शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नित्य नाम वाचे तोचि एक धन्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:07 IST

संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

प्रचलीत स्पर्धात्मक धावपळीच्या जीवन वाटचालीत माणसाला नामस्मरण करायलाही वेळ नाही आणि तेवढा उत्साहही नसतो. परंतु संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग  तोही पैसे न खर्च न करता कोणता असेल तर केवळ ‘नामस्मरण’ होय. बाह्य जगातील भाैतिक सुविधांच्या विलासात मनाला अजिबात समाधान लाभत नाही. तेव्हा मनुष्य नकळत परमेश्वराकडे धाव घेतो. प्रभुचे नुसते नामस्मरण जरी केले तरी विविध विकारापासून सुटका होते. नाम तुझे देवा, केशवा माधवा। कोणतेही घ्यावे गोडावा तयात।।संत ज्ञानेश्वर महाराज हरीपाठात सांगतात - सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तरवी कळा दावी हरी।तैसे नव्हे नाम सर्वमार्गा वरीष्ठ, तेथे काही सर्वमार्गा लगती।।सात म्हणजे योगमार्गाच्या ७ पायऱ्या ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यानाचा समावेश होतो. ह्यापासून समाधी साधणे होय. पाच म्हणजे पंचाग्नी साधनाचा तपोमार्ग आणि तीन रूपे स्थुल, सुक्ष्म, कारण ह्याच निरास करून, त्याच्या पलीकडे असलेल्या परमतत्वाशी समरसता आणि दशकांचा मेळा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रीये मिळून दमनाचा मार्ग निर्माण करणे हे सर्व मार्ग व्यवस्थितपणे घडले तर श्रीहरीची एकतत्वी कळा प्रत्यक्षास येवू शकते. परंतु माऊली म्हणतात हे सर्व मार्ग अतिशय कष्टमय आहेत. नाममार्ग मात्र तसा नाही. येथे उपासना करणाऱ्याला कोणतेच कष्ट नाही. नाम मार्ग  हा श्रेष्ठ असा पंथराज असल्याचे माऊली स्पष्ट करतात. संत निवृत्तीनाथ वर्णन करतात. नित्य नामवाचे तोचि एक धन्य । त्याचे शुध्द पुण्य इथे माऊली म्हणतात रामकृष्ण नाम जपाचे महत्व आपल्या चिंतनातून मांडले आहे.नामा म्हणे नाम ओंकाराचे मुळ। परब्रम्ह केवळ रामनाम।।नाथ महाराज - नाम जयापाशी असे। नारायण तेथे वसे।।संत जनाबाई - रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप। पापाचे कळप पळती पुढे।।संत तुकोबा - हेचि सर्व सुख जपावा विठ्ठल। न दवडावा पळ क्षण वाया।।संत रामदास - हरे राम मंत्र सोपा, जपारे।संत विठोबाराय - संत एकाती बैसले । सर्व  सिध्दांत शोधीलेसार काढीले निवडोनी । ते हे श्री हरीचे नाम।।

संत सेना महाराज - अवघे काळी वाचे म्हणा नारायण। सेना म्हणे क्षण जावू न द्या।। नामस्मरणाच्या बळावरच संतांना संतपण प्राप्त झाले. दुर्लभ जीवनाचे कल्याण हे नामाचे स्मरणात असल्याने नाम हेच देवाचे रूप समजून त्याचा अंगीकार करायला हवा, संत तुकोबाराय म्हणतात नाशीवंत देह नासेल हा जाण। कारे उच्चाराना वाचे नाम। तुका म्हणे नाम वेदासी आगळे। ते दिले गोपाळे फुकासाठी.

 : हभप डाॅ.ज्ञानेश्वर मिरगेशेगाव

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक