शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वारी नाही....पण श्रद्धाभाव कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:46 IST

वारकरी सांप्रदायातील वारकरी घरीच बसून आषाढी वारीचा आनंद सोहळा घेण्यात मानतो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात मोठा वारकरी सोहळा आहे. लाखो वारकरी कोणत्याही नियोजनाशिवाय स्वयंप्रेरणेने पंढरपूरला येतात. प्रत्येक वारीत पांडुरंगाकडे एकच मागणे मागत असतो की, ‘पंढरीचा वारकरी... वारी चुकू न द्यावी हरी...!’ मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी आणि पायी पालखी सोहळा होणार नसल्याने वारकरी सांप्रदायातील वारकरी घरीच बसून आषाढी वारीचा आनंद सोहळा घेण्यात मानतो आहे.ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता समतेची पताका खांद्यावर, कोणी उच्च नाही, स्त्री-पुरुष समानता, एकमेकांच्या पाया पडणारे, आपली शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारे वारकरी. एकीकडे पावसाची चाहूल लागत असताना दुसरीकडे विठुरायाच्यादर्शनाची आस भाविकांना लागत असते. शेकडो मैल चालत येऊन सावळ््या विठुरायाचे दर्शक घेण्याची शेकडो वर्षांपासून सुरु असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हा पहिला आषाढी साहळा असेल की, सर्वसामान्य भाविक पंढरपुरला जाऊन सावळ््या विठुरायाचे पदस्पर्श व मुखदर्शन घेऊ शकत नाहीत. असे असले तरी मनातला भाव आणि विठ्ठलाप्रती असलेली ओढ कमी होणार नसल्याचे वारकरी सांप्रदायातून सांगितले जात आहे. कोरोना महामारीचे संकट पांडुरंग लवकरच दूर करेल, असाही विश्वास वारकऱ्यांनी बोलून दाखविला.दरवर्षी पंढरपूर येथे जात असतो. लग्न झाल्यानंतर जी पंढरपूर वारी सुरू केली ती आता यावर्षी कोरोनामुळे खंड पडली तरी आमचा विठ्ठल आम्हाला शेतमाउली व गावकुसातील मंदिरात दर्शन देईल, अशी श्रद्धा आहे. गावातील मंदिरात पूजाअर्चा करणार असल्याचे सांगितले.- शंकरराव शेळकेचांगलवाडी

सतत ४० वर्ष वारीची परंपरा जोपासली. कधी खंड पडू दिला नाही; मात्र यावर्षी कोरोनामुळे वारीमध्ये खंड पडला. वारी नाही म्हटल्यावर जिवाला हुरहुर वाटत आहे; परंतु कोरोनाचे संकट असल्याने घरीच राहून विठ्ठलाच्या नामस्मरणात यावर्षी आषाढी साजरी- हभप सुभाष महाराज इंगळेपातूरमी गेल्या १५ वर्षांपासून पायदळ पंढरपूरला अखंडित जात आहे; मात्र यावर्षी आपल्या देशावर आलेल्या कोरोना महामारीमुळे यावर्षी मी जाऊ शकत नाही. त्यामुळे अंत:करण भरून येत आहे. यावेळी घरीच पूजा करून महामारी लवकरच जावो, अशी प्रार्थना करणार आहे.- लीलाबाई महादेव सापधारे, मुंडगावगावातील ३० ते ३५ महिला, पुरुष आमच्या सोबत पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात. या वर्षी कोरोना प्रतिबंधामुळे ते शक्य नाही. विठ्ठल चरचरात वसला आहे. तो आमची दर्शन वारी मनोभावे पूर्ण करेल. तनाने वारीत खंड पडला तरी मनाने वारी पूर्ण होईल.- हभप विनायक महाराज ठाकरेकरणदरवर्षी माझी वारी पूर्ण होते.पिढ्यान्पिढ्या आमचे घरी पंढरीची वारी आहे. ती यार्षी खंडित झाल्याने मन व्यथित झाले आहे. आषाढवारीविना नाही, आवड दुसरी काही. पंढरीचा विठुराया जळी, स्थळी सर्वव्यापी आहे. शुद्ध अंत:करणात तो वसलेला आहे.- जनार्धन ठाकरेलोहारी चिंचखेड, ता. अकोट

 

 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAkolaअकोलाPandharpur Wariपंढरपूर वारी