शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रामायणातील मारीचाचं मॉरिशस 'कनेक्शन'?; थेट गूगल अर्थच्या आधारे मांडलं लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 17:51 IST

पौराणिक कथांना जेव्हा भौगोलिक माहितीची व तर्कशास्त्राची जोड मिळते, तेव्हा अशा गोष्टी डोके वर काढतात.

रामायण महाभारत हे दोन असे महान ग्रंथ आहेत, की हजारो वर्षांनंतरही त्यावर अभ्यासकांचा सातत्याने अभ्यास सुरु आहे. त्यातून दर दिवशी नवनवीन माहिती ऐकायला वाचायला मिळते. अशातच अलीकडे एक व्हिडीओ पाहण्यात आला, त्यात तत्परा अहोरात्रा नामक युवतीने एक युक्तिवाद मांडला आहे. त्यानुसार आजचा नामांकित व तारांकित देश मॉरिशस हा रामायणातील मारीच राक्षसाच्या नावावरून ओळखला जातो असा दावा तिने केला आहे. यासाठी तिने भौगोलिक माहितीचा आधार घेतला आहे, तो कसा ते पहा!

वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, सीता माई आणि लक्ष्मण दंडकारण्यातून जात असताना नाशिकमधील पंचवटी येथे मुक्कामी होते. त्यावेळेस सीतेला एक सुवर्णमृग दिसले. ते सोन्याचे हरीण आपल्या जवळ असावे, आपण त्याचा सांभाळ करावा असे तिला वाटले म्हणून तिने रामाला त्याला पकडून आणण्यास सांगितले. सुवर्ण मृग हा प्रकारच मुळात अस्तित्वात नसतो, हे माहीत असूनही सीतेचे मन राखण्यासाठी राम जाऊ लागले असता, लक्ष्मणाने त्यांना सावध करत म्हटले, 'हा नक्कीच कोणी राक्षस असावा. त्याचा पाठलाग करत फार दूर जाऊ नका.' 

हे ऐकून राम म्हणाले, 'हो मी लक्षात ठेवतो तू सीतेची काळजी घे मी आलोच!' असे म्हणून राम त्याला पकडण्यास निघाले. ते हरीण म्हणजे प्रत्यक्षात रावणाचा दूत मारीच राक्षस होता. तो रामाची ख्याती ओळखून होता. रावणाच्या जाचाला कंटाळून त्याने रामाच्या हाती मरण पत्करावे या हेतूने हे सोंग धारण केले. तो रामाला आपल्या पाठोपाठ दूर घेऊन गेला आणि तिथून लक्ष्मण आणि सीतेला आवाज देऊ लागला. ती हाक ऐकलल्यावर रामाची खात्री पटली की हा प्रत्यक्षात कोणी राक्षस आहे. त्याला ठार मारण्यासाठी रामाने धनुष्यावर बाण चढवला आणि क्षणार्धात मारीच घायाळ होऊन रामांच्या चरणाशी आला. त्याने रामाकडे मुक्ती मागितली. त्याने प्राण सोडले.

त्याच वेळेस सीतेच्या सांगण्यावरून लक्ष्मण रामाचा शोध घेत तिथे पोहोचला. मारिचला यमलोकी पाठवण्यासाठी रामाने मारीचचा उचललेला देह दूरवर फेकताना, सीता एकटी आणि संकटात असेल या काळजीने दक्षिण दिशेला यमलोकी जाऊन पडण्याऐवजी अलीकडच्या देशात पडला. तो देह रामाच्या बाणाने पवित्र झाला आणि त्या मृत देहावरून त्या देशाला मारीच देश अर्थात आजचा मॉरिशस देश अशी ओळख मिळाली. 

हे सर्व कथन करताना तत्परा अहोपात्रा यांनी गुगल अर्थची मदत घेतली व भौगोलिक दृष्ट्या नाशिक वरून फेकलेला मारीचचा मृतदेह मॉरिशसच्या दिशेने कसा जाऊन पडला, हे सांगितले आहे.  

यात तथ्य किती आणि कसे याचा अभ्यास जाणकार करतीलच, परंतु अशा चर्चेमुळे धर्मग्रंथांचा अभ्यास होत राहतो आणि नव्या पिढीचे कुतूहल जागृत होते, ही जमेची बाजू!

टॅग्स :ramayanरामायण