शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pitru Paksha 2022: दक्षिण दिशा अशुभ नाही, तरीदेखील धर्मकार्यात ती निषिद्ध का ठरवली जाते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:19 IST

Myths and Truth: दक्षिण दिशा यमाची दिशा एवढेच आपल्याला माहीत असल्याने आपण ती अशुभ ठरवून मोकळे झालो, पण धर्मकार्यात ती निषिद्ध ठरवण्यामागचे कारण वेगळे आहे, ते वाचा. 

'दक्षिण' हा शब्द वाम किंवा डावा या सापेक्षेने शुभ आहे. असे असतानाही दक्षिण दिशेविषयी समाजाच्या मनात दृढ असलेला समज सहजासहजी दूर होण्यासारखा नाही. प्रत्येक दिशेला एका लोकपालाची नेमणूक झालेली असते. त्यानुसार दक्षिण दिशेस यम लोकपालाची नेमणूक असते. वास्तविक यमाविषयी एकप्रकारचा तिटकारा व घृणा मनात असल्यामुळे दक्षिण दिशा ही त्याज्य समजली जाऊ लागली.

ही मजल इथपर्यंत पोहोचलेली असते की, यज्ञप्रक्रियेत दक्षिण दिशेचा नुसता उल्लेख आला तरी तो टाळून 'अवाचि' (बोलून न दाखवण्याजोगी) अशा पदाने तिचा उल्लेख केला जातो. खऱ्या अर्थाने विचार केल्यास यम आणि दक्षिण दिशा यांना अशुभ किंवा त्याज्य समजण्यासारखे असे काही आहे का? असा मोठा प्रश्न आहे. यमाने आपले कार्य केले नसते तर, केवढी भयानक आपत्ती आली असती, याचा नुसता विचारही अंगावर शहारा आणणारा आहे. 

दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असेही म्हटले जाते. कारण आपला शेवटचा प्रवास या दिशेने होतो. म्हणून शवाचे पाय दक्षिण दिशेने ठेवले जातात. यावरून जिवंतपणी दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये हा समज रूढ झाला. परंतु, ज्याचा देह तगून राहण्यास निकामी झालेला आहे किंवा ज्याचे इहलोकीचे त्या जन्मापुरते कार्य संपले आहे, अशा जिवांना आपल्याकडे खेचून घेऊन त्यांना आपल्यात सामाविष्ट करणारा, त्याच्या दोषाचे शुद्धीकरण करणारा यम तिरस्करणीय कसा? 

यम म्हणजे नियमन किंवा नियंत्रण. जगातील प्रत्येक बारीक सारिक क्रीयेत नियमनाची आवश्यकता असते. म्हणून यज्ञकर्मात विशेषत: शांतीकर्मात यमाचा आवर्जून उल्लेख असतो व त्याची पूजा असते. कोणत्याही कर्माची सुरुवात होताना कत्र्याचे मुख पूर्वेकडे असते व कर्माचा प्रारंभ दक्षिणेकडे करून सांगता उत्तरेकडे होते. पुण्याहवाचनात पहिला गणपतीचा विडा, दुसरे दोन वरुणाचे, चौथा मातृकाचा, इ क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे असतो. दक्षिणेकडे यमराज व त्याचा लोक (यमलोक) असतो. उत्क्रांतीची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे असते व शेवटी लय दक्षिणेत होतो. 

पृथ्वीच्या उदरातील महाचुंबक दक्षिणोत्तर असाच आहे. म्हणून रात्री झोपताना मस्तक दक्षिणेकडे व पाय उत्तरेकडे करून झोपल्यास चांगली झोप येते असा समज आहे. असे असताना दक्षिण दिशेस अतिपावित्र्य असल्यामुळे ती गैरसमजुतीने अपवित्र, अशुभ समजली जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती कडकडीत सोवळ्यात असते तेव्हा इतर लोक गैरसमजुतीने तिला स्पर्श होताच स्वत: स्नान करतात, तशातलाच प्रकार दक्षिण दिशेबाबत झाला आहे. 

शंकरासारख्या अतिपवित्र देवतेच्या पिंडीचे तोंड दक्षिणेकडे असते. दक्षिणेकडे तोंड करून घर असू नये असा संकेत आहे. कारण ती अतिपवित्र दिशा असल्याने घराचे पावित्र्यही तितकेच ठेवावे लागते. त्यात कसूर होण्यापेक्षा सरळ दक्षिणाभिमुख घर असूनच नये असा बिनागुंतागुंतीचा संकेत रूढ झाला आहे. प्रत्यक्ष ज्याचे घर दक्षिणाभिमुखी आहे, त्याचे अनुभव विचारात घेतले जावेत.

दक्षिण दिशेस मार्जन केल्यावर हात धुण्याची पद्धत आहे. वास्तविक मार्जन करण्यापूर्वी हात धुण्याची आवश्यकता आहे. परंतु हळू हळू काही रूढी इतक्या दृढ होतात, की त्याचे शास्त्रात रूपांतर कधी होते हेही कळत नाही. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष