शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

'ध्यान’ म्हणजे चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 19:36 IST

'Meditation' means contemplation : चित्ताची धारणा असेल तेथेच चित्त स्थिर होणे व ते दुसऱ्या विषयावर न जाणे याला ‘ध्यान’ असे म्हणतात.

'ध्यान’ म्हणजे चिंतन. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून (धातु = क्रियापदाचे मूळ रूप) निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’ असा आहे.  चित्ताची धारणा असेल तेथेच चित्त स्थिर होणे व ते दुसऱ्या विषयावर न जाणे याला ‘ध्यान’ असे म्हणतात. “धारणेसाठी जो विषय निवडला असेल त्या विषयाचा अनेक क्षणांपर्यंत व्यत्ययरहित होणारा अनुभव म्हणजे ध्यान,” अशी पतंजलींनी ध्यानाची व्याख्या केली आहे (तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् योगसूत्र ३.२).भोज व वाचस्पति मिश्र यांच्या मते धारणेचा जो आधारभूत विषय म्हणजे आलंबन त्यावर जाणीवेची एकतानता म्हणजे ध्यान होय (पातंजल योगसूत्र  ३.२ वरील भोजवृत्ति व तत्त्ववैशारदी). “धारणेमुळे साध्य होते ते ध्यान,” असे विज्ञानभिक्षू यांनी म्हटले आहे (धारणासाध्यं ध्यानमाह पातंजल योगसूत्र  ३.२ वरील योगवार्त्तिक). ध्यानामध्ये जाणीवेचा प्रवाह ध्यानासाठी निवडलेल्या विषयावर टिकून राहतो, तो प्रवाह एकाच विषयाचे ज्ञान अनेक क्षणांपर्यंत सातत्याने करून देणारा म्हणून धारावाही असतो.सांख्यसूत्रात ध्यानाची व्याख्या “चित्तातून ध्येय विषयाव्यतिरिक्त इतर विषय नाहीसे होणे म्हणजे ध्यान” अशी केली आहे (ध्यानं निर्विषयं मन: सांख्यसूत्र  ६.२५). तसेच सांसारिक विषयांच्या आसक्तीपासून विरक्त होणे याला ध्यान असे म्हटले आहे (रागोपहतिर्ध्यानम् सांख्यसूत्र  ३.३०).सैरभैर धावणारे मन ध्यानामुळे नियंत्रित होते. मनात विक्षेप उत्पन्न करणारे रजोगुण आणि तमोगुण दुर्बळ होतात व क्रमाक्रमाने चित्त शुद्ध होते.ज्याप्रमाणे वस्त्रांचा स्थूल मळ आधी पाण्याने दूर करावा लागतो आणि सूक्ष्म मळ क्षारयुक्त साबण इत्यादीने नष्ट करावा लागतो, त्याप्रमाणे क्रियायोगाने अर्थात् तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधानामुळे क्लेश क्षीण होतात. पुढे विवेकख्याती म्हणजे पुरुषाला ‘मी प्रकृतीपासून भिन्न आहे’ असे ज्ञान झाल्यावर ते क्लेश दग्धबीज होतात, म्हणजे भाजलेले बीज ज्याप्रमाणे वृक्षनिर्मितीस असमर्थ ठरते त्याप्रमाणे चित्तामध्ये सुप्त रूपाने असणारे हे क्लेश निष्क्रिय होतात आणि असंप्रज्ञात समाधीत चित्त लय झाल्यामुळे ते नामशेष होतात (व्यासभाष्य  २.११, तत्त्ववैशारदी  २.११).ध्यानासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा या पहिल्या सहा अंगांची पूर्वपीठिका नितांत आवश्यक आहे. त्यांचा अभ्यास केल्याशिवाय ध्यान साध्य होत नाही (विष्णुपुराण  ७.६.८९). धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांना एकत्रितपणे ‘संयम’ अशी संज्ञा आहे. सूर्य, चंद्र, ध्रुव या बाह्य देशांवरील संयमाचे फळ (योगसूत्र  ३.२६, २७, २८). तसेच नाभिचक्र, कण्ठकूप, कूर्मनाडी, मूर्धास्थानातील ज्योत, हृदय या आध्यात्मिक देशांवरील संयमाचे फळ पतंजलींनी सूत्रात सांगितले आहे (योगसूत्र  ३.२९, ३०, ३१, ३२, ३४). याचा अर्थ हे ध्यानाचे विषय आहेत असा योगसूत्रात प्रत्यक्ष निर्देश नसला तरी पतंजलींना हे ध्यानाचे विषय अभिप्रेत होते. व्यासांच्या मते परमेश्वरावरील धारणा व ध्यानामुळे योग्याला समाधी शीघ्र साध्य होते आणि समाधीचे फळही मिळते  (व्यासभाष्य  १.२३, वार्त्तिक १.२३). पतंजलींनी ईश्वराच्या ध्यानाने साधनेतील सर्व विघ्ने दूर होतात असे प्रतिपादन केले आहे (योगसूत्र १.२९); तर ‘यथाभिमतध्यानाद्वा ’(योगसूत्र  १.३९) या सूत्रात योग्याला जे अभीष्ट असेल त्याचे त्याने ध्यान करावे त्यामुळे चित्ताला स्थिरता प्राप्त होते असे म्हटले आहे.

श्री ज्ञानेश्वर माऊली खंडागळे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक