शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Mokshada Ekadashi 2023: मोक्षाच्या वाटेतही एक नदी लागते, ती पार करून जाणे कर्मकठीण; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 07:00 IST

Mokshada Ekadashi 2023: मोक्ष मिळावा म्हणून आज मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाते, पण मोक्षाचा मार्गही किती कठीण आहे, याचे वर्णन गरुड पुराणात वाचायला मिळते. 

बालपणापासून आपण स्वर्ग आणि नरक हे दोन्ही शब्द ऐकले आहेत. स्वर्गाबद्दल जेवढे कुतुहल नाही, तेवढे नरकाबद्दल आपल्या मनात कुतुहल असते. कारण, आजवरील ऐकीव माहितीनुसार नरकात उकळते तेल, तलवारी, रक्ताचे नदी, अणकुचीदार शस्त्रे, भयंकर अंधार, तप्त वातावरण, छळ करणारे राक्षस अशा अनेक गोष्टी असतात. आपले पापभिरु मन नरकाच्या कल्पनेनेही भयभित होते. यावर काही जण, स्वर्ग नरक या कविकल्पना आहेत असे म्हणून आपली सुटका करून घेतात. परंतु, पुराणात याबद्दल सविस्तर माहिती सापडते आणि अशा भयावह नरकातून स्वर्गाकडे जाणारा मार्ग कोणता, याबद्दल मार्गदर्शन केलेलेही आढळते. गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णांनी स्वर्ग नरक भेद आणि तेथील यमनियम यावर गरुडाला मार्गदर्शन केले आहे. 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, वैतरणी नावाची एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वाराशी आहे. ही नदी अत्यंत भीतिदायक आहे. हिचा विस्तार नऊ हजार योजने इतका आहे. पृथुत्वावर सर्वात मोठी हीच एक नदी आहे. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते व हिला पार करणे अत्यंत कठीण कर्म आहे. किडेमुंग्यांनी नेहमी ही भरलेली असते. पापी लोक त्यात सारखे उठत पडत असतात व गोंधळ घालत असतात.

ही महानदी चार प्रकारच्या प्राण्यांनी युक्त असते. दान कर्माचे पुण्य केलेल्या जीवालाच ती ओलांडणे सोपे होते. कृतघ्न, विश्वासघातकी लोक दीर्घकाळपर्यंत तिथेच अडकून राहतात. जीवितपणी दान देताना श्रद्धाभाव असेल, तर ते दान दीर्घ कालापर्यंत राहते. परंतु शरीरसंपत्ती अस्थिर असते. मृत्यू नित्य असतो, म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा. परंतु वेळोवेळी योग्य हाती त्याचा विनियोग करून, दान करून वैतरणी पार करण्यासाठी पुण्यसंचय करावा. भगवंताची प्रार्थना करावी, की मृत्योत्तर ही महाभयंकर नदी पार करण्यासाठी शक्य तेवढे पुण्य साठवण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुण्य मृत्यूपश्चात कामी यावे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि तथाकथित नरकातून सुटका होत मोक्षाचा मार्ग मोकळा व्हावा. 

जो मनुष्य दान-धर्म यांपासून दूर राहतो, त्याचे जीवन या भूमंडलावर दरिद्रीच राहते. शरीर नाशवंत आहे. ते कधी कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेले व नित्य टिकणारे कार्य अर्थात दान पुण्य नेहमी करावे. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल, सांगता येत नाही.

म्हणून मरणोत्तर काय होईल याची काळजी करण्यापेक्षा जिवंतपणी काय चांगले काम करता येईल याचा विचार करा. त्यामुळे आपोआपच मरणोत्तर मार्ग मोकळा होईल.