शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अनेक साधू भस्मलेपन करतात, त्याने काय साध्य होते? आपणही भस्मलेपन करू शकतो का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 14:35 IST

भस्म हे प्रभावी असल्यामुळे शरीरातील सांधे, कपाळ, छाती, पाठ इत्यादींवर नियमित भस्मलेपन केल्याने संधिवातादी रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.

भक्तीमार्गातले अनेक जण, विशेषत: साधू संन्यासी भस्मलेपन केलेले आढळतात. ही केवळ त्यांची धार्मिक ओळख नसून भस्मलेपन विधीचे फायदे त्यांना मिळतात. त्यांच्याप्रमाणे आपणही भस्मलेपनाचा लाभ घेऊ शकतो का, हे 'शास्त्र असे सांगते' या पुस्तकाच्या आधारे सविस्तर जाणून घेऊ. 

गायींच्या रानशेणीपासून केलेले भस्म हे सर्वोत्कृष्ट होय. अग्निहोत्राच्या होमकुंडातील भस्मदेखील उत्कृष्ट भस्म होय. तथापि, काही ठिकानी नैसर्गिक प्रक्रियेने भस्म तयार होते हे भस्मदेखील भस्मधारणास वापरतात.

भस्मामध्ये दुर्गंधनाशक व मनास उत्तेजक अशी विविध संप्रेरक द्रव्ये आणि विविध रासायनिक घटक असतात असे सिद्ध झालेले आहे. भस्मलेपनामुळे अंगावरील रंध्रे बुजून जातात असा गैरसमज आहे. पण परिस्थिती नेमकी उलट असते. भस्मामध्ये शरीरातील कर्बद्विप्राणिल द्रव्ये शोषून घेण्याची शक्ती असते. इतकेच नव्हे तर भस्म हे प्रभावी जंतुघ्न व शोथघ्न असल्यामुळे शरीरातील सांधे, कपाळ, छाती, पाठ इत्यादींवर नियमित भस्मलेपन केल्याने संधिवातादी रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच अंगातील तेज व ओज यांचेही रक्षण होते. यासाठीच विशेषत: साधू संन्यासी भस्मलेपन करतात.

शरीरशुद्धी हा भस्मधारण विधीचा मुख्य हेतू आहे. त्यानुसार कोणत्याही वयोगटातील स्त्रीपुरुषांनी स्नानानंतर भस्मधारण विधी करण्यास हरकत नसते. कपाळाला भस्म लावून झाल्यावर पुरुषांनी चंदनाचा टिळा तर स्त्रियांनी कुंकू लावावे. देहाची शुद्धता, पवित्रता स्त्री पुरुष दोघांनी राखावी. 

अंगठा व त्याच्या बाजूचे बोट सोडता तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या शेवटच्या तीन बोटांच्या पेरांनी भस्मलेपन केले जाते. ही तिनही बोटे पितृ, आत्म आणि देव तीर्थांची प्रतिके मानली जातात. भस्मलेपन करताना आधी दोन्ही तळहातांना, नंतर दोन्ही हात तसेच कपाळावर लावतात. त्याला त्रिपुंड्र असे म्हणतात. 

छाती, नाभि, कंठ, खांदे, कोपर, मनगटे, पाठ, शिर या स्थानी भस्म लावावे. शरीराच्या उजव्या बाजूला डाव्या हाताने तर डाव्या बाजूला उजव्या हाताने भस्मलेपन करता येते. भस्मलेपन करताना प्रत्येकवेळी ऊँ नम: शिवाय हा मंत्र अवश्य जपावा. सेच गायत्री मंत्र किंवा ऊँकार मंत्र उच्चारत भस्मलेपन केले जाते.