शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बिचारे विवाहित पुरुष! त्यांना भारतातील 'या' मंदिरात असते 'नो एंट्री!' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:22 IST

देशात असे एक मंदिर आहे जिथे विवाहित पुरुष जाण्यास घाबरतात. यामागे एक विशेष कारण आहे जे पौराणिक कथांशी संबंधित आहे. या मंदिरात केवळ अविवाहित मुले-मुली आणि विवाहित महिलाच जातात.

साधारणपणे, लग्नानंतर वधू-वरांनी देवी-देवतांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा जवळपास सर्वच धर्मांमध्ये आहे. प्रसिद्ध मंदिरात किंवा धार्मिक स्थळांमध्ये वर वधू देवदर्शनासाठी जातात. परंतु आपल्या देशात एक असं मंदिर आहे जिथे लग्नानंतर विवाहित पुरुष जात नाहीत. त्यांच्या तिथे जाण्याने अनेक त्रास सहन करावे लागतात अशी लोकसमजूत प्रचलित आहे. ते मंदिर नेमके कोणते आणि कुठे ते जाणून घेऊ. 

पुष्करचे ब्रह्म मंदिर 

ब्रह्मदेवाबद्दल आपण अनेक कथा ऐकल्या आहेत परंतु त्यांचे मंदिर क्वचितच बघायला मिळते. असेच एक मंदिर राजस्थान येथील पुष्कर येथे आहे. असे मानले जाते की जर नवविवाहित मुले या मंदिरात आली तर त्यांना वैवाहिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. यामागचे कारण म्हणजे ब्रह्मदेवाला मिळालेला शाप!

पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी राजस्थानातील पुष्कर येथे यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञात त्यांना पत्नीसोबत बसावे लागले, परंतु पत्नी सावित्रीला यायला उशीर होत असल्याचे पाहून त्यांनी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री प्रकट केली आणि तिच्याशी विवाह केला आणि यज्ञ करण्यास सुरुवात केली. जेव्हा सावित्री पोहोचली तेव्हा ब्रह्माजींच्या शेजारी एक दुसरी स्त्री बसलेली पाहून तिला राग आला आणि शाप दिला की ज्या जगाच्या निर्मितीसाठी तुम्ही माझी वाट न पाहता दुसऱ्या स्त्रीची निर्मिती केलीत, ते जग तुमची पूजा करणार नाही. त्यांनाही तुमचा विसर पडेल. जिथे तुमचे मंदिर असले त्या मंदिरात विवाहित पुरुषांनी प्रवेश केला तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. मात्र, या एका चुकीसाठी तुम्हाला संपूर्ण दोषी न ठरवता अविवाहित पुरुष, तसेच सर्व वयोगटाच्या तसेच विवाहित, अविवाहित महिला तुमचे दर्शन घेतील आणि पूजा करून विश्वनिर्मितीसाठी कृतज्ञतादेखील व्यक्त करतील. 

सावित्रीचे मंदिर 

पुष्करच्या या मंदिराजवळ त्यांच्या पत्नी सावित्री मातेचे मंदिर एका वेगळ्या टेकडीवर बांधलेले आहे. वरील कथेनुसार ब्रह्मदेवाला शाप देऊन राग शांत झाल्यावर सावित्रीने पुष्करजवळच्या टेकडीवर जाऊन तपश्चर्येला सुरुवात केली आणि तपश्चर्येत लीन झाली. नंतर तिथेच राहिली. म्हणून महिला भाविक या मंदिरात जाऊन आल्यावर सौभाग्य वाण म्हणून मेहंदी, कुंकू आणि बांगड्या इत्यादी वस्तू खरेदी करतात आणि आपल्या सौभाग्यासाठी सावित्री मातेची पूजा करतात.