शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 18, 2021 19:47 IST

दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'

'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणे व्हायचे असते. परंतु, दरवेळी दुसरे सांगतात म्हणून आपण आपले मत बनवायचे नसते, कधी कधी काही गोष्टी स्वानुभवातूनही शिकायच्या असतात. आयुष्यात थोडाफार धोका प्रत्येकाला पत्करावाच लागतो. जिंकलो तर यश मिळते आणि हरलो तर अनुभव! हेच शिकवणारी एक बोधकथा...

एका गावात एक गुफा होती. अतिशय भयाण असा तिचा परिसर होता. तिथे जायला गावकरी घाबरत असत. ज्याने तिथला रस्ता धरला तो तिथून कधीच परतला नाही, असा आजवरचा इतिहास होता. 

त्या गावात एक सरकारी कर्मचारी बाहेर गावातून आला होता. गावाचा फेरफटका मारत एक दिवस त्याने गुफेकडे जाणारी पायवाट पाहिली. त्याने गावकऱ्यांकडे चौकशीदेखील केली. कोणी त्याला उत्तर दिले नाही. कर्मचाऱ्याने सरपंचांना गाठले. तो त्यांना म्हणाला, 'सरपंच, गावकरी मला त्या गुफेबद्दल काहीच सांगत नाहीत. तुम्ही तरी सांगा, असे काय विशेष आहे त्या गुफेत?'

सरपंच भीतभीत म्हणाले, 'आम्ही सगळे तिला मृत्यूची गुफा म्हणतो. तिथे गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही.'कर्मचारी म्हणाला, `ही सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही स्वत: कधी अनुभव घेतला आहे का?'सरपंच म्हणाले, `मृत्यूच्या वाटेवर आपणहून कोण चालत जाईल? आम्ही कोणीच तिथे जात नाही, तुम्हीसुद्धा जाऊ नका!'कर्मचारी म्हणाला, `मी तुम्हा सगळ्यांचा भ्रम दूर करतो. उद्या सकाळी सगळ्या गावकऱ्यांसमोर मी त्या गुफेत जातो.'

गावभर चर्चा झाली. सगळे गावकरी उत्सुकतेने त्या वाटेवर जमले. सरकारी कर्मचारी अगदी उत्साहाने गावकऱ्यांचा निरोप घेऊन त्या वाटेने निघाला. बिंदूचा ठिपका होईपर्यंत गावकरी त्याची पाठमोरी आकृती पाहत राहिले. पुढे तो दिसेनासा झाला.

इकडे कर्मचारी गुफेत पोहोचला. तिथे त्याला काळाकुट्ट अंधार दिसला. तो आत चालत राहिला. तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी जोरात धक्का दिल्याचा भास झाला. तो घाबरला. अडखळत पुढे जाऊन पडला. तर पुढे त्याला लख्ख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात त्याला अनेक लोकही दिसले. तो त्या दिशेने चालू लागला. तिथल्या लोकांना भेटला. त्यांना विचारले, तुम्ही कोण?

यावर लोक म्हणाले, 'आम्ही या मृत्यूच्या गुफेचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो होतो. परंतु इथे आल्यावर आम्हाला कळले, की गावात ज्या सुख सुविधा नाहीत, त्या सर्व इथे आहेत. मग आम्ही परत गेलोच नाही, इथेच रमलो.'

कर्मचाऱ्याला त्यांचे म्हणणे पटले. त्यालाही ती नवी दुनिया आवडली. तोही तिथेच रमला. गावकरी मात्र त्यालाही मृत्यूच्या गुपेâने गिळला, या विचाराने परतले आणि एका स्वर्गासमान असणाऱ्या नव्या दुनियेला मुकले.म्हणून दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'