शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

किशोरीताई आमोणकर यांनी गायलेला संत सोयराबाई यांच्या सुप्रसिद्ध अभंगाचा भावार्थ!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 4, 2021 18:16 IST

जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

इंद्रधनुष्याचे रंग किती? असे विचारल्यावर लहान मुलही सांगेल, सात! मात्र, सूर्याच्या एका पांढऱ्या रंगातून हे सप्तरंग तयार झालेले असतात ना? या शास्त्रीय उदाहरणाप्रमाणे परमार्थातही अनेक रंग दिसत असले, तरी त्यांचा मूळ रंग एकच आहे. त्याच्यापाशी येऊन सगळे धर्म, पंथ, जात येऊन मिळतात. तो रंग कोणता, तर संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई म्हणतात,

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग।मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया।नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम।देही असूनी तू विदेही, सदा समाधिस्थ पाही।पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोख्याची महारी।

संत चोखामेळा आणि त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्तीत एवढे रमून गेले होते, की तो भक्तीरंग एक झाला होता. सोयराबाई म्हणतात, तो रंग मी अनुभवला आहे, पाहिला आहे, ज्या रंगात खुद्द श्रीरंगही रंगून जातो. त्या भक्तीची गोडी मी अनुभवली आहे, जिथे सारे भेद लयाला जातात आणि सगळे जीव एका पातळीवर येऊन पोहोचतात. काम-क्रोधाला तिथे अजिबात थारा नाही. सगळी सृष्टी विठ्ठलमय होते आणि विठ्ठल देहात असनही सर्वत्र दिसू लागतो. तो आत आहे, तसा बाहेरही. त्याला पाहताना समाधि लागते. कामात असूनही मन त्याच्या चरणी लागते. काम हाच ईश्वर होतो. ही भावावस्था केवळ भक्तीरंगात अनुभवता येते. 

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

सोयराबाईंचे सांगणे केवळ शब्दरचनेतून नव्हे तर तो अभंग ऐकताना क्षणोक्षणी जाणवते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या दैवी आवाजात हा अभंग आजवर आपण कितीतरी वेळा ऐकला असेल. जणू काही त्यांच्या स्वरातून सोयराबाई आपला आनंद व्यक्त करतात, विठ्ठलचरणी समाधी अनुभवतात आणि श्रीरंगाबरोबर रंगून जातात, असा आपल्यालाही भास होतो. 

या अभंगाला संगीतही किशोरीताईंनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी भैरवी रागाचा वापर केला आहे. भैरवी रागात बारा सूरांचा वापर होत असल्याने बैठकीत हा राग सर्वात शेवटी गायला जातो. किशोरीताईंनी सदर अभंगासाठी या रागाची निवड अतिशय चपखलपणे केली आहे. सर्व रंगांची, भावनांची, काम-क्रोधाची जिथे सांगता होते, त्या विठ्ठल नामापायी लागताना सूरांचाही रंग एक व्हावा, हा त्यामागील विचार असू शकतो. त्यांच्या सात्विक स्वराने आपण तो एक रंग अनुभवतोही. 

जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू. 

हेही वाचा : शरीरावर नव्हे, तर मनावर आघात करणारा, शाहीर अनंत फंदी यांचा 'फटका!'

टॅग्स :Kishori Amonkarकिशोरी आमोणकर