शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

'हनुमान उडी' हा वाकप्रचार रूढ झाला, त्यामागची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 07:20 IST

या थोर राम भक्ताची गणना सप्त चिरंजीवांमध्ये केली जाते. त्याच्यातला एखादा तरी गुण आपल्यात यावा आणि आपल्यालाही आयुष्यात हनुमान उडी घेता यावी, म्हणून त्यालाच मनोभावे शरण जायचे.

मारुतीचा जन्म होताच त्याने आकाशात अनेक योजने उंच उडी मारली, त्या वेळेस सूर्य उगवत होता. मारुतीला ते लाल फळ वाटले. त्याने सूर्याला पकडले, तर जगात प्रलय येईल म्हणून इंद्राने आपले वज्र मारुतीवर टाकले. त्यामुळे मारुतीची हनुवटी फुटली आणि तो जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. वायुदेव ते पाहून रागावला. सारी पृथ्वी हालू लागली. तेव्हा इंद्राने वायुदेवाची समजुत घातली. `वायुदेवा, यापुढे मारुतीला माझ्या वज्राचे  भय वाटणार नाही.' तेव्हापासून मारुतीचे नाव हनुमान असे प्रसिद्ध झाले. 

हनुमान मोठा झाल्यावर सुग्रीवाचा सचिव असे श्रेष्ठ पद त्याला मिळाले. ऋषमूक पर्वतावर हनुमान राम लक्ष्मणांकडे सुग्रीवाचा दूत म्हणून गेला. पुढे सीतेला शोधण्याकरीता मारुती निघाला, तेव्हा सीतेला खूण पटावी, म्हणून रामाने आपली अंगठी त्याच्याजवळ दिली. लगेच, 'उडाला उडाला कपि तो उडाला, समुद्र उलटोनि लंकेसि गेला' मारुतीने सागरावरून उड्डाण केले होते. रामाचा दूत म्हणून त्याने सीतेचा शोध घेतला आणि रामाची अंगठी तिला दाखवून धीर दिला. तिनेही मारुतीला आपल्या वेणीतील मणी रामाला देण्याकरीता दिला. त्यानंतर मारुती निर्भयपणे रावणाला भेटायला गेला. 

हेही वाचा : 'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!

त्याला रावणाने उच्चासन दिले नाही. तेव्हा मारुतीने आपले शेपूट इतके लांबवले आणि त्याची उंच गुंडाळी केली की त्यावर बसल्यावर मारुतीचे आसन रावणाच्या सिंहासनाहून अधिक उंच झाले. रावणाच्या अशोकवनाला आणि अनेक राक्षसांना मारुतीने नाश केला होता. त्याचा जाब रावणाने विचारला आणि त्याचे ऐकून घेण्याआधीच त्याला शिक्षा म्हणून शेपटीला आग लावून दिली. 

मारुतीने आपले शेपूट इतके लांबवले, की या घरावरून त्या घरावर जाताना सारी लंका जळून खाक केली. मारुतीला मात्र काहीच इजा झाली नाही.प्रत्यक्ष रावणाशी लढताना, लक्ष्मणाला बाण लागताच तो बेशुद्ध होताच, त्याला बरे करण्यासाठी, आयुर्वेदाचार्यांनी सांगितलेली संजीवनी वनस्पती आणण्यासाठी तो द्रोणागिरी पर्वतावर गेला आणि संजीवनीचा उपयोग सर्वांना व्हावा, म्हणून तो पर्वतच घेऊन आला. त्याने आपल्या भीमपराक्रमाने लक्ष्मणाला जीवदान दिले.रामाचा आदर्श आणि एकनिष्ठ सेवक म्हणून मारुतीचे नाव घेतले जाते. 

एखाद्याने एकदम एखादे धाडस केले किंवा कामात प्रगती केली, की आपण तला `हनुमान उडी मारली' असे म्हणतो. तसेच एखादे काम लांबत चालले असेल, तर ते 'मारुतीच्या शेपटीसारखे लांबत आहे' असे म्हणतो. एखाद्या गोष्टीला अर्थ नाही, असे सांगताना `यात काही राम नाही' असे म्हणतो. याचाही संबंध हनुमानाशी आहे. रावणाशी युद्ध जिंकून परत आल्यावर सीतेने सर्वांना काही ना काही भेट दिली. या रामकार्यात सिंहाचा वाटा उचललेल्या हनुमंताला विशेष भेट म्हणून सीतेने आपला अत्यंत प्रिय असलेला नवरत्नांचा हार दिला. हनुमंताने तो घेतला. आणि त्या नवरत्नांमध्ये रामाचा शोध घेऊ लागला. परंतु, रत्न फोडून पाहिली, तरी राम दिसला नाही. मात्र, त्याच्या या कृत्याने हार विखुरला. सीतेला वाईट वाटले. तिने हनुमंताला विचारले, `तुझ्या हृदयात तरी राम आहे का?' यावर क्षणाचाही विलंब न करता, हनुमंताने छाती फाडून हृदयस्थ विराजमान झालेले प्रभू रामचंद्र दाखवून दिले. 

अशा या थोर राम भक्ताची गणना सप्त चिरंजीवांमध्ये केली जाते. त्याच्यातला एखादा तरी गुण आपल्यात यावा आणि आपल्यालाही आयुष्यात हनुमान उडी घेता यावी, म्हणून त्यालाच मनोभावे शरण जायचे.

पवनसुत हनुमान की जय!

हेही वाचा :स्वार्थ सांडूनिया, करावा परमार्थ..!