शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

'ध्यान’ म्हणजे चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 19:36 IST

'Meditation' means contemplation : चित्ताची धारणा असेल तेथेच चित्त स्थिर होणे व ते दुसऱ्या विषयावर न जाणे याला ‘ध्यान’ असे म्हणतात.

'ध्यान’ म्हणजे चिंतन. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून (धातु = क्रियापदाचे मूळ रूप) निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’ असा आहे.  चित्ताची धारणा असेल तेथेच चित्त स्थिर होणे व ते दुसऱ्या विषयावर न जाणे याला ‘ध्यान’ असे म्हणतात. “धारणेसाठी जो विषय निवडला असेल त्या विषयाचा अनेक क्षणांपर्यंत व्यत्ययरहित होणारा अनुभव म्हणजे ध्यान,” अशी पतंजलींनी ध्यानाची व्याख्या केली आहे (तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् योगसूत्र ३.२).भोज व वाचस्पति मिश्र यांच्या मते धारणेचा जो आधारभूत विषय म्हणजे आलंबन त्यावर जाणीवेची एकतानता म्हणजे ध्यान होय (पातंजल योगसूत्र  ३.२ वरील भोजवृत्ति व तत्त्ववैशारदी). “धारणेमुळे साध्य होते ते ध्यान,” असे विज्ञानभिक्षू यांनी म्हटले आहे (धारणासाध्यं ध्यानमाह पातंजल योगसूत्र  ३.२ वरील योगवार्त्तिक). ध्यानामध्ये जाणीवेचा प्रवाह ध्यानासाठी निवडलेल्या विषयावर टिकून राहतो, तो प्रवाह एकाच विषयाचे ज्ञान अनेक क्षणांपर्यंत सातत्याने करून देणारा म्हणून धारावाही असतो.सांख्यसूत्रात ध्यानाची व्याख्या “चित्तातून ध्येय विषयाव्यतिरिक्त इतर विषय नाहीसे होणे म्हणजे ध्यान” अशी केली आहे (ध्यानं निर्विषयं मन: सांख्यसूत्र  ६.२५). तसेच सांसारिक विषयांच्या आसक्तीपासून विरक्त होणे याला ध्यान असे म्हटले आहे (रागोपहतिर्ध्यानम् सांख्यसूत्र  ३.३०).सैरभैर धावणारे मन ध्यानामुळे नियंत्रित होते. मनात विक्षेप उत्पन्न करणारे रजोगुण आणि तमोगुण दुर्बळ होतात व क्रमाक्रमाने चित्त शुद्ध होते.ज्याप्रमाणे वस्त्रांचा स्थूल मळ आधी पाण्याने दूर करावा लागतो आणि सूक्ष्म मळ क्षारयुक्त साबण इत्यादीने नष्ट करावा लागतो, त्याप्रमाणे क्रियायोगाने अर्थात् तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधानामुळे क्लेश क्षीण होतात. पुढे विवेकख्याती म्हणजे पुरुषाला ‘मी प्रकृतीपासून भिन्न आहे’ असे ज्ञान झाल्यावर ते क्लेश दग्धबीज होतात, म्हणजे भाजलेले बीज ज्याप्रमाणे वृक्षनिर्मितीस असमर्थ ठरते त्याप्रमाणे चित्तामध्ये सुप्त रूपाने असणारे हे क्लेश निष्क्रिय होतात आणि असंप्रज्ञात समाधीत चित्त लय झाल्यामुळे ते नामशेष होतात (व्यासभाष्य  २.११, तत्त्ववैशारदी  २.११).ध्यानासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा या पहिल्या सहा अंगांची पूर्वपीठिका नितांत आवश्यक आहे. त्यांचा अभ्यास केल्याशिवाय ध्यान साध्य होत नाही (विष्णुपुराण  ७.६.८९). धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांना एकत्रितपणे ‘संयम’ अशी संज्ञा आहे. सूर्य, चंद्र, ध्रुव या बाह्य देशांवरील संयमाचे फळ (योगसूत्र  ३.२६, २७, २८). तसेच नाभिचक्र, कण्ठकूप, कूर्मनाडी, मूर्धास्थानातील ज्योत, हृदय या आध्यात्मिक देशांवरील संयमाचे फळ पतंजलींनी सूत्रात सांगितले आहे (योगसूत्र  ३.२९, ३०, ३१, ३२, ३४). याचा अर्थ हे ध्यानाचे विषय आहेत असा योगसूत्रात प्रत्यक्ष निर्देश नसला तरी पतंजलींना हे ध्यानाचे विषय अभिप्रेत होते. व्यासांच्या मते परमेश्वरावरील धारणा व ध्यानामुळे योग्याला समाधी शीघ्र साध्य होते आणि समाधीचे फळही मिळते  (व्यासभाष्य  १.२३, वार्त्तिक १.२३). पतंजलींनी ईश्वराच्या ध्यानाने साधनेतील सर्व विघ्ने दूर होतात असे प्रतिपादन केले आहे (योगसूत्र १.२९); तर ‘यथाभिमतध्यानाद्वा ’(योगसूत्र  १.३९) या सूत्रात योग्याला जे अभीष्ट असेल त्याचे त्याने ध्यान करावे त्यामुळे चित्ताला स्थिरता प्राप्त होते असे म्हटले आहे.

श्री ज्ञानेश्वर माऊली खंडागळे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक