शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

'देवाक काळजी रे' या पंक्तीची अनुभूती देणारी छानशी गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 19:58 IST

देव आहे, तो आपल्या मदतीलाही येतो. फक्त आपली तेवढी गाढ श्रद्धा आणि संकटकाळात संयम दाखवता यायला हवा.

सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे... 

समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकातील या दोन ओळी अतिशय दिलासादायक आहेत. खरोखरच श्रद्धा आणि सबुरी ठेवली, तर या गोष्टीची प्रचिती देखील येते. आता या वैद्यराजांची गोष्टच पहा ना... 

एका गावात एक वैद्य राहत होते. त्यांच्या उपचारांनी लगेच गुण येत असे. तसेच ते रुग्णांकडून फी आकारत नसत. ज्याला जसे शक्य होतील त्याने तसे पैसे द्यावेत, नसतील पैसे तर मोफत उपचार घ्यावेत असा त्यांचा शिरस्ता होता. त्यांची पत्नी त्यांना रोज सकाळी वाण सामानाची यादी देत असे. दिवसभर जमलेल्या पैशांतून ते वाणसामान आणत असत. देवदयेने त्यांना काहीही कमी पडत नव्हते. पण जेवढ्यास तेव्हढी मिळकत असल्याने साठवणी करण्याइतकी कमाई नसे. 

अलीकडेच त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. बायकोने नेहमीप्रमाणे वाण सामानाची यादी देत जोडून मुलीच्या लग्न सामानाचीही यादी दिली. ती वाचून वैद्य काळजीत पडले. आजवर कोणाकडून ठराविक रक्कम आकारली नाही, आता मुलीच्या लग्नासाठी कोणावर अशी सक्ती करणे किंवा पैशांसाठी अडवणूक करणे योग्य ठरणार नाही. असो, देवाक काळजी म्हणत त्यांनी कामाला सुरुवात केली. 

दिवसभराचे काम संपवून वैद्यराज घरी निघणार, तोच त्यांच्या दवाखान्यासमोर एक आलिशान गाडी थांबली. त्यातून एक श्रीमंत व्यक्ती बाहेर आली. त्या व्यक्तीने वैद्यराजांना वाकून नमस्कार केला. वैद्यराज गोंधळले. त्या व्यक्तीने स्वपरिचय दिला. ती म्हणाली, 'वैद्यराज आपण मला ओळखले नसेल, पण मी आपल्याला ओळखतो. अनेक वर्षांपूर्वी तुमची ख्याती ऐकून मी तुमच्या भेटीला आलो होतो. आम्हाला संतानप्राप्ती नव्हती. तुम्ही औषध दिले. त्याचा गुण आला तरच फी द्या असे म्हटले होते. तुमच्या औषधाला गुण आला आणि आम्हाला कन्यारत्न झाले. त्यानंतर प्रापंचिक गडबडीत मी एवढा अडकलो की तुमची फी द्यायला विसरलो. आज कामानिमित्त या गावी आलो होतो, म्हणून आठवणीने तुमची भेट घ्यायला आलो. तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात जे सुख आले आहे, त्याचा मोबदला मी पैशात देऊ शकेन असे वाटत नाही. तरीदेखील मी तुम्हाला हा एक लाख रुपयांचा धनादेश देऊ इच्छितो. कृपया नाकारू नका. तुमची फी आहे असे समजा. आणि ही माझ्या मुलीची लग्न पत्रिका. पंधरा दिवसांनी तिचे लग्न आहे. तुमचे शुभाशीर्वाद तिला मिळू द्या. आम्ही वाट पाहतो.' 

एवढे बोलून तो इसम आल्या पावली निघून गेला. वैद्यराजांच्या एका हातात वाण सामान आणि मुलीच्या लग्न सामानाची यादी, तर दुसऱ्या हातात एक लाख रुपयांचा धनादेश होता. वैद्यराजांनी कृतज्ञतेने आकाशाकडे पाहिलं, देवाचे मनोमन आभार मानले आणि स्मित करत म्हणाले... देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे!