शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:29 IST

Pitru Paksha 2025 in Maharashtra: जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे.

- दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)भाद्रपद द्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. यावर्षी  सोमवार, ८ सप्टेंबर ते रविवार, २१ सप्टेंबर २०२५ ‘पितृपक्ष’ आलेला आहे. समाजात   पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत.आपल्या मृत आप्तेष्टांचे आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबाच्या घरी राहायला येतात, अशी समजूत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी दररोज महालय - श्राद्ध करावे असे शास्त्रात म्हटले आहे. 

हे श्राद्ध करताना  पिता म्हणजे वडील, पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह म्हणजे पणजोबा, माता म्हणजे आई, पितामही म्हणजे आजी आणि प्रपितामही म्हणजे पणजी यांच्यापैकी जे कोणी मृत असतील त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करण्यात येतो. जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे.

भाद्रपद कृष्ण पक्षातच श्राद्ध करण्यास का सांगितले  आहे, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘मातीच्या गणेशमूर्तीचे’ म्हणजेच पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. 

पितृपक्षाविषयी समाजात अनेक समज-गैरसमज  आढळतात. ‘पितृपक्ष हा वाईट आहे, पितृपक्ष हा अशुभ आहे. पण त्यात तथ्य नसते. हे सर्व  गैरसमज असतात. पितृपक्ष हा वाईट नसतो तसेच तो अशुभही नसतो. तुम्हीच विचार करा की भाद्रपद कृष्णपक्षात म्हणजेच पितृपक्षात जर आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या घरात राहायला येणार असतील तर ते वाईट कसे असू शकेल. 

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिले, घर, धनसंपत्ती ठेवली त्यांचे आत्मे या पंधरा दिवसासाठी आपल्या घरात राहायला येणार असतील तर त्यात अशुभ कसे असू शकेल? उलट आपल्या चांगल्या कामांना व परिस्थितीला पाहून त्या आत्म्याना आनंद-समाधानच वाटेल ना? उलट त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा  आपल्या प्रत्येक कामाला मिळतील होय ना? हा, पण जर आपले पूर्वज  जिवंत असताना आपण त्यांचे हाल केले असतील तर मग मात्र आपणास पूर्वजांच्या आत्म्याची भीती वाटणे साहजिकच आहे. परंतु ९९.९९ टक्के तरी तसे नसते.   

मित्रांनो, या वर्षापासून आपण आपल्यात असा चांगला बदल घडवूया. पितृपक्षातील हे दिवस अशुभ न मानता  पितरांचे स्मरण करूया. समाजातील गरीब गरजूंना मदत करून आपल्या पितरांचे  श्राद्ध करूया म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळतील.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षReligious programmeधार्मिक कार्यक्रम