शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

जुलै महिन्यात शनी देवांपासून 'या' तीन राशींनी बाळगावी विशेष सावधगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:43 IST

शनी ग्रहाचे वक्र परिवर्तन म्हणजे परीक्षेत परीक्षा असे मानण्यास हरकत नाही. 

शनी हा ग्रह अत्यंत कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी दशेचा आपल्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडत असतो. आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीव्यतिरिक्त दर मासाला नभोमंडलात बदलणारी ग्रहदशादेखील आपल्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकत असते. त्यातही जेव्हा शनीचे भ्रमण सुरु होते, त्यावेळेस बाराही राशींवर त्याचे कमी अधिक परिणाम दिसून येतात. परंतु जुलै महिन्यात शनी वक्र दिशेने भ्रमण करत असल्यामुळे तीन राशींनी सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा काळ ठरू शकतो. या तीन राशी कोणत्या ते पाहू... 

धनु, मकर आणि कुंभ राशीवर साडेसाती सुरु आहे. धनु राशीसाठी साडेसातीचा अंतिम टप्पा आहे, मकर राशीचा मध्यम टप्पा आहे आणि कुंभ राशीसाठी साडेसातीचा सुरुवातीचा काळ आहे. साडेसाती या शब्दाने भयभीत होण्याचे कारण नाही. परीक्षेला घाबरून चालत नाही. आपण अभ्यास केला असेल तर परीक्षेची भीती वाटत नाही आणि केला नसेल तर नापास होण्याची भीती वाटते. त्याचप्रमाणे साडेसातीच्या काळात आपला प्रामाणिकपणा, इतरांना मदत, संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता, चांगल्या वाईट लोकांची ओळख अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत कस लागतो. हा काळ अपयश देणारा नसून आपल्या आयुष्यातील वास्तवाचे दर्शन घडवणारा असतो. त्यामुळे शनी ग्रहाचे वक्र परिवर्तन म्हणजे परीक्षेत परीक्षा असे मानण्यास हरकत नाही. 

या काळात कोणत्या गोष्टी घडू शकतात?

आपण सगळेच जण दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या संकटांना सामोरे जातो. पण काही वेळेस संकट एकटे येत नाही, तर ते संकटांची शृंखलाच सोबत घेऊन येते. अशा वेळेस न डगमगता त्याला सामोरे जाणे ही आहे परीक्षेत परीक्षा!अनेकदा आपल्या संयमाचा कस लागतो, त्यावेळेस आपला शारीरिक, मानसिक, आर्थिक तोल ढासळू न देता, मनाचा संयम कायम ठेवला पाहिजे. आजारपणात किंवा आर्थिक अडचणींमध्ये मनुष्य पूर्ण खचून जातो. त्यावेळेस उमेद सोडून न देता, इच्छा शक्ती वाढवून त्या संकटाना तोंड देता आले पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टी जिथे आपल्याला आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहणे गरजेचे असते, ती तत्त्व सोडून न देता परिस्थितीला सामोरे जाणे अभिप्रेत असते. हीच आहे साडेसाती!

त्यात पुढील उपाय केले असता, मानसिक बळ मिळून शनीदशेचा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकेल. 

    • हनुमान आणि शंकराची पूजा करावी. 
    • पिंपळाच्या झाडाशी दर शनिवारी राईच्या तेलाचा दिवा लावावा. 
    • अज्ञात लोकांशी परिचय करताना किंवा त्यांच्यासोबत काम करताना सावधगिरी बाळगावी. 
    • दर शनिवारी काळे उडीद, काळे तीळ, तेल आणि रुईच्या पानांचा हार शनी देवाला वहावा. 
    • शक्य असल्यास पूर्ण महिनाभर मांसाहार आणि मद्यपान टाळावे. विशेषतः शनिवारी तरी नक्कीच व्यर्ज्य करावे. 
    • चिमण्यांना दाणा पाणी आणि मुंग्यांना साखर टाकायला विसरू नका.