शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:24 IST

जगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन यश व अपयशाने भरलेले असते. माणसाला जीवनात यशाची शिखरे सतत साद घालत असतात, पण माणूस भूतकाळातील अपयशाने होरपळून निघालेला असतो.

- मोहनबुवा रामदासीनिश्चयेवीण सर्वकाही। अनुमान ते प्रमाण नाही।व्यर्थची पडिले प्रवाही। संदेहाचे।।जगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन यश व अपयशाने भरलेले असते. माणसाला जीवनात यशाची शिखरे सतत साद घालत असतात, पण माणूस भूतकाळातील अपयशाने होरपळून निघालेला असतो. त्यामुळे त्याच्या मनात निश्चय घेण्याचे धाडस डळमळीत असते. प्रत्येक व्यक्तीच्या अशा अपेक्षा भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात. कुणाला ईश्वराचा भक्त व्हायचे असते. कुणाला झटपट श्रीमंत व्हायचे असते. कुणाला समाजात मानसन्मानाची हाव सुटलेली असते. एक ध्येय निश्चित नसल्याने त्यांची स्थिती भांबावलेली दिसते. त्यामुळे अनेकजण अस्वस्थ दिसतात. ध्येयाची निश्चिती झाली तरी त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा हेच त्याला समजत नाही. कोणता मार्ग स्वीकारावा व कोणता मार्ग स्वीकारू नये याबाबतीत त्याच्या मनात सारखा संशयकल्लोळ माजलेला दिसतो. म्हणून समर्थ म्हणतात:व्यर्थ संशयाचे जिणे। व्यर्थ संशयाचे धरणे।व्यर्थ संशयाचे करणे। सर्व काही।।मनातील संशयाचा विवेकाने त्याग करून उच्चतम ध्येयाच्या प्राप्तीचा दृढनिश्चय होत नाही तोवर सर्वच व्यर्थ आहे. जोपर्यंत मनाचा पक्का निश्चय होत नाही तोपर्यंत बोलाचा भात व बोलाची कडी अशीच अवस्था होते. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ज्या श्री समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना म्हटले होते....निश्चयाचा महामेरू।बहूत जनांसी आधारू।अखंड स्थितीचा निर्धारू।श्रीमंत योगी।।त्या छत्रपतींचे आम्ही आज्ञाधारक मावळे आहोत, तर छत्रपतींचा हा निश्चयात्मक स्वरूपाचा बाणा प्रत्येक मावळ््याच्या अंत:करणात असलाच पाहिजे. आपला भारत देश अशा दृढनिश्चयी, करारी आणि वीर पुरुषांची ओळख असणारा देश आहे. आपल्या देव, देश व धर्माची निश्चयात्मक अशी अस्मिता जपूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक