शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कलीयुगात आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच खरे तारणहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 13:22 IST

जगामध्ये संसार कुणाचाही पुरा होत नाही. या जगामध्ये कुणाचेही पोट भरत नाही. त्यामुळे सध्याच्या कलयुगामध्ये आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच खरे तारणहार आहेत.

अध्यात्म

गोरक्षनाथ महाराज शिंदेदत्त मंदिर प्रमुख,तळवडी (ता. कर्जत), जि. अहमदनगर.

 

जो मज अनन्य शरण। त्याचे निवारी मी जन्म मरण। या लागी शरणगता शरण्य मि चि एकू।।८८

ही नवव्या अध्यायातील ओवी आहे. ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय म्हणजे भक्ती योग आहे. भक्तीचा महिमा सांगणारा हा अध्याय आहे. जो मला एक एकनिष्ठेने शरण येतो. त्याला जन्म मरणापासून मी मुक्त करतो म्हणून शरणगताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायामध्ये भक्तीयोग मांडला आहे. या ओवीमध्ये चार भाग पडतात. ते असे- १) शरण जाणारा कोण?  २) शरण कोणाला जायचे?  ३) शरण कशा प्रकारे जायचे? ४) शरण गेल्यानंतर फायदा काय होतो?

पहिल्या भागात शरण जाणारा कोण? यावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला उत्तर देताना सांगितले की, शरण जाणारा जीव आहे. जीव हा बध्द अवस्थेत असतो. त्याला जन्म-मरणाचे बंधन असते म्हणून शरण जाणारा जीव होय.

दुसºया भागात शरण कोणाला जायचे? तुकाराम महाराज कलयुगामध्ये ३३ कोटी देव आहेत. त्यापैकी कोणत्या देवाला शरण जायचे? याबाबत ज्ञानेवर महाराज सांगतात..अशा देवाला शरण जायचे त्याचे पाय सम आहेत. ज्याची दृष्टी विटेवर आहे. ज्याचे हात कमरेवर आहेत. अशा विठ्ठलाला शरण जायचे. 

शरण कशा प्रकारे जायचे?-एके ठिकाणी चोखामेळा म्हणतात,

ऊस ढोगा परी रस नव्हे ढोगा।।काय भुललाशी वरिल्या रंगा।।नदी ढोगी परिजल नव्हे ढोगे।।चोखा ढोगा परि भाव नव्हे ढोगा।। 

शरण कशा प्रकारे जायचे..यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनन्य भावनेने शरण जायचे. 

चवथ्या भागात शरण गेल्यावर काय फायदा होतो. यावर ज्ञानेश्वर महाराज  म्हणतात.., जगात सर्व गोष्टी फायद्यासाठी करतात. तर देवाला शरण गेल्यावर फायदा काय होतो. तर देव आपल्याला चौºयांशी लक्ष योनीमध्ये आपल्याला साक्षी असतो. या जन्म मरणापासून मुक्ती करतो. 

याबाबत एक उदाहरण देता येईल.एक गजेंद्र असतो. तो पाण्यात जातो. त्याला नक्र पकडतो. त्यावेळी तो आपल्या पत्नीला हाक मारतो. मुलाला हाक मारतो तरीही ते येत नाहीत. शेवटी एक फळ घेतो. गजेंद्र हे फळ जगाच्या कर्त्याला अर्पण करतो. लगेच भगवान विष्णू येतात. गजेंद्राला नक्राच्या तावडीतून सोडवतात. याप्रमाणेच मानवी जन्म लक्ष ८४ योनी सुकल करतो. तो भवगनात आहे हा फायदा  होतो. 

याचा सार असा आहे की, या जगामध्ये संसार कुणाचाही पुरा होत नाही. या जगामध्ये कुणाचेही पोट भरत नाही. त्यामुळे सध्याच्या कलयुगामध्ये आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच तारणहार आहे. त्यासाठी प्रत्येकाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची जोपासना करणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतAdhyatmikआध्यात्मिक