शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

...तोच आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 4:44 AM

ही सत्ता त्याच्या आत्मबळावर कमवलेली असते, त्यामुळे इथे विचारांचा गोंधळ नसतो. तो खरा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो.

- मोहनबुवा रामदासीछंदोग्य उपनिषदात स्वानंद साम्राज्य उपभोगणाऱ्या माणसाला ‘स्वराट’ म्हणजे स्वत:चा राजा, अशी उपमा दिलेली आहे. देहबुद्धीच्या खोट्या आणि फसव्या ‘मी’ला बाजूला सारून, त्याची शक्ती क्षीण करून आत्मबुद्धीच्या ख-या ‘मी’ला स्वीकारतो, तोच खरा स्वत:च स्वत:चा स्वामी होतो. या त्याच्या स्वामित्वापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. ही सत्ता त्याच्या आत्मबळावर कमवलेली असते, त्यामुळे इथे विचारांचा गोंधळ नसतो. तो खरा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो. देहबुद्धीच्या तडाख्यातून निसटलेला आणि खोट्या दृष्यबंधनातून मोकळा झाल्याने तो स्वत:च्या साम्राज्यात अखंड स्वानंद उपभोगत असतो. त्याला त्याच्या स्वानंदाचा आनंद घेण्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची गरज नसते. मुळातच आनंदाचा पिंड घेऊन जन्माला आलेला हा जीव दु:खाच्या खाणीत कसा लोटला जातो? माणसाला स्वत:च्या गरजा माहिती असतात. त्या भागविताना तो पिढ्यान्पिढ्यांचा विचार करतो आणि खरे तर तो आनंदाच्या साम्राज्याचा राज्यधारी असतो; पण लाचारपणामुळे त्याची अवस्था भिका-याप्रमाणे होते. समाजात त्याच्यासारखा दु:खी तोच असल्याचे पाहावयास मिळते. परमार्थात हा स्वार्थ पाहणारा कधीच सुखी झालेला पाहायला मिळत नाही. नरदेहरूपी हे राज्यवैभव त्याला मिळालेले असूनही तो स्वार्थापायी स्वत:चा घात करून घेतो. स्वतंत्र असणारा जीव मायापाशात गुरफटल्याने परस्वाधीन झाला आहे. क्षणिक सुखाच्या आधीन झालेला जीव दु:ख विसरण्यासाठी व्यसनाधीन होतो आणि स्वत:चे व घरादाराचे भरून निघणार नाही अशा प्रकारचे नुकसान करून घेतो. म्हणून साधकाने स्वत:ची दिशा आणि मार्ग विवेकाने शोधावा! विवेक हीच खरी ईश्वरी शक्ती आत भरलेली आहे. त्या विवेक आणि विचाराने स्वत:चे साम्राज्य स्वत:च आबाधित ठेवावे. आंतरिक आत्मरूपी साम्राज्यातच तो खरा राज्यधारी असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक