शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Pitru Paksha 2021 : श्राद्ध विधीची सुरुवात सर्वप्रथम कोणी आणि केव्हा केली, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:59 IST

Pitru Paksha 2021 : देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा व विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून केलेले दान याला श्राद्ध म्हणावे. ते कोणी व कधी निर्माण केले याची माहिती ब्रह्मांडपुराणात मिळते.

पितरांना संतुष्ट करण्यासाठी केलेला विधी म्हणजे श्राद्ध! श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निष्पन्न झाला आहे. ब्रह्मपुराणाच्या श्राद्ध प्रकरणात श्राद्धाची व्याख्या दिली आहे, ती अशी-

देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत्पितृनुद्दिध्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धुदाहृतम् 

याचा अर्थ असा, की देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा व विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून केलेले दान याला श्राद्ध म्हणावे. ते कोणी व कधी निर्माण केले याची माहिती ब्रह्मांडपुराणात मिळते.

Pitru Paksha 2021 : श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक काय ते जाणून घ्या!

श्राद्ध विधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिमुनी यांची आहे. त्यांच्या वंशात दत्तात्रेय झाला. त्याचा पुत्र निमी, त्याचा पुत्र श्रीमान. श्रीमानाने सहस्त्र वर्षे तप केल्यानंतर कालधर्मास अनुसरून तो मरण पावला. तेव्हा निमीने पुत्राचे यथाविधी उत्तरकार्य केले. पण पित्यासाठी सांगितलेला विधी पुत्राकडे लावला, म्हणून निमीपुढे प्रश्न उभा राहिला, की हा नवीन प्रकार काढून आपण धर्मसंकर तर केला नाही ना? असे मनात येताच त्याला वाईट वाटले. 

पूर्वी ऋषीमुनींनी आचरलेली गोष्ट केली असती, तरी त्याच्या मनास चैन पडेना. तेव्हा त्याने आपला मूळ पुरुष जो अत्रि, त्याचे स्मरण केले. स्मरण करताच अत्रिमुनि तेथे आला व त्याने निमी पुत्रशोकाने कृश झाला, हे पाहून गोष शब्दांनी त्याचे सांत्वन केले. `निमी तू जो श्राद्धविधी योजलास, तो म्हणजे ब्रह्मदेवाने घालून दिलेला धर्मविधीच होय आणि त्याचेच तू आचरण केले आहेस. आता मी तुला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगतो.' असे सांगून त्याने श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे.

Pitru Paksha 2021 : श्राद्धाचा स्वयंपाक आदर्श स्वयंपाक का मानला जातो, त्यातील पदार्थांचा क्रम कसा असावा ते जाणून घ्या! 

श्राद्धप्रथा ही फार प्राचीन आहे. पितरांच्या, म्हणजे मृतात्म्यांच्या ठायी पुढीलांचे भले बुरे करण्याचे सामथ्र्य असते, या कल्पनेतून श्राद्ध कल्पनेचा उगम झाला. वैदिक वाङमयात पितर हा शब्द पिता, पितामह व प्रपितामह म्हणजेच वडील, आजोबा व पणजोबा या अर्थाने वापरला जातो. मनूने सर्वप्रथ श्राद्धक्रिया सुरू केली, असे ब्रह्मांडपुराणात म्हटले आहे. म्हणूनच विष्णू व वायु पुराणाध्ये मनूला श्राद्धदेव म्हटले आहे. प्राचीन काळी श्राद्धाला पिंड पितृयज्ञ हे नाव होते. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष