शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

एक तास समाजाचा...! ‘मनशक्ती’मध्ये ‘ज्ञानाने माणूस बदलण्याचा’ चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 06:21 IST

कोणत्याही पारंपरिक पद्धतीने नाही, परंतु विशिष्ट पद्धतीने स्वामीजींना समोरच्या माणसाचे भविष्य समजत असे. तथापि, स्वामीजींचा संपर्क थेट देशातील सर्वोच्च पदे असलेल्या मान्यवरांशी होता.

सुहास गुधाटे 

‘सुख पाहता जवापाडे आणि दु:ख पर्वताएवढे’, हे मानसशास्त्रीय निरीक्षण तुकोबारायांनी नोंदवले. तसेच ‘मन करा रे प्रसन्न’ असा उपदेशही केला. सुख-दु:खाच्या या मूलभूत प्रश्नांचा चिकित्सक धांडोळा आधुनिक वैज्ञानिक परिभाषेतून मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी घेतला. पूर्वायुष्यात ते स्वातंत्र्य सैनिक होते, पत्रकार-संपादक होते. ‘वंदे मातरम’ हा प्रसिद्ध मराठी चित्रपट त्यांनी निर्माण केला. शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा, यासाठी ख्यातनाम कलाकारांचे चित्रीकरण केले. यू ट्युबवर उपलब्ध असलेला लता मंगेशकर यांच्या आवाजातील मालकंस राग हा त्यांच्याच चित्रफितींचा भाग आहे.

कोणत्याही पारंपरिक पद्धतीने नाही, परंतु विशिष्ट पद्धतीने स्वामीजींना समोरच्या माणसाचे भविष्य समजत असे. तथापि, स्वामीजींचा संपर्क थेट देशातील सर्वोच्च पदे असलेल्या मान्यवरांशी होता. परंतु, त्याचा वापर त्यांनी वैयक्तिक किंवा संस्थेच्या लाभासाठी कधीही केला नाही. भविष्य समजत असले तरी कोणत्या निसर्ग नियमाने ते घडते, हा कार्यकारणभाव त्यांना शोधून सापडत नव्हता. पुढे २२ मार्च १९५७ रोजी आत्मप्रत्ययाचा अनुभव त्यांना आला. तेव्हा या सुख-दु:खाच्या नियमाचा शोध विज्ञानाच्या माध्यमातून घेण्याची प्रेरणा निसर्गाने त्यांना दिली. मानवी जीवन सुखी कसे होईल, हे सांगणारे बुद्धिवादी ‘नव तत्त्वज्ञान’ त्यांनी मांडले आणि ते जगण्यासाठी २१ फेब्रुवारी १९६३ रोजी समाजासाठी जास्तीत जास्त त्याग या हेतूने त्यांनी संन्यास घेतला. तेव्हा त्यांची विज्ञाननिष्ठा पारखलेल्या आचार्य अत्रे यांनी ‘स्वामी विज्ञानानंद’ हे नाव धारण करण्यास त्यांना सुचवले.

माणसाचं दु:ख निवारण्यासाठी व खरं सुख मिळवण्यासाठी निसर्ग नियम आधारित ‘न्यू वे’ तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं. कार्यसुलभतेसाठी संपर्काला सोयीची अशी पुणे-मुंबईच्या मध्यावरील लोणावळ्यातील जागा स्वामीजींनी निवडली. नव तत्त्वज्ञानाचा प्रसार करून समाजात ‘सत्कृत्य चक्रा’साठी उपक्रम सुरू केले. त्यातून कार्यकर्ते जोडत गेले आणि १२ मे १९७० या दिवशी ‘न्यू वे आश्रम’ या संस्थेची स्थापना झाली.

गर्भावस्थेपासूनच मुलाचे व्यक्तिमत्त्व कसे घडत जाते, हे त्यांनी ‘पालक विश्वविद्यालय’ या अभिनव प्रकल्पाद्वारे मांडले. मुले-पालकांसाठी निवासी शिबिरे, मानस चाचण्या आणि समुपदेशन सेवा सुरू केली. मनशक्तीमध्ये चमत्कार घडतो तो ‘ज्ञानाने माणूस बदलण्याचा’. ध्येयप्राप्ती आणि दु:खमुक्ती यासाठी बुद्धिनिष्ठ उपायांचं ‘ज्ञान’ मिळालं तर माणूस आत्मनिर्भर बनतो. यासाठी मनशक्ती केंद्रात विविध गरजांसाठी सुमारे ५० अभ्यासवर्ग, कार्यशाळा आहेत. २०० हून अधिक ग्रंथ आहेत. ५० प्रकारच्या मानस चाचण्यांची सेवा उपलब्ध आहे. वर्षभरात विविध माध्यमातून सुमारे एक लाख लोक या सेवांचा लाभ घेतात.

एक तास समाजाचा... सुख-दु:खाचा अतूट संबंध लक्षात घेऊन स्वेच्छेने थोडा दु:खस्वीकार हे पथ्य समाजसेवेच्या माध्यमातून पाळण्याचे मनशक्ती सुचवते. त्यानुसार ‘रोज एक तास समाजाचा’ हे व्रत अंगीकारलेले हजारो कार्यकर्ते हा संस्थेचा भक्कम आधार आहे, तर पूर्ण जीवनच यासाठी वाहिलेले १०० हून अधिक कार्यकर्ते हा संस्थेचा पाया आहे. कोरोना आपत्तीl १० लाखांहून अधिक निधी संस्थेने देणगी आणि वस्तू रूपात दिला आहे. चालू महिन्यात ५० वर्षांचा सुवर्णमहोत्सवी पहिला टप्पा ओलांडताना हे सिंहावलोकन अधिक अंतर्मुख करते. 

(लेखक मनशक्ती प्रयोग केंद्राचे जीवनदानी साधक आहेत)