शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Pitru Paksha 2021: तुळशीच्या गंधाने पितर प्रसन्न होतात असे म्हणतात, खरंय का? जाणून घ्या तीळ, दर्भाचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:17 IST

पितृपक्षात श्राद्ध विधींमध्ये कुश (दर्भ), तीळ व तुळशीचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

सध्या पितृपक्ष सुरू आहे. यात घरोघरी श्राद्ध होत असते. श्रद्धेने केले जाते, ते श्राद्ध. यामध्ये कुश (दर्भ), तीळ व तुळशीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. याशिवाय तर्पण, पिंडप्रदान पूर्णत्वाला जाऊच शकत नाही.

श्राद्धामध्ये दर्भाला फार महत्त्व आहे. त्याचे बोटात घालण्यासाठी पवित्रक करतात, चट म्हणून वापरतात आणि पिंड प्रदान करताना खाली अंथरतात. याशिवाय श्राद्ध करताना दर्भासनही सांगितलेले आहे. तसेच इतरही अनेक कामांसाठी दर्भ वापरले जातात. याची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या रोमापासून झाल्याचे मानले जाते. दर्भाचे पवित्रक धारण करून तर्पण केल्यास पितरांची आत्मा वैकुंठाला जाते, असे सांगितले जाते. वास्तविक पाहता आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या पूजेसाठी दर्भ, पवित्रक वापरावेच लागतात. परंतु त्यात खंड पडून ते आता फक्त श्राद्धापुरतेच उरले आहेत. त्यातही कोणत्या श्राद्धाला किती दर्भांचे पवित्रक, चट वापरावेत, याचे स्वतंत्र नियम आहेत.

श्राद्धामध्ये तीळ किंवा काळे तीळ यांचेही महत्त्व आहे. तीळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामापासून झाल्याचे मानले जाते. पिंडप्रदानाच्या वेळी तीळाचा वापर केल्यास पितरांना मोक्ष मिळतो. काळे ती‌ळ वापरणे अधिक योग्य समजले जाते. काही ठिकाणी पिंड तयार करताना भाताबरोबरच त्यात वडे, खीर, काळे तीळ मिसळले जातात. 

नेहमी ऑक्सिजनचे उत्सर्जन करणाऱ्या तुळशीशिवाय श्राद्ध पूर्ण होऊ शकत नाही. तुळस आणि दर्भ कधीच अपवित्र होत नाहीत. त्यामुळे ते एकदा वापरले तरी पुन्हा वापरता येऊ शकतात. तुळशीच्या गंधाने पितर प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्यामुळे पितृपक्षात याचा वापर जरूर करावा, असे सांगितले जाते. 

श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण भोजनाच्या आधी त्यांचे पाय धुणे पुण्यकारक समजले जाते. उभे राहून ब्राह्मणांचे पाय धुतल्यास पितर नाराज होतात. त्यामुळे श्राद्धकर्त्याने बसून पाय धुवावेत. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी अनेक वस्तूंचे दानही या कालावधीत करण्यास सांगितले आहे. यामध्ये गाय, भूमी, तीळ, सोने, चांदी, तूप, गूळ, वस्त्र, धान्य, मीठ या दशदानांचे महत्त्व अधिक मानले जाते. 

- संकलक: सुमंत अयाचित, लोकमत 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष