शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सुखी-समाधानी आयुष्यासाठी संन्याशाने दिलेला मंत्र शेठजींच्या कामी आला, तुम्हालाही येतो का बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 08:00 IST

राग, द्वेष, मोह यांच्यामुळे आपले मन अशुद्ध बनते. वरील बोधकथेत यांनाच मनाची छिद्रे म्हटले आहे.

कुठे थांबावं, हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे चितेवर ठेवेपर्यंत चिंता मिटत नाही. यासर्वांचा परिणाम असा, की आपण संतुष्ट कधीच होत नाही आणि जो समाधानी नसतो, तो कधीच सुखी होत नाही. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी काय करायला हवे, यासाठी वाचा ही बोधकथा. 

एकदा एका संन्याशाजवळ एक शेठजी आला. शेठजीपाशी अपार संपत्ती होती. परंतु शांती नव्हती. तो संन्याशाला म्हणाला, `महाराज, मी फार दु:खी आहे. मला आपण असा मंत्र द्या, की ज्यामुळे माझे सारे दु:ख नाहीसे होईल.'

संन्याशी म्हणाला, शेठजी, प्रथम मला थोडे दूध द्या. मला फार भूक लागली आहे. नंतर मी मंत्र देईन.' शेठजीला हे विचित्र वाटले. परंतु तो पेचात पडला होता. म्हणून त्याने संन्याशासाठी दूध आणवले. 

संन्याशी म्हणाला, तुमच्या पेल्यातून मी दूध पिणार नाही. या माझ्या पेल्यात ते ओता.' संन्याशाने आपल्या थैलीतून बाहेर काढलेल्या पेल्याला तळाशी अनेक छिद्रे होती.  हे पाहून शेठजी म्हणाला, `महाराज, या पेल्यातून दूध ओतले तर ते तुम्ही पिणार की खालची जमीन?' यात दुधाचा एक थेंबही राहणार नाही. तुम्ही तुमच्या थैलीतून दुसरा न गळणार पेला काढा.'

यावर संन्याशी म्हणाला, `शेठजी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. माझ्या छिद्रे असलेल्या पेल्यात तुम्ही दिलेले दूध राहणार नाही, तर मग तुमच्या छिद्रमय मनात माझा मंत्र कसा बरे टिकेल छिद्रे बुझवलेले मन आणा, मन मी मंत्र देईन!'

राग, द्वेष, मोह यांच्यामुळे आपले मन अशुद्ध बनते. वरील बोधकथेत यांनाच मनाची छिद्रे म्हटले आहे. जोपर्यंत मन रागरंजित, द्वेषदूषित व मोहविमूढ असते, तोपर्यंत ते व्याकुळच राहणार. ते सुखी कसे होणार? मनाला या अशुद्धीपासून मुक्त करण्याचा मार्ग म्हणजे भगवान कृष्णाने गीतेमध्ये वर्णन केलेला अनासक्ती योग किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग. मन शुद्ध होण्यानेच आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येऊ शकतो. 

यासाठी मनाला लागलेले असमाधानाचे छिद्र समाधानाचे लेपन करून बुजवून टाका, तरच त्यात कायमस्वरूपी आनंदाची अनुभूती घेता येईल.