शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:24 IST

जगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन यश व अपयशाने भरलेले असते. माणसाला जीवनात यशाची शिखरे सतत साद घालत असतात, पण माणूस भूतकाळातील अपयशाने होरपळून निघालेला असतो.

- मोहनबुवा रामदासीनिश्चयेवीण सर्वकाही। अनुमान ते प्रमाण नाही।व्यर्थची पडिले प्रवाही। संदेहाचे।।जगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन यश व अपयशाने भरलेले असते. माणसाला जीवनात यशाची शिखरे सतत साद घालत असतात, पण माणूस भूतकाळातील अपयशाने होरपळून निघालेला असतो. त्यामुळे त्याच्या मनात निश्चय घेण्याचे धाडस डळमळीत असते. प्रत्येक व्यक्तीच्या अशा अपेक्षा भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात. कुणाला ईश्वराचा भक्त व्हायचे असते. कुणाला झटपट श्रीमंत व्हायचे असते. कुणाला समाजात मानसन्मानाची हाव सुटलेली असते. एक ध्येय निश्चित नसल्याने त्यांची स्थिती भांबावलेली दिसते. त्यामुळे अनेकजण अस्वस्थ दिसतात. ध्येयाची निश्चिती झाली तरी त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा हेच त्याला समजत नाही. कोणता मार्ग स्वीकारावा व कोणता मार्ग स्वीकारू नये याबाबतीत त्याच्या मनात सारखा संशयकल्लोळ माजलेला दिसतो. म्हणून समर्थ म्हणतात:व्यर्थ संशयाचे जिणे। व्यर्थ संशयाचे धरणे।व्यर्थ संशयाचे करणे। सर्व काही।।मनातील संशयाचा विवेकाने त्याग करून उच्चतम ध्येयाच्या प्राप्तीचा दृढनिश्चय होत नाही तोवर सर्वच व्यर्थ आहे. जोपर्यंत मनाचा पक्का निश्चय होत नाही तोपर्यंत बोलाचा भात व बोलाची कडी अशीच अवस्था होते. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ज्या श्री समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना म्हटले होते....निश्चयाचा महामेरू।बहूत जनांसी आधारू।अखंड स्थितीचा निर्धारू।श्रीमंत योगी।।त्या छत्रपतींचे आम्ही आज्ञाधारक मावळे आहोत, तर छत्रपतींचा हा निश्चयात्मक स्वरूपाचा बाणा प्रत्येक मावळ््याच्या अंत:करणात असलाच पाहिजे. आपला भारत देश अशा दृढनिश्चयी, करारी आणि वीर पुरुषांची ओळख असणारा देश आहे. आपल्या देव, देश व धर्माची निश्चयात्मक अशी अस्मिता जपूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक