शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

हा चार महिन्यांचा काळ महादेवासाठी सृष्टीरक्षणाचा, तर भगवान विष्णूंसाठी विश्रांतीचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 10:38 IST

सगळ्याच देवांनी एकदम विश्रांती घ्यायची ठरवली असती, तर काय झाले असते याची कल्पनाच न केलेली बरी...!

आपण आपल्या पदाचा राजीनामा देतो किंवा मोठ्या सुटीवर जातो, तेव्हा आपल्या जागी नियुक्त केलेल्या माणसाच्या हाती पदभार सोपवावा लागतो. त्याला सर्व कामांचा अंदाज आणि आवश्यक कागपत्रे सोपवून मगच आपल्याला निरोप घेता येतो. त्याचप्रमाणे येत्या चार महिन्यात भगवान महाविष्णू शेषसागरात विश्रांतीसाठी जाताना भगवान महादेवांकडे सृष्टीच्या रक्षणाची, कामकाजाची सर्व सूत्र सोपवून जातात. म्हणून तर विश्वाचा समतोल टिकून राहतो. अन्यथा सगळ्याच देवांनी एकदम विश्रांती घ्यायची ठरवली असती, तर काय झाले असते याची कल्पनाच न केलेली बरी...!

२० जुलै रोजी आषाढी एकादशी होती. त्यालाच देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू शेषसागरात विश्रांती घेतात, ते थेट चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला उठतात. त्याला देवउठनी एकादशी म्हणतात. ही विश्रांती देवाने स्वेच्छेने घेतलेली नसून त्याच्या प्रिय भक्तांनी त्याला सक्तीची विश्रांती दिली आहे. जगाचा सांभाळ करणाऱ्या भगवंताला विश्रांती मिळाली, तरच पुढचे सबंध वर्ष तो उत्साहाने सर्व जबाबदाऱ्या पूर्ववत सांभाळू शकेल, हा भोळा भाव त्यामागे आहे. भक्ताचा हा आग्रह भगवंतांनी मोडला नाही, परंतु आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत भगवान विष्णूंनी आपल्या विश्रांतीच्या कार्यकाळात भगवान शंकर यांच्याकडे पदभार सोपवून जगाचे व्यवस्थापन सांभाळावे अशी विनंती केली. 

या चार महिन्यात भगवान महादेवांच्या हाती सूत्रे आल्यावर भक्तही त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. आपल्याकडून कोणती चूक होऊ नये म्हणून शिवशंकराची पूजा अर्चा करतात. विशेषत: श्रावण मास तर महादेवाच्या आराधनेसाठी समर्पित केलेला आहे. या चार महिन्यांत अनेक भाविक तीर्थक्षेत्री जाऊन देवाचे दर्शन घेतात. दानधर्म करतात. 

याच काळात भगवान शंकरांपाठोपाठ भाद्रपदात गणपती बाप्पा आणि अश्विन मासात देवी माता आपल्या घरी पाहुणचाराला येते. त्यांच्या येण्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. भगवान महादेवाला त्यांच्या कार्यात तेवढीच मदत मिळते. देवीचा दहा दिवसांचा जागर झाला, की पितृपक्षाचे पंधरा दिवस पितरांच्या सेवेत जातात. त्यातून बाहेर येतो ना येतो लगेच दिवाळीची लगबग सुरू होते. अशी सर्व व्यवस्था लावलेली असल्यामुळे वाईट विचारांना थारा मिळतच नाही. तरी न जाणो, अजाणतेपणी आपल्या हातून काही पाप घडू नये म्हणून व्रत वैकल्यांची जोड दिली जाते. 

तोवर कार्तिक मास उजाडतो. भगवान विष्णूंचा विश्रांती काळ संपतो. ते पुनश्च पदभार स्वीकारण्यासाठी सज्ज होतात. तेव्हा आनंदाच्या भरात सर्व भाविक माता तुळशीशी त्यांचा विवाह लावून त्यांना वैयक्तिक तसेच विश्वाच्या संसाराच्या जबाबदारीत अडकवून देतात.