शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
3
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
4
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
5
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
6
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
7
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
8
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
9
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
10
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
11
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
12
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
13
लेख: श्रीमंत जिल्ह्यांना खुराक आणि गरीब जिल्हे मात्र उपाशीच?
14
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
15
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
16
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
17
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
18
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
19
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
20
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया

Puja vidhi : आपण रोजच देवपूजा करतो, पण शास्त्राने सांगितलेले दहा नियम पाळतो का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 07:00 IST

Puja vidhi : देवपूजा ही आपण देवासाठी नाही तर आपल्या मनःशांतीसाठी करतो, पण ती उरकून न टाकता नियमांना धरून केली तर त्याचे अधिक फळ लाभते. 

आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा, ही भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. पूजा हे 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' राहण्याचे निमित्त असते. जीव आणि शिवाचा संवाद असतो. पूजा करताना मन एकाग्र होणे अभिप्रेत असते. त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बिल्वपत्र किंवा फुल भगवंतापर्यंत पोहोचावे, आपण अर्पण केलेला नैवेद्य त्याने ग्रहण करावा, अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी.

मात्र प्रत्यक्षात घडते काही वेगळेच! पूजा कोण करणार यावरून नवरा बायकोत वाद होतात. कारण तेवढ्यापुरताही त्यांच्याजवळ वेळ नसतो. धुसफुसत दोघांपैकी एक जण पूजा 'उरकून' घेतो. पूर्वी हे काम घरातले ज्येष्ठ आत्मीयतेने आणि तल्लीनतेने करत असत आणि नातवंड त्यांच्याबरोबर बसून पूजा विधी शिकून घेत असत. परंतु आता तसे होत नाही. ज्या आत्मारामाशी आपला दिवसभरातुन क्षणभरही संवाद घडत नाही, त्याने आपल्या संकटात धावून यावे अशी अवाजवी अपेक्षा मात्र बाळगली जाते आणि त्याने हाक ऐकली नाही की त्यालाच दोषी ठरवले जाते. या चुका टाळण्यासाठी शास्त्राने काही उपाय सुचवले आहेत...

>>देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये. 

>>पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा. 

>>जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून करावा. जप माळ धरलेल्या हातावर गॊमुखी धरावी. म्हणजे जप किती बाकी आहे, याकडे वारंवार लक्ष जात नाही. मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो. 

>>जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो, तिथेही भूमिस्पर्श करून नमस्कार करावा. 

>>देवपूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे असले, तरीही द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने खुडू नयेत. 

>>तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये. तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा. 

>>शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात. तसे करणे शुभ मानले जाते. 

>>देव पूजेत, यज्ञविधीत पांढरे तीळ नाही, तर काळ्या तिळांचा वापर करावा. 

>>कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान दक्षिणा उजव्या हाताने द्यावी. 

>>शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, विष्णूला तुळस, लक्ष्मीला कमळ असे ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे ते अर्पण करावे. 

>>महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये. 

>>देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात टाकून न देता बागेतील रोपांना खत म्हणून घालावे आणि पुर्नवापरात आणावे. 

>>पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे. आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावे आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे. 

>>देवपूजेत तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही, परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सान्निध्यात घालवतो, तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा, हा पूजेचा मुख्य हेतू असतो. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३