शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

नित्य नाम वाचे तोचि एक धन्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:07 IST

संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

प्रचलीत स्पर्धात्मक धावपळीच्या जीवन वाटचालीत माणसाला नामस्मरण करायलाही वेळ नाही आणि तेवढा उत्साहही नसतो. परंतु संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग  तोही पैसे न खर्च न करता कोणता असेल तर केवळ ‘नामस्मरण’ होय. बाह्य जगातील भाैतिक सुविधांच्या विलासात मनाला अजिबात समाधान लाभत नाही. तेव्हा मनुष्य नकळत परमेश्वराकडे धाव घेतो. प्रभुचे नुसते नामस्मरण जरी केले तरी विविध विकारापासून सुटका होते. नाम तुझे देवा, केशवा माधवा। कोणतेही घ्यावे गोडावा तयात।।संत ज्ञानेश्वर महाराज हरीपाठात सांगतात - सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तरवी कळा दावी हरी।तैसे नव्हे नाम सर्वमार्गा वरीष्ठ, तेथे काही सर्वमार्गा लगती।।सात म्हणजे योगमार्गाच्या ७ पायऱ्या ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यानाचा समावेश होतो. ह्यापासून समाधी साधणे होय. पाच म्हणजे पंचाग्नी साधनाचा तपोमार्ग आणि तीन रूपे स्थुल, सुक्ष्म, कारण ह्याच निरास करून, त्याच्या पलीकडे असलेल्या परमतत्वाशी समरसता आणि दशकांचा मेळा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रीये मिळून दमनाचा मार्ग निर्माण करणे हे सर्व मार्ग व्यवस्थितपणे घडले तर श्रीहरीची एकतत्वी कळा प्रत्यक्षास येवू शकते. परंतु माऊली म्हणतात हे सर्व मार्ग अतिशय कष्टमय आहेत. नाममार्ग मात्र तसा नाही. येथे उपासना करणाऱ्याला कोणतेच कष्ट नाही. नाम मार्ग  हा श्रेष्ठ असा पंथराज असल्याचे माऊली स्पष्ट करतात. संत निवृत्तीनाथ वर्णन करतात. नित्य नामवाचे तोचि एक धन्य । त्याचे शुध्द पुण्य इथे माऊली म्हणतात रामकृष्ण नाम जपाचे महत्व आपल्या चिंतनातून मांडले आहे.नामा म्हणे नाम ओंकाराचे मुळ। परब्रम्ह केवळ रामनाम।।नाथ महाराज - नाम जयापाशी असे। नारायण तेथे वसे।।संत जनाबाई - रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप। पापाचे कळप पळती पुढे।।संत तुकोबा - हेचि सर्व सुख जपावा विठ्ठल। न दवडावा पळ क्षण वाया।।संत रामदास - हरे राम मंत्र सोपा, जपारे।संत विठोबाराय - संत एकाती बैसले । सर्व  सिध्दांत शोधीलेसार काढीले निवडोनी । ते हे श्री हरीचे नाम।।

संत सेना महाराज - अवघे काळी वाचे म्हणा नारायण। सेना म्हणे क्षण जावू न द्या।। नामस्मरणाच्या बळावरच संतांना संतपण प्राप्त झाले. दुर्लभ जीवनाचे कल्याण हे नामाचे स्मरणात असल्याने नाम हेच देवाचे रूप समजून त्याचा अंगीकार करायला हवा, संत तुकोबाराय म्हणतात नाशीवंत देह नासेल हा जाण। कारे उच्चाराना वाचे नाम। तुका म्हणे नाम वेदासी आगळे। ते दिले गोपाळे फुकासाठी.

 : हभप डाॅ.ज्ञानेश्वर मिरगेशेगाव

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक