शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 10:49 IST

मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला.

- फा. फ्रान्सिस दिब्रिटोजन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची एकच धडपड असते ती सुखी असण्यासाठी! ‘सुख पाहता जवा एवढे, दु:ख पर्वता एवढे,’ असे संत तुकोबा म्हणतात ते अगदी खरे आहे. चित्तवृत्ती प्रसन्न असणे, यातच खरे सुख सामावलेले आहे. मत्तेय नावाचे फें्रच शास्त्रज्ञ आहेत. यशस्वी शास्त्रज्ञ अशा उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना एकेदिवशी त्यांना साक्षात्कार झाला. ‘हे सारं मला कुठे घेऊन जाणार आहे? खरंच मी अंतर्यामी सुखी आहे का?’ या सुखाचा शोध घेत घेत ते थेट तिबेटला पोहोचले. बौद्ध भिक्षू झाले. इतकेच नाही तर मठाधिपती झाले. सुख म्हणजे आत्मशोध यावर त्यांनी विचार व्यक्त केले. सुखाचा शोध लागत नाही, तोपर्यंत माणूस अस्वस्थ असतो. सुख म्हणजे निरासक्त अवस्थेला पोहोचणे, निरपेक्ष होणे. कारण दु:खाचा उगम अपेक्षेतून होतो, असे बुद्धाने म्हटले आहे. माणूस निरासक्त अवस्थेला पोहोचतो तेव्हा तो अंतर्यामी आनंदी होतो. शरीर, इंद्रियांना मिळते ते सुख व मनाला होतो तो आनंद! सुख शरीराला आनंद देते तर आनंद मनाला चिरकाळ सुख देतो. आपण आनंदापेक्षा सुखाच्या मागे असतो. ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे,’ अशी आपली अवस्था होते. प्रार्थनेतही आपण सुखाची मागणी करतो आनंदाची नाही. एक ग्रीक योगी थंडीच्या दिवसात ऊन खात बसला होता. इतक्यात तेथे राजा आला व त्याला म्हणाला, ‘साधुमहाराज, तुम्ही हवं ते मागा मी देईन.’ तेव्हा हात जोडून योगी विनम्रपणे म्हणाला, ‘महाराज, तुम्ही जरा बाजूला सरकलात तर बरे होईल. तुमच्यामुळे माझं ऊन अडलं आहे.’ योग्याचा आनंद त्यात होता. माणसे सेवानिवृत्त होतात; पण आसक्तीतून निवृत्त होत नाहीत. वानप्रस्थाश्रमात वनामध्ये प्रस्थान करायचे असते. म्हणजे निसर्गाकडे वळायचे असते. गरजा कमी करून प्रपंचातून निरासक्त व्हायचे असते; पण आज किती लोक या अवस्थेला पोहोचले आहेत? आनंद हे आपल्या जगण्याचं अंतिम ध्येय असायला हवे. अध्यात्मामध्ये परमेश्वराला सत् चित् आनंद म्हटले आहे, हेच जीवनाचे खरे सार आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक