शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या जीवाला गुरुरुपी काडीचा आधार हवाच!- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 08:00 IST

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शक लागतोच. आपण कितीही स्वयंभू म्हणवून घेतले, तरी दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. ती मदत किरकोळ का असेना. बुडत्याला काडीचा आधारही पुरतो. 

सद्गुरुंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरु सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरु सांगतात. सद्गुरु आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरु जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही, असे ज्याने म्हटले, त्याने खरोखरच सद्गुरु केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तु गृहस्थ मी स्वस्थ आहे, असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते, तोपर्यंत तो स्वस्थ आहे, असे नाही म्हणता येणार.

शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो, त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली, तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते, ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरश; पाळने हेच खरे साधन. संत कुणालाही कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो, तो महत्त्वाचा आहे.

पुष्काळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत, ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला, तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते, ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे, म्हणून ती मालकाला चालवता येणार नाह. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरुपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल, तेवढेच आपल्याला मिळणार आहे. अशी आपली वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली, की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले, की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंत:कराची शुद्धता हा पाया आहे.