शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

हा चार महिन्यांचा काळ महादेवासाठी सृष्टीरक्षणाचा, तर भगवान विष्णूंसाठी विश्रांतीचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 10:38 IST

सगळ्याच देवांनी एकदम विश्रांती घ्यायची ठरवली असती, तर काय झाले असते याची कल्पनाच न केलेली बरी...!

आपण आपल्या पदाचा राजीनामा देतो किंवा मोठ्या सुटीवर जातो, तेव्हा आपल्या जागी नियुक्त केलेल्या माणसाच्या हाती पदभार सोपवावा लागतो. त्याला सर्व कामांचा अंदाज आणि आवश्यक कागपत्रे सोपवून मगच आपल्याला निरोप घेता येतो. त्याचप्रमाणे येत्या चार महिन्यात भगवान महाविष्णू शेषसागरात विश्रांतीसाठी जाताना भगवान महादेवांकडे सृष्टीच्या रक्षणाची, कामकाजाची सर्व सूत्र सोपवून जातात. म्हणून तर विश्वाचा समतोल टिकून राहतो. अन्यथा सगळ्याच देवांनी एकदम विश्रांती घ्यायची ठरवली असती, तर काय झाले असते याची कल्पनाच न केलेली बरी...!

२० जुलै रोजी आषाढी एकादशी होती. त्यालाच देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू शेषसागरात विश्रांती घेतात, ते थेट चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला उठतात. त्याला देवउठनी एकादशी म्हणतात. ही विश्रांती देवाने स्वेच्छेने घेतलेली नसून त्याच्या प्रिय भक्तांनी त्याला सक्तीची विश्रांती दिली आहे. जगाचा सांभाळ करणाऱ्या भगवंताला विश्रांती मिळाली, तरच पुढचे सबंध वर्ष तो उत्साहाने सर्व जबाबदाऱ्या पूर्ववत सांभाळू शकेल, हा भोळा भाव त्यामागे आहे. भक्ताचा हा आग्रह भगवंतांनी मोडला नाही, परंतु आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत भगवान विष्णूंनी आपल्या विश्रांतीच्या कार्यकाळात भगवान शंकर यांच्याकडे पदभार सोपवून जगाचे व्यवस्थापन सांभाळावे अशी विनंती केली. 

या चार महिन्यात भगवान महादेवांच्या हाती सूत्रे आल्यावर भक्तही त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. आपल्याकडून कोणती चूक होऊ नये म्हणून शिवशंकराची पूजा अर्चा करतात. विशेषत: श्रावण मास तर महादेवाच्या आराधनेसाठी समर्पित केलेला आहे. या चार महिन्यांत अनेक भाविक तीर्थक्षेत्री जाऊन देवाचे दर्शन घेतात. दानधर्म करतात. 

याच काळात भगवान शंकरांपाठोपाठ भाद्रपदात गणपती बाप्पा आणि अश्विन मासात देवी माता आपल्या घरी पाहुणचाराला येते. त्यांच्या येण्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. भगवान महादेवाला त्यांच्या कार्यात तेवढीच मदत मिळते. देवीचा दहा दिवसांचा जागर झाला, की पितृपक्षाचे पंधरा दिवस पितरांच्या सेवेत जातात. त्यातून बाहेर येतो ना येतो लगेच दिवाळीची लगबग सुरू होते. अशी सर्व व्यवस्था लावलेली असल्यामुळे वाईट विचारांना थारा मिळतच नाही. तरी न जाणो, अजाणतेपणी आपल्या हातून काही पाप घडू नये म्हणून व्रत वैकल्यांची जोड दिली जाते. 

तोवर कार्तिक मास उजाडतो. भगवान विष्णूंचा विश्रांती काळ संपतो. ते पुनश्च पदभार स्वीकारण्यासाठी सज्ज होतात. तेव्हा आनंदाच्या भरात सर्व भाविक माता तुळशीशी त्यांचा विवाह लावून त्यांना वैयक्तिक तसेच विश्वाच्या संसाराच्या जबाबदारीत अडकवून देतात.