शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti 2023: मकर संक्रातीला तिळगुळ वाटण्यामागे आणि पतंग उडवण्यामागे शास्त्राचे प्रयोजन काय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:33 IST

Makar Sankranti 2023: हिंदू धर्मातील प्रत्येक सण, उत्सव निसर्गाशी, ऋतुचक्राशी सुसंगत आहे. मकर संक्रांतीची ओळख तिळगुळ आणि पतंग यांचेही महत्त्व जाणून घेऊ. 

संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रात म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. 

निसर्ग ऋतुनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते, त्या ऋतूत त्या रोगानुसार औषध वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा अवयव अन अवयव आखडून गेलेला असता़े  रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. शेतातून ताजे तीळ घरात आलेले असतात. त्यावेळी शुष्क बनणाऱ्या शरीरासाठी याहून अधिक दुसरे योग्य औषध कोणते असू शकते?

तसेच मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे. सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात, एखाद्या इमारतीच्या छपरावर किंवा आगाशीत जावे लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते.

यामागील आध्यात्मिक अर्थ उलगडून सांगताना पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, `तात्विक दृष्टीने पाहता, आपल्या जीवनाचा पतंगही या विश्वामागे असलेली अदृश्य शक्ती एखाद्या अज्ञात आगाशीत उभी राहून उडवीत असते. संक्रांतीच्या दिवशी जसे आकाशात लाल, पिवळे, हिरवे रंगाचे पतंग उडताना दिसतात, तसे या विश्वाच्या विशाल आकाशात सत्ताधीश, श्रीमंत, विद्वान वगैरे अनेक प्रकारचे पतंग उडत असतात. पतंगाची हस्ती (अस्तित्व) व मस्ती तोपर्यंत राहते, जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हाती असते. सूत्रधाराच्या हातून सुटलेला पतंग वृक्षाच्या डहाळीवर, वीजेच्या तारेवर किंवा संडासाच्या टाकीवर फाटलेला व विदृप दशेत पडलेला दिसतो. भगवंताच्या हातून सुटलेला मानव पतंगही थोड्याच दिवसात रंग उतरलेला, फिक्का व अस्वस्थ झालेला पाहायला मिळतो.'

या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तीळाचा स्नेह, गुळाचा गोडवा, पतंगाचा त्याच्या सूत्रधारावर विश्वास आपल्या जीवनात साकार झाला, तरच आपल्या जीवनात योग्य संक्रमण झाले, असे म्हणता येईल.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती