन त्यांनी ‘राघवेंद्र तीर्थ’ हे नाव ग्रहण केले. राघवेंद्र स्वामींना भगवान विष्णू यांचा लाडका भक्त प्रल्हाद याचा अवतार मानले जाते. 

राघवेंद्रांनी आपले गुरु सुधींद्र तीर्थांकडून, श्री मठाचे मुख्य म्हणून धुरा स्वीकारली, तो आजचा दिवस, अर्थात फाल्गुन द्वितीया. मध्वाचार्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी राघवेंद्रांनी संपूर्ण दक्षिण भारतात प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी अनेक पूर्वानुभूत चमत्कार केले. १६७१ साली त्यांनी मंत्रालय येथे जिवंत समाधी घेतली. तत्पूर्वी त्यांच्या शिष्यांना त्यांनी पुढील ८०० वर्षे आत्मारूपाने शाश्वत राहण्याचे वचन दिले.

पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय चभजतां कल्पवृक्षाय नमताम् कामधेनवे। 

राघवेंद्र स्वामी यांचे चरित्र अनेक चमत्कारिक प्रसंगांनी युक्त असले, तरीदेखील त्यांनी धर्म कार्यार्थ केलेले काम आणि त्यातून घडवलेले बदल अधिक चमत्कारिक आहेत. त्यांना विनम्र अभिवादन.