शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Pitru paksha 2022: श्राद्धविधी केले म्हणजे आपली जबाबदारी संपली का? शास्त्र काय सांगते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:00 IST

Pitru Paksha 2022: श्राद्ध विधी पितरांच्या स्मरणार्थ केले जातात, पण जिवंत व्यक्तींच्या बाबतीत कसे वागणे शास्त्राला अभिप्रेत आहे ते वाचा!

श्राद्ध पक्षाचा हा शेवटचा आठवडा. एव्हाना कोणी तिथीनुसार तर कोणी सोयीनुसार श्राद्ध विधी पार पाडले असतील. ज्यांना पितरांची तिथी आठवत नसेल अशा लोकांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध विधी करण्याचे योजले असेल. मात्र श्राद्ध विधी केले म्हणजे आपली जबाबदारी संपते का? जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल ऋणनिर्देश झाले, पण जे हयातीत आहेत, त्यांचे काय?

श्राद्ध विधी हा पितरांचा अर्थात दिवंगत व्यक्तींचा केला जातो. ज्यांच्या कुळात आपण जन्माला आलो, त्यांची संपत्ती, घराण्याची परंपरा, त्यांची ओळख आपल्याला वारसाहक्काने मिळते. त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या धर्मशास्त्राने पितृ पंधरवडा आयोजित केला आहे. ज्यांना आपल्या पितरांची पुण्यतिथी लक्षात राहत नाही, त्यांच्यासाठी हा पंधरवडा राखीव ठेवला आहे. या पंधरा दिवसात पितरांच्या तिथीनुसार किंवा आपल्या सोयीने त्यांचा श्राद्धविधी करण्याची मुभा आपल्याला धर्मशास्त्राने दिली आहे. मात्र याचा अर्थ कर्मकांड, श्राद्धाचा स्वयंपाक, नैवेद्य अर्पण केला म्हणजे आपली जबाबदारी संपते का? तर नाही! 

''सर्वेप: सुखिनः सन्तु'' अर्थात सर्व जीव सुखात राहोत अशी प्रार्थना आपली संस्कृती आपल्याला शिकवते. यासाठीच पितरांना तृप्त ठेवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत ही संकल्पना आपल्या धर्मधुरीणींनी तयार केली. मात्र त्याबरोरबरच मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव असा संस्कारही आपल्यावर घातला आहे. या संस्काराचा मात्र आपल्याला विसर पडतो. आपल्या घरातील आत्मे अर्थात घरातील ज्येष्ठ मंडळीना अतृप्त ठेवून पितरांची पूजा केली तर ती पूजा कदापि फलद्रुप ठरणार नाही. म्हणून आई वडिलांना मान देणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे, त्यांच्या मताचा आदर देणे या गोष्टी आपल्याकडून घडल्या तरच पुढच्या पिढीवर न शिकवता मोठ्यांना आणि पूर्वजांना मान देण्याचा संस्कार आपोआप घडेल. 

भारतीय संस्कृतीला मौखिक परंपरा आहे. अर्थात ती जितकी कागदपत्रातून हस्तांतरित झाली, त्याहीपेक्षा जास्त ती गुरु शिष्य परंपरेतून तसेच मौखिक प्रचारातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाली. म्हणून ती आजही टिकून आहे. हा वारसा पुढच्या पिढीनेही सुरू ठेवावा असे वाटत असेल तर त्यांच्यासमोर सत्कर्माचा आदर्श आपल्याला आपल्या आचरणातून घालून द्यावा लागेल. तेव्हाच पुढची पिढी आपले अनुकरण करेल आणि संस्कृतीचा मूळ हेतू सफल होईल!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष