शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 10:49 IST

मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला.

- फा. फ्रान्सिस दिब्रिटोजन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची एकच धडपड असते ती सुखी असण्यासाठी! ‘सुख पाहता जवा एवढे, दु:ख पर्वता एवढे,’ असे संत तुकोबा म्हणतात ते अगदी खरे आहे. चित्तवृत्ती प्रसन्न असणे, यातच खरे सुख सामावलेले आहे. मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला. ‘हे सारं मला कुठे घेऊन जाणार आहे? खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?’ या सुखाचा शोध घेत घेत ते थेट तिबेटला पोहोचले. बौद्ध भिक्षू झाले. इतकेच नाही तर मठाधिपती झाले. सुख म्हणजे आत्मशोध यावर त्यांनी विचार व्यक्त केले. सुखाचा शोध लागत नाही, तोपर्यंत माणूस अस्वस्थ असतो. सुख म्हणजे निरासक्त अवस्थेला पोहोचणे, निरपेक्ष होणे. कारण दु:खाचा उगम अपेक्षेतून होतो, असे बुद्धाने म्हटले आहे. माणूस निरासक्त अवस्थेला पोहोचतो तेव्हा तो अंतर्यामी आनंदी होतो. शरीर, इंद्रियांना मिळते ते सुख व मनाला होतो तो आनंद! सुख शरीराला आनंद देते तर आनंद मनाला चिरकाळ सुख देतो. आपण आनंदापेक्षा सुखाच्या मागे असतो. ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे,’ अशी आपली अवस्था होते. प्रार्थनेतही आपण सुखाची मागणी करतो आनंदाची नाही. एक ग्रीक योगी थंडीच्या दिवसात ऊन खात बसला होता. इतक्यात तेथे राजा आला व त्याला म्हणाला, ‘साधुमहाराज, तुम्ही हवं ते मागा मी देईन.’ तेव्हा हात जोडून योगी विनम्रपणे म्हणाला, ‘महाराज, तुम्ही जरा बाजूला सरकलात तर बरे होईल. तुमच्यामुळे माझं ऊन अडलं आहे.’ योग्याचा आनंद त्यात होता. माणसे सेवानिवृत्त होतात; पण आसक्तीतून निवृत्त होत नाहीत. वानप्रस्थाश्रमात वनामध्ये प्रस्थान करायचे असते. म्हणजे निसर्गाकडे वळायचे असते. गरजा कमी करून प्रपंचातून निरासक्त व्हायचे असते; पण आज किती लोक या अवस्थेला पोहोचले आहेत? आनंद हे आपल्या जगण्याचं अंतिम ध्येय असायला हवे. अध्यात्मामध्ये परमेश्वराला सत् चित् आनंद म्हटले आहे, हेच जीवनाचे खरे सार आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक