शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:29 IST

Pitru Paksha 2025 in Maharashtra: जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे.

- दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)भाद्रपद द्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. यावर्षी  सोमवार, ८ सप्टेंबर ते रविवार, २१ सप्टेंबर २०२५ ‘पितृपक्ष’ आलेला आहे. समाजात   पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत.आपल्या मृत आप्तेष्टांचे आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबाच्या घरी राहायला येतात, अशी समजूत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी दररोज महालय - श्राद्ध करावे असे शास्त्रात म्हटले आहे. 

हे श्राद्ध करताना  पिता म्हणजे वडील, पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह म्हणजे पणजोबा, माता म्हणजे आई, पितामही म्हणजे आजी आणि प्रपितामही म्हणजे पणजी यांच्यापैकी जे कोणी मृत असतील त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करण्यात येतो. जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे.

भाद्रपद कृष्ण पक्षातच श्राद्ध करण्यास का सांगितले  आहे, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘मातीच्या गणेशमूर्तीचे’ म्हणजेच पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. 

पितृपक्षाविषयी समाजात अनेक समज-गैरसमज  आढळतात. ‘पितृपक्ष हा वाईट आहे, पितृपक्ष हा अशुभ आहे. पण त्यात तथ्य नसते. हे सर्व  गैरसमज असतात. पितृपक्ष हा वाईट नसतो तसेच तो अशुभही नसतो. तुम्हीच विचार करा की भाद्रपद कृष्णपक्षात म्हणजेच पितृपक्षात जर आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या घरात राहायला येणार असतील तर ते वाईट कसे असू शकेल. 

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिले, घर, धनसंपत्ती ठेवली त्यांचे आत्मे या पंधरा दिवसासाठी आपल्या घरात राहायला येणार असतील तर त्यात अशुभ कसे असू शकेल? उलट आपल्या चांगल्या कामांना व परिस्थितीला पाहून त्या आत्म्याना आनंद-समाधानच वाटेल ना? उलट त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा  आपल्या प्रत्येक कामाला मिळतील होय ना? हा, पण जर आपले पूर्वज  जिवंत असताना आपण त्यांचे हाल केले असतील तर मग मात्र आपणास पूर्वजांच्या आत्म्याची भीती वाटणे साहजिकच आहे. परंतु ९९.९९ टक्के तरी तसे नसते.   

मित्रांनो, या वर्षापासून आपण आपल्यात असा चांगला बदल घडवूया. पितृपक्षातील हे दिवस अशुभ न मानता  पितरांचे स्मरण करूया. समाजातील गरीब गरजूंना मदत करून आपल्या पितरांचे  श्राद्ध करूया म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळतील.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षReligious programmeधार्मिक कार्यक्रम