शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Pashankush Ekadashi 2022: पाशांकुश एकादशी : आजच्या दिवशी झालेली राम-भरत भेट; चित्रकूट पर्वतावर अजूनही आहेत पुरावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 10:39 IST

Pashankush Ekadashi 2022: भरताने प्रभू श्रीरामांकडून वचन घेतले, की चौदा वर्षाचा वनवास संपवून पुढचा दिवस संपायच्या आत तुम्ही परतला नाहीत, तर चित्रकूट पर्वतावर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. त्या परतभेटीचा आजचाच दिवस!

दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करून प्रभू श्रीराम सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतासह दंडकारण्यातून परतले. या दिवसाची भरत अतिशय आतुरतेने वाट पाहत होता. तो दिवस होता पाशांकुश एकादशीचा. म्हणजे आजचा! दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीराम-भरत भेटीचा हृद्य सोहळा या सृष्टीने पाहिला होता. त्या प्रसंगाच्या खुणा आजही चित्रकूट पर्वतावर सापडतात.  

या बंधू द्वयींच्या भेटीचे वर्णन वाल्मिकी रामायणापासून ते तुलसी रामायणापर्यंत सर्व ग्रंथात सापडते. ही भेट झाली ते ठिकाण होते श्रीरामांची तपोभूमी चित्रकूट पर्वत. चित्रकूट पर्वतावर स्थित कामतानाथ मंदीर हे श्रीराम भरत मिलाप मंदिर म्हणून उभारले आहे. तिथे श्रीराम आणि भरत यांची पदचिन्हे आढळतात. 

दशरथ राजाच्या निधनानंतर भरतानेश्रीरामांची भेट घेतली व आपल्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता त्यांना सांगितली. आईच्या वचनातून मुक्त होऊन त्यांनी पुन्हा राज्य कारभार सांभाळावा अशी भारताने विनवणीदेखील केली. परंतु वचनबद्ध श्रीरामांनी हा प्रस्ताव नाकारला व भरताला अयोध्येचा कारभार सांभाळ असे सांगितले. यावर भरतानेही अयोध्येत राहून वनवासी जीवन व्यतीत केले आणि प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार सांभाळला. 

त्यागात पुढे आणि भोगात मागे असणारी ही चारही भावंडे बंधुप्रेमाचे आदर्श उदाहरण होती. त्यावेळेस भरताने प्रभू श्रीरामांकडून वचन घेतले, की चौदा वर्षाचा वनवास संपवून पुढचा दिवस संपायच्या आत तुम्ही परतला नाहीत, तर चित्रकूट पर्वतावर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. 

भरताला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी श्रीराम पुष्पक विमानातून वाऱ्याच्या गतीने लगबगीने परत आले व त्यांनी त्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या भरताला कडकडून मिठी मारली. तो हृदयद्रावक प्रसंग पाहून तिथले दगडही मऊ पडले आणि त्यावर भरत व श्रीरामाच्या पावलाचे ठसे उमटले, असे म्हणतात. आजही तिथल्या मंदिरात हे पदचिन्ह बघायला मिळते. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्या मध्यावर चित्रकूट पर्वत आहे व तिथेच हे मंदिर स्थित आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊन पावन व्हा. 

अशा बंधुप्रेमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, भगवान विष्णूंची आराधना करून आपणही पाशांकुश एकादशी साजरी करूया. जय श्रीराम! 

टॅग्स :ramayanरामायण