शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

बाहेरील वातावरण कितीही अस्वस्थ करणारे असो, मन शांत ठेवण्यासाठी वाचा भगवान बुद्धांचा उपदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 07:00 IST

भगवान बुद्धांची मूर्ती अतिशय शांत आणि स्तब्ध दिसते, ती शांतता  जीवनात उतरावी असे वाटत असेल तर  त्यांच्या उपदेशाचे पालन करा!

भगवान बुद्धांचे असंख्य शिष्य होते. त्यापैकी एक होता, 'पूर्णा.' त्याची साधना पूर्ण झाली होती. म्हणून तो बुद्धांना म्हणाला, 'भगवान, आता आपण मला अनुज्ञा द्या. मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे.'

भगवान म्हणाले, 'ठीक आहे. माझी अनुज्ञा आहे. परंतु मला अगोदर सांग, तू कुठे जाणार आहेस?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे. जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्खू गेलला नाही आणि तिथल्या लोकांना आपल्या उपदेशाचा लाभ झालेला नाही. म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम या प्रदेशाची निवड केली.'

भगवान म्हणाले, 'अरे, तिकडे कोणीही भिक्खू गेला नाही, याला कारण आहे. तिथले लोक फार वाईट आहेत म्हणे! तू तिथे गेलास, तर कदाचित ते तुझा अपमान करतील, मग तू काय करणार?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी नुसता अपमानच केला. शिव्या वगैरे दिल्या, पण मारले तर नाही ना.'

भगवान म्हणाले, 'समजा, एखाद्याने तुला खरोखरच मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, तरीही मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी मला नुसते मारले, जीव तर नाही घेतला.'

भगवान म्हणाले, 'तुला आता आणखी एक, शेवटचा प्रश्न विचारतो. समजा, त्यांपैकी एकाने तुला जिवे मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, याही अवस्थेत मी त्यांचा ऋणीच राहीन. कारण, त्यांनी मला जीवनमुक्ती दिली. नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहकून गेलो असतो.'

यावर संतुष्ट होऊन भगवान बुद्ध म्हणाले, 'पूर्णा, तू माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलास. आता तू हवे त्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करू शकतोस. कारण, तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील. ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही.'

भगवान महावीरांच्या बाबतीत असे सांगतात, की ते काट्यावरूनही अनवाणी चालू शकत असत. कारण, ते चालताना काटे आपली वर असलेली टोके खाली करत असत. महंमद पैगंबरांच्या बाबतीतही म्हटले जाते, वाळवंटातून प्रखर उन्हात चालत असताना त्यांच्या डोक्यावर नेहमी एक ढग सावली धरत असे. उलटे होणारे काटे व सावली धरणारा ढग यांच्यावर विश्वास ठेवणे कदाचित अवघड वाटेल. परंतु, एक मात्र नक्की, ज्याच्या मनात काटे नाहीत, त्याच्या पायांना काटे टोचणार नाहीत आणि ज्याच्या हृदयात जळणारी वासना नसेल, त्याला उन्हाच्या कडाक्यातही सर्वत्र सावली असल्याचा भास होईल. 

एकूणच काय, तर सर्व काही चित्तवृत्तीवर अवलंबून असते. ती जोपर्यंत शांत असते, तोपर्यंत बाहेरील विषम स्थितीचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही.