शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

बिचारे विवाहित पुरुष! त्यांना भारतातील 'या' मंदिरात असते 'नो एंट्री!' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:22 IST

देशात असे एक मंदिर आहे जिथे विवाहित पुरुष जाण्यास घाबरतात. यामागे एक विशेष कारण आहे जे पौराणिक कथांशी संबंधित आहे. या मंदिरात केवळ अविवाहित मुले-मुली आणि विवाहित महिलाच जातात.

साधारणपणे, लग्नानंतर वधू-वरांनी देवी-देवतांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा जवळपास सर्वच धर्मांमध्ये आहे. प्रसिद्ध मंदिरात किंवा धार्मिक स्थळांमध्ये वर वधू देवदर्शनासाठी जातात. परंतु आपल्या देशात एक असं मंदिर आहे जिथे लग्नानंतर विवाहित पुरुष जात नाहीत. त्यांच्या तिथे जाण्याने अनेक त्रास सहन करावे लागतात अशी लोकसमजूत प्रचलित आहे. ते मंदिर नेमके कोणते आणि कुठे ते जाणून घेऊ. 

पुष्करचे ब्रह्म मंदिर 

ब्रह्मदेवाबद्दल आपण अनेक कथा ऐकल्या आहेत परंतु त्यांचे मंदिर क्वचितच बघायला मिळते. असेच एक मंदिर राजस्थान येथील पुष्कर येथे आहे. असे मानले जाते की जर नवविवाहित मुले या मंदिरात आली तर त्यांना वैवाहिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. यामागचे कारण म्हणजे ब्रह्मदेवाला मिळालेला शाप!

पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी राजस्थानातील पुष्कर येथे यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञात त्यांना पत्नीसोबत बसावे लागले, परंतु पत्नी सावित्रीला यायला उशीर होत असल्याचे पाहून त्यांनी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री प्रकट केली आणि तिच्याशी विवाह केला आणि यज्ञ करण्यास सुरुवात केली. जेव्हा सावित्री पोहोचली तेव्हा ब्रह्माजींच्या शेजारी एक दुसरी स्त्री बसलेली पाहून तिला राग आला आणि शाप दिला की ज्या जगाच्या निर्मितीसाठी तुम्ही माझी वाट न पाहता दुसऱ्या स्त्रीची निर्मिती केलीत, ते जग तुमची पूजा करणार नाही. त्यांनाही तुमचा विसर पडेल. जिथे तुमचे मंदिर असले त्या मंदिरात विवाहित पुरुषांनी प्रवेश केला तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. मात्र, या एका चुकीसाठी तुम्हाला संपूर्ण दोषी न ठरवता अविवाहित पुरुष, तसेच सर्व वयोगटाच्या तसेच विवाहित, अविवाहित महिला तुमचे दर्शन घेतील आणि पूजा करून विश्वनिर्मितीसाठी कृतज्ञतादेखील व्यक्त करतील. 

सावित्रीचे मंदिर 

पुष्करच्या या मंदिराजवळ त्यांच्या पत्नी सावित्री मातेचे मंदिर एका वेगळ्या टेकडीवर बांधलेले आहे. वरील कथेनुसार ब्रह्मदेवाला शाप देऊन राग शांत झाल्यावर सावित्रीने पुष्करजवळच्या टेकडीवर जाऊन तपश्चर्येला सुरुवात केली आणि तपश्चर्येत लीन झाली. नंतर तिथेच राहिली. म्हणून महिला भाविक या मंदिरात जाऊन आल्यावर सौभाग्य वाण म्हणून मेहंदी, कुंकू आणि बांगड्या इत्यादी वस्तू खरेदी करतात आणि आपल्या सौभाग्यासाठी सावित्री मातेची पूजा करतात.