शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बिचारे विवाहित पुरुष! त्यांना भारतातील 'या' मंदिरात असते 'नो एंट्री!' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:22 IST

देशात असे एक मंदिर आहे जिथे विवाहित पुरुष जाण्यास घाबरतात. यामागे एक विशेष कारण आहे जे पौराणिक कथांशी संबंधित आहे. या मंदिरात केवळ अविवाहित मुले-मुली आणि विवाहित महिलाच जातात.

साधारणपणे, लग्नानंतर वधू-वरांनी देवी-देवतांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा जवळपास सर्वच धर्मांमध्ये आहे. प्रसिद्ध मंदिरात किंवा धार्मिक स्थळांमध्ये वर वधू देवदर्शनासाठी जातात. परंतु आपल्या देशात एक असं मंदिर आहे जिथे लग्नानंतर विवाहित पुरुष जात नाहीत. त्यांच्या तिथे जाण्याने अनेक त्रास सहन करावे लागतात अशी लोकसमजूत प्रचलित आहे. ते मंदिर नेमके कोणते आणि कुठे ते जाणून घेऊ. 

पुष्करचे ब्रह्म मंदिर 

ब्रह्मदेवाबद्दल आपण अनेक कथा ऐकल्या आहेत परंतु त्यांचे मंदिर क्वचितच बघायला मिळते. असेच एक मंदिर राजस्थान येथील पुष्कर येथे आहे. असे मानले जाते की जर नवविवाहित मुले या मंदिरात आली तर त्यांना वैवाहिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. यामागचे कारण म्हणजे ब्रह्मदेवाला मिळालेला शाप!

पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी राजस्थानातील पुष्कर येथे यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञात त्यांना पत्नीसोबत बसावे लागले, परंतु पत्नी सावित्रीला यायला उशीर होत असल्याचे पाहून त्यांनी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री प्रकट केली आणि तिच्याशी विवाह केला आणि यज्ञ करण्यास सुरुवात केली. जेव्हा सावित्री पोहोचली तेव्हा ब्रह्माजींच्या शेजारी एक दुसरी स्त्री बसलेली पाहून तिला राग आला आणि शाप दिला की ज्या जगाच्या निर्मितीसाठी तुम्ही माझी वाट न पाहता दुसऱ्या स्त्रीची निर्मिती केलीत, ते जग तुमची पूजा करणार नाही. त्यांनाही तुमचा विसर पडेल. जिथे तुमचे मंदिर असले त्या मंदिरात विवाहित पुरुषांनी प्रवेश केला तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. मात्र, या एका चुकीसाठी तुम्हाला संपूर्ण दोषी न ठरवता अविवाहित पुरुष, तसेच सर्व वयोगटाच्या तसेच विवाहित, अविवाहित महिला तुमचे दर्शन घेतील आणि पूजा करून विश्वनिर्मितीसाठी कृतज्ञतादेखील व्यक्त करतील. 

सावित्रीचे मंदिर 

पुष्करच्या या मंदिराजवळ त्यांच्या पत्नी सावित्री मातेचे मंदिर एका वेगळ्या टेकडीवर बांधलेले आहे. वरील कथेनुसार ब्रह्मदेवाला शाप देऊन राग शांत झाल्यावर सावित्रीने पुष्करजवळच्या टेकडीवर जाऊन तपश्चर्येला सुरुवात केली आणि तपश्चर्येत लीन झाली. नंतर तिथेच राहिली. म्हणून महिला भाविक या मंदिरात जाऊन आल्यावर सौभाग्य वाण म्हणून मेहंदी, कुंकू आणि बांगड्या इत्यादी वस्तू खरेदी करतात आणि आपल्या सौभाग्यासाठी सावित्री मातेची पूजा करतात.