शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

किशोरीताई आमोणकर यांनी गायलेला संत सोयराबाई यांच्या सुप्रसिद्ध अभंगाचा भावार्थ!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 4, 2021 18:16 IST

जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

इंद्रधनुष्याचे रंग किती? असे विचारल्यावर लहान मुलही सांगेल, सात! मात्र, सूर्याच्या एका पांढऱ्या रंगातून हे सप्तरंग तयार झालेले असतात ना? या शास्त्रीय उदाहरणाप्रमाणे परमार्थातही अनेक रंग दिसत असले, तरी त्यांचा मूळ रंग एकच आहे. त्याच्यापाशी येऊन सगळे धर्म, पंथ, जात येऊन मिळतात. तो रंग कोणता, तर संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई म्हणतात,

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग।मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया।नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम।देही असूनी तू विदेही, सदा समाधिस्थ पाही।पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोख्याची महारी।

संत चोखामेळा आणि त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्तीत एवढे रमून गेले होते, की तो भक्तीरंग एक झाला होता. सोयराबाई म्हणतात, तो रंग मी अनुभवला आहे, पाहिला आहे, ज्या रंगात खुद्द श्रीरंगही रंगून जातो. त्या भक्तीची गोडी मी अनुभवली आहे, जिथे सारे भेद लयाला जातात आणि सगळे जीव एका पातळीवर येऊन पोहोचतात. काम-क्रोधाला तिथे अजिबात थारा नाही. सगळी सृष्टी विठ्ठलमय होते आणि विठ्ठल देहात असनही सर्वत्र दिसू लागतो. तो आत आहे, तसा बाहेरही. त्याला पाहताना समाधि लागते. कामात असूनही मन त्याच्या चरणी लागते. काम हाच ईश्वर होतो. ही भावावस्था केवळ भक्तीरंगात अनुभवता येते. 

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

सोयराबाईंचे सांगणे केवळ शब्दरचनेतून नव्हे तर तो अभंग ऐकताना क्षणोक्षणी जाणवते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या दैवी आवाजात हा अभंग आजवर आपण कितीतरी वेळा ऐकला असेल. जणू काही त्यांच्या स्वरातून सोयराबाई आपला आनंद व्यक्त करतात, विठ्ठलचरणी समाधी अनुभवतात आणि श्रीरंगाबरोबर रंगून जातात, असा आपल्यालाही भास होतो. 

या अभंगाला संगीतही किशोरीताईंनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी भैरवी रागाचा वापर केला आहे. भैरवी रागात बारा सूरांचा वापर होत असल्याने बैठकीत हा राग सर्वात शेवटी गायला जातो. किशोरीताईंनी सदर अभंगासाठी या रागाची निवड अतिशय चपखलपणे केली आहे. सर्व रंगांची, भावनांची, काम-क्रोधाची जिथे सांगता होते, त्या विठ्ठल नामापायी लागताना सूरांचाही रंग एक व्हावा, हा त्यामागील विचार असू शकतो. त्यांच्या सात्विक स्वराने आपण तो एक रंग अनुभवतोही. 

जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू. 

हेही वाचा : शरीरावर नव्हे, तर मनावर आघात करणारा, शाहीर अनंत फंदी यांचा 'फटका!'

टॅग्स :Kishori Amonkarकिशोरी आमोणकर