शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : दुसरी माळ: ब्रह्मचारिणी

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 18, 2020 07:30 IST

Navratri 2020 : ब्रह्मचरिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही इप्सित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू.

ज्योत्स्ना गाडगीळ 

आई भगवतीचे नवरात्रीतले दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणीचे! इथे ब्रह्न हा शब्द तपश्चर्या या अर्थी वापरला आहे. ब्रह्मचारिणी अर्थात तपश्यर्या करणारी. वेद, तत्व आणि तप हे ब्रह्न शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ब्रह्मचारिणी हे देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलु आहे.

पूर्वजन्मात ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या वंशात जन्म घेतला होता. तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपपश्चर्या केली होती. याच अत्यंत अवघड तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीने एक हजार वर्षे फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली होती. नंतरची शंभर वर्षे फक्त भाज्या खाऊन  तर कधी जमिनीवरो पडलेली बेलपत्रे खाऊन आणि उर्वरित वर्षे कडक उपास करत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घोर तपश्चर्या केली होती. देवीने अन्नत्याग करत हळू हळू बिल्वपत्रांचे सेवनही बंद केले, म्हणून तिला `अपर्णा' असेही नाव मिळाले. 

हेही वाचा: Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य: पहिली माळ: शैलपुत्री

हजारो वर्षे तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीच्या मुखावर तेज आले, मात्र शरीर कृष झाले, क्षीण झाले. तिची अशी अवस्था पाहून आई मेनाला तिची काळजी वाटत असे. तिला तपश्चर्येतून जागे करण्यासाठी आईने बऱ्याचदा हाक मारली, ती हाक `उ मा' या नावे गाजली आणि देवीला आणखी एक नाव मिळाले, उमा!

देवीच्या कठोर तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत हाहा:कार माजला. देवता, ऋडि, सिद्धगण, मुनि सर्वांनाच देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा हेवा वाटू लागला. शेवटी खुद्द ब्रह्मदेव आले आणि त्यांनी प्रसन्न होऊन आकाशवाणी केली, `हे देवी, आजवर एवढी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. ती फक्त तूच करू जाणे. तुझ्या तपश्चर्येची चर्चा युगानुयुगे केली जाईल. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान चंद्रमौळी तुला पतिरूपात प्राप्त होईल. आता तू तुझी तपश्चर्या थांबव. लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येतील, त्यांच्याबरोबर तू परत जा.'

ब्रह्मदेवांचे शब्द खरे ठरले आणि देवीचा भगवान शंकराशी विवाह झाला. ब्रह्मचरिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही इप्सित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू.

ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारा आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. देवीच्या कृपेने यश व सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मचरिणी देवीच्या उपासनेमुळे `स्वाधिष्ठान' चक्रात मन स्थिरावते. या स्थितीत पोहोचलेला योगी देवीची कृपा प्राप्त करतो, अशी मान्यता आहे. 

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकरमण्डलू,देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

हेही वाचा: Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

टॅग्स :Navratriनवरात्री