शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट!
2
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
3
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
4
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
5
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
6
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
7
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
8
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
9
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
10
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
11
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
12
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
13
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
14
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
15
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
16
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
17
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
18
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
19
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
20
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video

Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:29 IST

Pitru Paksha 2025 in Maharashtra: जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे.

- दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)भाद्रपद द्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. यावर्षी  सोमवार, ८ सप्टेंबर ते रविवार, २१ सप्टेंबर २०२५ ‘पितृपक्ष’ आलेला आहे. समाजात   पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत.आपल्या मृत आप्तेष्टांचे आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबाच्या घरी राहायला येतात, अशी समजूत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी दररोज महालय - श्राद्ध करावे असे शास्त्रात म्हटले आहे. 

हे श्राद्ध करताना  पिता म्हणजे वडील, पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह म्हणजे पणजोबा, माता म्हणजे आई, पितामही म्हणजे आजी आणि प्रपितामही म्हणजे पणजी यांच्यापैकी जे कोणी मृत असतील त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करण्यात येतो. जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे.

भाद्रपद कृष्ण पक्षातच श्राद्ध करण्यास का सांगितले  आहे, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘मातीच्या गणेशमूर्तीचे’ म्हणजेच पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. 

पितृपक्षाविषयी समाजात अनेक समज-गैरसमज  आढळतात. ‘पितृपक्ष हा वाईट आहे, पितृपक्ष हा अशुभ आहे. पण त्यात तथ्य नसते. हे सर्व  गैरसमज असतात. पितृपक्ष हा वाईट नसतो तसेच तो अशुभही नसतो. तुम्हीच विचार करा की भाद्रपद कृष्णपक्षात म्हणजेच पितृपक्षात जर आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या घरात राहायला येणार असतील तर ते वाईट कसे असू शकेल. 

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिले, घर, धनसंपत्ती ठेवली त्यांचे आत्मे या पंधरा दिवसासाठी आपल्या घरात राहायला येणार असतील तर त्यात अशुभ कसे असू शकेल? उलट आपल्या चांगल्या कामांना व परिस्थितीला पाहून त्या आत्म्याना आनंद-समाधानच वाटेल ना? उलट त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा  आपल्या प्रत्येक कामाला मिळतील होय ना? हा, पण जर आपले पूर्वज  जिवंत असताना आपण त्यांचे हाल केले असतील तर मग मात्र आपणास पूर्वजांच्या आत्म्याची भीती वाटणे साहजिकच आहे. परंतु ९९.९९ टक्के तरी तसे नसते.   

मित्रांनो, या वर्षापासून आपण आपल्यात असा चांगला बदल घडवूया. पितृपक्षातील हे दिवस अशुभ न मानता  पितरांचे स्मरण करूया. समाजातील गरीब गरजूंना मदत करून आपल्या पितरांचे  श्राद्ध करूया म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळतील.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षReligious programmeधार्मिक कार्यक्रम