शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

केवळ शहरं नाही तर गावं प्रगत झाली पाहिजे, तरच भारताचा विकास होईल! - तुकडोजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 07:00 IST

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे, भारताच्या विकासाचा विचार त्यांनी किती दूरदृष्टीने केला होता ते पहा!

राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. खेडे हे एक स्वयंपूर्ण घटक म्हणून भारतात असायला हवे, तरच भारत प्रगत राष्ट्रांमध्ये मान्यता पावेल, असा उदात्त विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ३० एप्रिल रोजी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून घेऊ. 

तुकडोजी महाराज विशेषकरून ओळखले जातात, ते त्यांच्या समाजसेवेमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेमुळे. `सर्व जीव देवासमान समजून पूजा करा' हे गीतेचे सार तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून सोपे करून मांडले आहे.

बालपणीच अडकोजी महाराजांचे शिष्यत्त्व पत्करून त्यांनी परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे घालवली. ही साधना चालू असताना त्यांनी जगास उपदेश करण्याचे कार्य सुरू केले. महात्माजींच्या प्रेरणेने त्यांनी ईशस्तवनाबरोबर गावातील सामाजिक सुधारणा, सर्वांगीण सुधारणा, शिक्षण, ग्रामविकास इ. गोष्टींवर भर दिला. 

गावोगावी फिरून समाज प्रबोधन केले. `श्रीगुरुदेव' नावाचे मासिक काढून अनेक वर्षे चालवले. वऱ्हाडात 'मोझेरी' या गावी एक आश्रम बांधला. गावोगावी त्याच्या शाखा उपशाखा काम करत असत. त्यामुळे नागपूर-वऱ्हाडात त्या सेवामंडळाचा मोठा अनुयायी वर्ग निर्माण झाला.

ग्रामसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना वगैरे अनेक गोष्टींद्वारा त्यांनी ठिकठिकाणी खेड्यांना शिस्तीचे आणि समाजसेवेचे वळण लावले. त्या कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले. प्रकृती ठीक नसतानाही जपानमध्ये जाऊन तेथे भरलेल्या धर्मपरिषदेत आपल्या मानवताधर्माचे स्वरूप विशद करून सांगितले.

तुकडोजी महाराजांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. गावोगावी सामुदायिक प्रार्थना होऊ लागल्या. शेकडो सेवक निर्माण झाले. आधुनिक विज्ञानाचे भांडवल नसतानाही निष्ठा व श्रद्धा या शिदोरीवर जगून समाजाच्या मूलभूत प्रेरणेला जागृत करण्याचे काम होऊ लागले. खेड्यातील अज्ञ जनता शिक्षाबद्ध होऊ लागली. खेड्यात खराटे खरखरू लागले, रस्ते नाल्या बांधल्या जाऊ लागल्या. हे कार्य ज्या शब्दांनी, ज्या भावनांनी, ज्या विचारांनी साधले त्या सगळ्याचा सुव्यवस्थित संग्रह म्हणजे 'ग्रामगीता'!

तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत ४१ अध्यायांमध्ये जे विषय हाताळले आहेत, त्यांच्या नुसत्या शीर्षकावरून आपल्याला ग्रामगीतेचे मर्म लक्षात येईल. देवदर्शन, धर्माध्ययन, आश्रमधर्म, संसार-परमार्थ, वर्ण व्यवस्था, संसर्ग प्रभाव, आचार प्राबल्य, प्रचार महिमा, सेवा सामथ्र्य, संघटनशक्ति, ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्राम निर्माण कला, ग्राम आरोग्य, गोवंश सुधार, वेष वैभव, गरीबी श्रीमंती, श्रम संपत्ती, जीवनशिक्षण, महिलोन्नती, वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा मेळे, देव देवळे, मूर्तीउपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना व विश्वधर्म, दलित सेवा, भजन प्रभाव, संत चमत्कार, संत स्वरूप, अवतारकार्य, प्रारब्धवाद, प्रयत्नवाद, जीवन कला, आत्मानुभव, ग्रामकुटुंब, भूवैकुंठ, ग्रंथाध्ययन, ग्रंथ महिमा!

साध्या सोप्या शब्दात रचलेली ग्रामगीता आपण याआधी कधी वाचली नसेल, तर तुकडोजी महाराजांच्या जयंतीहून दुसरे चांगले औचित्य ते काय?