शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संकष्टीच्या दिवशीच माता यशोदेला श्रीकृष्णाच्या मुखात ब्रह्माण्डदर्शन झाले; कसे ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 17:40 IST

कृष्णाच्या खोड्यांनी यशोदा कमालीची हैराण झाली होती. तेव्हा गौळणींपैकी कोणीतरी म्हणाली, 'बाई गं, संकष्टी चतुर्थीचे व्रत एकदा करून पाहा.' पुढे काय झालं वाचा...

लहान हूड मुलाचा खोडकरपणा त्याच्या आईला सर्वात अधिक त्रासदायक आणि आनंददायकही वाटतो. बालकृष्ण म्हणजे लहानपणाचे भगवान श्रीकृष्ण हे मुलखाचे खोडकर मूल. त्याने आपल्या लहानपणी माय यशोदेला कसे `त्राहि भगवान' केले असेल, याची कल्पनाच केलेली बरी. या प्रसंगाचे यथार्थ वर्णन ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी केले आहे.

कृष्णाच्या खोड्यांनी यशोदा कमालीची हैराण झाली होती. तेव्हा गौळणींपैकी कोणीतरी म्हणाली, 'बाई गं, संकष्टी चतुर्थीचे व्रत एकदा करून पाहा.' गौळणीचा सल्ला मानून यशोदेने संकष्टीव्रताचे आचरण सुरु केले. संत नामदेव ह्या घटनेचे रसाळ वर्णन शब्दबद्ध करतात,

गोपिका म्हणती, यशोदा सुंदरी। करीतो मुरारी, खोडी बहु।यशोदेप्रती त्या, गौळणी बोलती, संष्टी चतुर्थी, व्रत घेई।गणेश देईल, यासी उत्तम गुण, वचन प्रमाण, मानावे हे।गजवदनासी तेव्हा, म्हणत यशोदा, माझिया मुकुंदा गुण देई।

यशोदेचा हा संकल्प ऐकल्यानंतर बालकृष्णाने एक महिनाभर खोडी केली नाही. गणपती आपल्याला पावला, या भावनेने यशोदा निष्ठेने उपास करू लागली. धन्य धन्य देव गणपती पाहे, यशोदा ती राहे उपवासी!

संकष्टीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर यशोदेने एकवीस लाडू केले आणि त्याबरोबर बरेच मोदक तयार करून देवासमोर नैवेद्य ठेवला. 

शर्करामिश्रित लाडू येकवीस, आणीक बहुवस, मोदक तो।ऐसा नैवेद्याचा, हारा तो भरूनी, देव्हारी नेऊनि, ठेवी माता।मातेसी म्हणत, तेव्हा हृषिकेशी, लाडू केव्हा देसी, मजलागी।यशोदा म्हणते, पूजीन गजवदना, नैवेद्य दाऊन, देईन तुज।

पण बाळकृष्णाला एवढा धीर कुठे? आई बाहेर जाताच, बाळकृष्णाने नैवेद्य फक्त केला आणि तृप्तीचा ढेकर दिला. यशोदा आली आणि पाहते तर नैवेद्याचे ताट रिकामे. तिने कृष्णाला विचारले, तर कृष्ण सांगतो, `मैय्या, हजार उंदिर आले आणि लाडू, मोदक खाऊन गेले. त्यातल्या एका उंदरावर बसून विनायक देखील आले होते. त्या सगळ्यांनी मिळून नैवेद्य संपवला. आता मी काय खाऊ? मला काहीतरी खायला दे!

कृष्णाची खोडी ओळखून यशोदा माता म्हणाली, `कृष्णा तोंड उघड पाहू.'  कृष्णाने तोंड उघडले, तर काय आश्चर्य...

कृष्णनाथे तेव्हा, मुख पसरिले, ब्रह्मांड देखिली मुखामाजी।असंख्य गणपती, दिसती वदनी, पहातसे नयनी, यशोदा ते।

कृष्णाच्या मुखात ब्रह्मांड दिसले आणि त्याच्या मुखातून स्वत: गणपतीच बोलू लागले, `यशोदे, तू तुझ्या कृष्णाचे लाड पुरव. तो नैवेद्य मला आपोआप मिळेल.'

यशोदेचा राग निवळला आणि तिने कृष्णाचे मुके घेतले. नंतर कृष्णासाठी आणि बाप्पासाठी पुन्हा लाडू मोदक केले. तेव्हापासून आजतागायत घरोघरी होत असलेल्या, ना कृष्णलीला कमी झाल्या, ना यशोदेच्या तक्रारी. या गोड नात्याचा साक्षीदार विनायक मात्र गाली हसून तथास्तू म्हणतो आहे. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी