शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 18, 2021 19:47 IST

दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'

'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणे व्हायचे असते. परंतु, दरवेळी दुसरे सांगतात म्हणून आपण आपले मत बनवायचे नसते, कधी कधी काही गोष्टी स्वानुभवातूनही शिकायच्या असतात. आयुष्यात थोडाफार धोका प्रत्येकाला पत्करावाच लागतो. जिंकलो तर यश मिळते आणि हरलो तर अनुभव! हेच शिकवणारी एक बोधकथा...

एका गावात एक गुफा होती. अतिशय भयाण असा तिचा परिसर होता. तिथे जायला गावकरी घाबरत असत. ज्याने तिथला रस्ता धरला तो तिथून कधीच परतला नाही, असा आजवरचा इतिहास होता. 

त्या गावात एक सरकारी कर्मचारी बाहेर गावातून आला होता. गावाचा फेरफटका मारत एक दिवस त्याने गुफेकडे जाणारी पायवाट पाहिली. त्याने गावकऱ्यांकडे चौकशीदेखील केली. कोणी त्याला उत्तर दिले नाही. कर्मचाऱ्याने सरपंचांना गाठले. तो त्यांना म्हणाला, 'सरपंच, गावकरी मला त्या गुफेबद्दल काहीच सांगत नाहीत. तुम्ही तरी सांगा, असे काय विशेष आहे त्या गुफेत?'

सरपंच भीतभीत म्हणाले, 'आम्ही सगळे तिला मृत्यूची गुफा म्हणतो. तिथे गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही.'कर्मचारी म्हणाला, `ही सगळी अंधश्रद्धा आहे. तुम्ही स्वत: कधी अनुभव घेतला आहे का?'सरपंच म्हणाले, `मृत्यूच्या वाटेवर आपणहून कोण चालत जाईल? आम्ही कोणीच तिथे जात नाही, तुम्हीसुद्धा जाऊ नका!'कर्मचारी म्हणाला, `मी तुम्हा सगळ्यांचा भ्रम दूर करतो. उद्या सकाळी सगळ्या गावकऱ्यांसमोर मी त्या गुफेत जातो.'

गावभर चर्चा झाली. सगळे गावकरी उत्सुकतेने त्या वाटेवर जमले. सरकारी कर्मचारी अगदी उत्साहाने गावकऱ्यांचा निरोप घेऊन त्या वाटेने निघाला. बिंदूचा ठिपका होईपर्यंत गावकरी त्याची पाठमोरी आकृती पाहत राहिले. पुढे तो दिसेनासा झाला.

इकडे कर्मचारी गुफेत पोहोचला. तिथे त्याला काळाकुट्ट अंधार दिसला. तो आत चालत राहिला. तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी जोरात धक्का दिल्याचा भास झाला. तो घाबरला. अडखळत पुढे जाऊन पडला. तर पुढे त्याला लख्ख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात त्याला अनेक लोकही दिसले. तो त्या दिशेने चालू लागला. तिथल्या लोकांना भेटला. त्यांना विचारले, तुम्ही कोण?

यावर लोक म्हणाले, 'आम्ही या मृत्यूच्या गुफेचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो होतो. परंतु इथे आल्यावर आम्हाला कळले, की गावात ज्या सुख सुविधा नाहीत, त्या सर्व इथे आहेत. मग आम्ही परत गेलोच नाही, इथेच रमलो.'

कर्मचाऱ्याला त्यांचे म्हणणे पटले. त्यालाही ती नवी दुनिया आवडली. तोही तिथेच रमला. गावकरी मात्र त्यालाही मृत्यूच्या गुपेâने गिळला, या विचाराने परतले आणि एका स्वर्गासमान असणाऱ्या नव्या दुनियेला मुकले.म्हणून दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!'